शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

सर्वांना न्याय देणारे तुमच्या मनातील सरकार राज्यात आणू, राहुल गांधींसमोर सतेज पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

By भीमगोंड देसाई | Updated: October 5, 2024 14:23 IST

कोल्हापूर : कन्याकुमारी ते काश्मिरपर्यंत भारत जोडो यात्रा काढून आणि मणिपूर ते मुंबईपर्यंत न्याय यात्रा काढून महिला, युवक, शेतकऱ्यांना ...

कोल्हापूर : कन्याकुमारी ते काश्मिरपर्यंत भारत जोडो यात्रा काढून आणि मणिपूर ते मुंबईपर्यंत न्याय यात्रा काढून महिला, युवक, शेतकऱ्यांना आधार देणारे काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांच्या मनातील, न्याय विचाराचे सरकार महाराष्ट्रात आणू, असा विश्वास काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळयाच्या उदघाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमातील प्रास्ताविकात त्यांनी खासदार गांधी यांना हे आश्वासन त्यांच्या उपस्थितीतच दिले. यावेळी गांधी यांनीही हसून त्यांना दाद दिली.आमदार पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेकाचे यंदाचे ३५० वे वर्ष आहे. या वर्षातच कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होते हे विशेष आहे. कसबा बावडा ही राजर्षी शाहू महाराज यांची जन्मभूमी आहे. या भूमीत अठारा पगड जातींच्या कल्याणासाठी उत्तुंग कामगिरी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचे अनावरण न्याय, समता, निर्भयतेसाठी लढणारे राहूल गांधी यांच्या हस्ते होत आहे, हा ऐतिहासिक क्षण आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो, न्याय यात्रेच्या माध्यमातून भयभयीत झालेल्या घटकाला आधार दिला. त्यांच्या मनातील सर्वांना न्याय देणाऱ्या विचाराचे सरकार राज्यात आणू.खासदार शाहू छत्रपती म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याकाळात अन्यायाविरोधात आवाज उठवला. सर्वांना बरोबर घेवून धर्मनिरपेक्षतेची विचारधारा रूजवली. पुतळ्याच्या माध्यमातून त्यांच्या कर्तृत्वाची प्रेरणा सातत्याने मिळत राहील.विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा क्षण सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखा आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कसबा बावड्यात, कोल्हापुरात दिवाळी साजरी होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांचे भाषण झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलRahul Gandhiराहुल गांधीGovernmentसरकारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी