शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कारखान्याला नाव लावायला आम्ही काही सतेज पाटील नाही, अमल महाडिक यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 12:28 IST

किमान 'अजिंक्यतारा' या त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा ७/१२ आधी कोणाच्या नावावर होता आणि आता कोणाच्या नावावर आहे, एवढं तरी त्यांनी जाहीर करावे.

कोल्हापूर : कारखान्याला आमचे नाव लावायला आम्ही काही सतेज पाटील नाही. रात्रंदिवस फक्त ७/१२ आणि जमीन एवढेच विचार या व्यक्तीच्या डोक्यात असतात का ? असा प्रश्न मला पडतो असा टोला माजी आमदार अमल महाडिक यांनी लगावला आहे.

सतेज पाटील यांनी उद्या होणाऱ्या राजाराम कारखान्याच्या वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सभा घेऊन महाडिक यांच्यावर टीका केली होती. त्याला महाडिक यांनी मंगळवारी प्रत्युत्तर दिले आहे.

पत्रकात महाडिक म्हणतात, राजाराम कारखान्यात मागील ३० वर्षे आम्ही सत्तेत असताना कारखान्याचा ७/१२ आणि नाव आहे तसं जपलं. याउलट सतेज पाटलांनी मात्र सप्तगंगा साखर कारखाना ताब्यात घेताच कारखान्याचे नाव बदलले. एवढंच नाही तर १०००० सभासद एका रात्रीत कमी केले. किमान 'अजिंक्यतारा' या त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा ७/१२ आधी कोणाच्या नावावर होता आणि आता कोणाच्या नावावर आहे, एवढं तरी त्यांनी जाहीर करावे.

आज डी. वाय. पाटील साखर कारखान्याची वार्षिक सभा कधी होते ? अहवाल छापला जातो का नाही ? हेही तिथल्या सभासदांना माहिती नाही. आज ज्या सभासदांना बोगस सभासद म्हणून बाजूला काढण्याचा घाट घातला गेलाय, त्या सर्वांना सभासदत्व देताना सतेज पाटील यांचे सहकारी कै. विश्वास नेजदार हेच चेअरमन होते. आज ‘उंदराला मांजर साक्ष’ असल्याप्रमाणे जे सर्जेराव माने त्या व्यासपीठावर बसलेत, ते तेव्हाही संचालक होते.

ही तर गावगुंडासारखी भाषा

‘सभेनंतर बावड्यातून बाहेर जाणे महाग होईल’ ही सतेज पाटील यांची गावगुंडासारखी भाषा असेल, तर यांच्या नजरेत इतर १२१ गावच्या सभासदांची काय किंमत आहे ? याचा विचार सभासद नक्कीच करतील. राहता प्रश्न राहिला बावड्याचा तर आमचेही ३० वर्षे बावड्यात संबंध आहेत. बावडा ही जहागिरी असल्यासारखी भाषा वापरून बावड्याची बदनामी करू नये, असेही महाडिक यांनी पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAmal Mahadikअमल महाडिकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील