शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

‘आमचं ठरलंय’ आता प्राधिकरण नकोच, ४० गावांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 14:53 IST

त्रासदायक ठरत असल्याचे स्पष्ट करत कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण रद्द करण्याचा निर्धार विविध ४० गावांनी केला. आता प्राधिकरण नकोच असं ‘आमचं ठरलंय’. आमचा उद्रेक होण्याची वाट सरकारने पाहू नये, असा इशारा या गावांमधील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि प्रतिनिधींनी दिला

ठळक मुद्दे‘आमचं ठरलंय’ आता प्राधिकरण नकोच ४० गावांचा निर्धार; उद्रेक होण्याची वाट पाहू नका

कोल्हापूर : त्रासदायक ठरत असल्याचे स्पष्ट करत कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण रद्द करण्याचा निर्धार विविध ४० गावांनी केला. आता प्राधिकरण नकोच असं ‘आमचं ठरलंय’. आमचा उद्रेक होण्याची वाट सरकारने पाहू नये, असा इशारा या गावांमधील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि प्रतिनिधींनी दिला.येथील अजिंक्यतारा कार्यालयात आमदार सतेज पाटील यांनी प्राधिकरणामध्ये समाविष्ट असणाऱ्या गावांच्या अडचणी समजून घेण्यासाठी बैठक घेतली.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत म्हणाले, ‘प्राधिकरणातील गावांची स्थिती बिकट आहे. आमचा उद्रेक होण्याची वाट सरकारने पाहू नये.’ वडणगेचे सरपंच सचिन चौगुले म्हणाले, प्राधिकरणाबाबत पालकमंत्र्यांनी दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही. पाचगावचे संग्राम पाटील म्हणाले, बांधकाम परवाने कमी खर्चात, वेळेत देण्याचा निर्णय लवकर व्हावा.

वाशीचे संदीप पाटील म्हणाले, पिंपरी-चिंचवड वगळता राज्यातील कोणतेही प्राधिकरण यशस्वी झालेले नाही; त्यामुळे आम्हाला प्राधिकरण नको. निगवेचे दिनकर आडसूळ म्हणाले, प्राधिकरणाने जमिनी घेतल्या, तर पिकवून काय खायचे हा प्रश्न आहे. नागरिक, शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणारे प्राधिकरण रद्द व्हावे.

शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे म्हणाले, विकास करण्याऐवजी त्रास होणार असेल, तर मग प्राधिकरण कशाला? आमच्या ग्रामपंचायती सक्षम आहेत. सध्या प्राधिकरण महापुरात वाहून गेल्यासारखी स्थिती आहे.या बैठकीत आमदार पाटील यांनी मार्गदर्शन केले. शरद निगडे, अशोक पाटील, अमर मोरे, आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिंगणापूरचे अर्जुन मस्कर, वळीवडेचे प्रकाश शिंदे, गडमुडशिंगीचे प्रदीप झांबरे, गोकुळ शिरगावचे सरपंच एम. के. पाटील, शंकरराव पाटील, सर्जेराव मिठारी, संदीप पाटील, के. पी. पाटील, साताप्पा कांबळे, उजळाईवाडीचे डी. जी. माने, काकासो पाटील, उत्तम आंबवडे, नंदकुमार मजगे, सुनील गुमाने, न्यू वाडदेचे दत्तात्रय पाटील, सचिन कुर्ले, चिंचवाडचे अनिल पाटील, गांधीनगरचे सेवाराम तलरेजा, मोरेवाडीच्या सुनंदा कुंभार, तामगावचे निवास जोंधळेकर, बालिंगा अतुल बोंद्रे, आदी उपस्थित होते.प्राधिकरणाविरोधातील गावेपाचगाव, शिंगणापूर, वळीवडे, कंदलगाव, निगवे दुमाला, न्यू वाडदे, उजळाईवाडी, पीरवाडी, नेर्ली, तामगाव, वडणगे, कळंबा, मोरेवाडी, बालिंगा, नागदेववाडी, गोकुळ शिरगाव, सरनोबतवाडी, टोप-संभापूर, आंबेवाडी, प्रयाग चिखली, उचगाव, शिरोली पुलाची, कणेरीवाडी, कणेरी, भुयेवाडी, पाडळी खुर्द , आदी गावांचा प्राधिकरणाला विरोध आहे. गांधीनगर, गडमुडशिंगी, चिंचवाड ग्रामपंचायतीतील काही सदस्यदेखील विरोधात आहेत.परवान्यांबाबत ग्रामपंचायतींना पत्रे द्यागावठाण हद्दीतील बांधकाम परवाने ग्रामपंचायतींकडून देण्याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. मात्र, अद्याप त्याबाबत काहीच झालेले नाही. परवाने देण्याबाबतचे पत्र प्राधिकरणाने ग्रामपंचायतींना द्यावे, अशी मागणी नेर्लीचे प्रकाश पाटील यांनी केली.

प्राधिकरणाबाबत सरपंच, सदस्यांनी मांडलेल्या अडचणी१) गुंठेवारी झालेल्या प्लॉटवर बांधकाम परवाने व ग्रामपंचायतींना विकासात्मक कामांच्या मंजुरी मिळविणे कठीण झाले आहे.२) गावठाणमधील बांधकाम परवाना घेताना नगररचना कार्यालयाचा अभिप्राय घ्यावा लागतो. त्यास विलंब होत असल्याने लोकांना बँक कर्ज मिळविण्यात अडचण निर्माण होत आहे.३) ग्रामपंचायतींच्या अधिकारावर गदा आल्याने ग्रामपंचायतींच्या विकासाला मर्यादा आली आहे.४) प्राधिकरणाच्या बांधकाम शुल्काचा परिणाम ग्रामीण भागात इमारती बांधताना होत आहे; त्यामुळे नवे बांधकाम होण्यात अडथळे निर्माण होत आहेत. 

 

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर