शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

पाण्यासाठी अडथळ्यांची शर्यत कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:07 IST

अतुल आंबी।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : वारणा नदीतून इचलकरंजीला पाणी देण्यावर एकमत झाले; पण त्यामध्ये जागा बदला हा अडसर कायम ठेवला. संघर्षातून नव्हे, तर सामंजस्यातून पाणी हवे, असे म्हणत यालाही इचलकरंजीकरांनी संमती दर्शवली. मात्र, त्यामुळे आता वारणा योजना ‘श्रीगणेशा’पासून सुरू करावी लागणार, त्याचीही तयारी इचलकरंजीकरांसह शासनाने दर्शविली आहे. मुंबईत गुरुवारी (दि. ...

अतुल आंबी।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : वारणा नदीतून इचलकरंजीला पाणी देण्यावर एकमत झाले; पण त्यामध्ये जागा बदला हा अडसर कायम ठेवला. संघर्षातून नव्हे, तर सामंजस्यातून पाणी हवे, असे म्हणत यालाही इचलकरंजीकरांनी संमती दर्शवली. मात्र, त्यामुळे आता वारणा योजना ‘श्रीगणेशा’पासून सुरू करावी लागणार, त्याचीही तयारी इचलकरंजीकरांसह शासनाने दर्शविली आहे. मुंबईत गुरुवारी (दि. ३१) झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे वारणाकाठ व शिरोळच्या नेत्यांनी सहकार्य केल्यास इचलकरंजीला पाणी मिळण्यासाठी अडथळ्यांचा ठरत असलेला मार्ग सोयीस्कर होणार आहे.शासनाच्या अमृत योजनेतून इचलकरंजी शहराला वारणा नदीतून दानोळी (ता. शिरोळ) येथे उद्भव धरून पाणी योजना मंजूर झाली. सुरुवातीपासूनच योजनेमध्ये अडथळे येत गेले. योजनेबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती मिळताना त्यामध्ये तफावत जाणवत होती. त्यातूनच आणखीन अडथळे निर्माण होत संभ्रमावस्था पसरली. त्यामुळे दानोळीतून विरोधाला सुरुवात झाली. विरोध झुगारून योजना राबविण्यासाठी पोलीस बंदोबस्तात नियोजन केले. मात्र, गावकºयांनी तीव्र विरोध दर्शवत हा प्रयत्न हाणून पाडला. त्यातून हा प्रश्न चिघळत गेला.योजनेला वारणाकाठावरून विरोध व आंदोलन सुरू झाल्यामुळे इचलकरंजीकरांनीही आंदोलनाचा पवित्रा घेतला. शहरवासीयांना एकत्र करून मोठा मोर्चा काढून चक्री उपोषण सुरू केले. दोन्ही बाजूने टोकाची वक्तव्ये होऊ लागल्याने शहर विरुद्ध ग्रामीण असा संघर्ष निर्माण झाला. यातून मार्ग काढण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू झाले. पाणीपुरवठामंत्री बबन लोणीकर यांनी बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये वारणेतून पाणी देण्यावर एकमत झाले. मात्र, वारणाकाठचे मूलभूत प्रश्न सोडविण्याची मागणी, तसेच दानोळीतून उपसा करण्याऐवजी जागा बदलण्याची मागणी झाली. त्यावर विचार करून, तसेच समिती नेमून पाहणीनंतर निर्णय घेण्याचे ठरले.दुसरी बैठक पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ३१ मे रोजी घेतली. त्यामध्ये मोजक्याच व्यक्तींना बैठकीमध्ये घेऊन तोडगा काढण्याच्यादृष्टीने चर्चा घडवून आणली. चर्चेमधून उपसा केंद्राची जागा बदलण्यास इचलकरंजीकरांनी संमती दर्शविली. यानुसार वाढीव निधी देण्यास शासनानेही तयारी दर्शविली. जागा बदलून पाणी घेणार असाल, तर आमचाही विरोध राहणार नाही, अशी भूमिका वारणा बचाव कृती समितीच्यावतीने घेण्यात आली.संघर्षाऐवजी सामंजस्यातून हाच तोडगा निघू शकतो. त्यामुळे यावर सर्वांनी एकमत करावे, असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पाणी उपसा केंद्राची जागा बदलल्यास पुन्हा सर्व्हे करून नियोजन करण्यात वेळ जाईल. तोपर्यंत इचलकरंजी शहराचा पाणीप्रश्न कसा सुटणार, हा प्रश्न निर्माण झाला. त्यावरही शासनाने कृष्णा योजना दुरुस्तीसाठी आवश्यक निधी देण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे कृष्णा पूर्ण क्षमतेने सुरू करून इचलकरंजीवासीयांचा सध्या निर्माण झालेला पाण्याचा प्रश्न सुटेल, यासाठी त्यालाही सर्वांची संमती मिळाली. वारणेच्या शुद्ध पाण्यासाठी इचलकरंजीकरांना होणारा त्रास सहन करून आवश्यक पाठपुरावा करून योजना मार्गी लावण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार पंधरा दिवसांत नवीन उद्भव धरून सर्व्हे पूर्ण करून योजनेच्या पूर्णत्वासाठी काम सुरू करण्याचे ठरले आहे.राजकीय कुरघोड्या बाजूला ठेवण्याची गरजयोजनेच्या सुरुवातीला वारणाकाठावरून विरोध होताना इचलकरंजीवासीयांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यावेळी सर्वपक्षीय एकत्र नियोजन सुरू झाले. त्यानंतर राजकीय पक्षांच्या नेत्यांमधून आरोप-प्रत्यारोप, राजकीय कुरघोड्या सुरू झाल्या. त्यामुळे योजनेला फाटे फुटून शहरवासीयांना पाणी मिळणार की नाही, अशी भावना व्यक्त होऊ लागली होती. त्यामुळे आता तरी राजकीय कुरघोड्या बाजूला ठेवून एकत्रित येणे गरजेचे बनले आहे.सर्व नेत्यांची एकजूट आवश्यककुरघोड्या करून योजनेला फाटे फोडत बसण्यापेक्षा सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हीच ताकद योजनेच्या सफलतेसाठी लावून आपापल्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न केल्यास योजना कार्यान्वित होण्यास मदत होईल आणि शहरवासीयांचा पाण्याचा प्रश्न सुटेल.