शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील कळंबा तलावाची पाणीपातळी घटली, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचे सावट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 14:05 IST

अमर पाटील   कळंबा : कळंबा, पाचगावसह उपनगरांच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्राेत असणाऱ्या कळंबा तलावातील पाणीपातळीत झपाट्याने घट होऊ ...

अमर पाटील  कळंबा : कळंबा, पाचगावसह उपनगरांच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्राेत असणाऱ्या कळंबा तलावातील पाणीपातळीत झपाट्याने घट होऊ लागली आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पाणीपातळी पंधरा फुटांवर गेल्याने यंदा ऐन उन्हाळ्यात पाणी प्रश्न पेटणार हे निश्चित. फेब्रुवारीत दैनंदिन तापमानात वाढ झाल्याने बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढला असल्याने तलाव पात्रातील शाहूकालीन विहीर उघडी पडायला सुरुवात झाली आहे.

आजमितीला तलावातून कळंबा ग्रामपंचायत दररोज एक, तर पालिका आठ एमएलडी पाणी उपसा करते़ तलावातील जलचरांच्या अस्तित्वासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत किमान दहा फूट मृत पाणीसाठा अर्थात डेड वॉटर शिल्लक ठेवावेच लागते. याचा अर्थ फक्त पाच फूट पाणीसाठ्याचाच उपसा प्रशासनास करावा लागणार. ऐन उन्हाळ्यात पुढील तीन महिने नागरिकांची पाण्याची गरज पूर्ण करण्याचे संबंधित प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे. वाढत्या उन्हाच्या तडाख्याने तलावातील पाण्याचा वापर अंघोळ, जनावरे, गाड्या, कपडे धुण्यासाठी होत असल्याने पाण्याचा उग्र वास येत आहे़

प्रशासनाने घोटला शाहूकालीन तलावाचा गळापालिका मालकीच्या तलावातील पाणीउपसा करणाऱ्या कळंबा ग्रामपंचायत प्रशासनाने पालिकेची सत्तर लाखांची पाणीपट्टी कित्येक वर्षे भरली नाही, तरी पालिका प्रशासन मूग गिळून गप्प का. तलावाच्या वीस एकर हद्दीत अतिक्रमण करून रासायनिक शेती केली जात आहे. त्याचा तलावातील पाण्यावर विपरीत परिणाम होत आहे. तरीही प्रशासन सुस्त आहे. तलावाच्या पाणलोट क्षेत्रात बेकायदेशीर बांधकामे व व्यवसाय सुरू असून, कारवाई होत नाही. सात कोटींच्या सुशोभीकरणाचे संवर्धन ग्रामपंचायतीला करता आले नाही. पालिकेचा एकही कर्मचारी तलावावर देखभाल करण्यासाठी नियुक्त केला नाही, हे दुर्दैव.

थेट पाइपलाइन कार्यान्वित झाल्याने तलावातून पाणीउपसा कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार केला असून, पुईखडीमधून पाणीउपसा करून पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. -दिलीप तेलवी, ग्रामविकास अधिकारी, कळंबा

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी