शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

‘गडहिंग्लज’मध्येही पाणी प्रतिष्ठानचे काम सुरू ‘बटकणंगले’त सुरुवात : तरुणाईचा पुढाकार,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:21 IST

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील ८९ पैकी ३२ गावात यंदा पाणीटंचाई जाहीर झाली आहे. त्या यादीत नाव नसतानाही भविष्यात विदर्भ-मराठवाड्यासारखी वेळ आपल्या गावावर येऊ नये म्हणून

राम मगदूम।गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील ८९ पैकी ३२ गावात यंदा पाणीटंचाई जाहीर झाली आहे. त्या यादीत नाव नसतानाही भविष्यात विदर्भ-मराठवाड्यासारखी वेळ आपल्या गावावर येऊ नये म्हणून शेकडो हात राबताहेत. केवळ सरकारी उपाययोजनेवर भरवसा न ठेवता बटकणंगलेकरांनी लोकसहभागातून ‘पाणी अडवा.. पाणी जिरवा..’ मोहीम खºया अर्थाने हाती घेतली आहे. आपापसातील सर्व मतभेद बाजूला ठेवून पाण्यासाठी, उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी गावकºयांनी एकीची मूठ बांधली आहे.

३५०० हजार लोकवस्तीच्या गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील बटकणंगले गावात प्रवेश करताच वेशीवरच उजव्या हाताला टोलेजंग इमारत दिसते. ५० वर्षांपूर्वी गावकºयांनी वर्गणी काढून बांधलेली ही इमारत माध्यमिक शाळेला नाममात्र भाड्याने दिलीय. यावरूनच गावाची वैचारिक बैठक लक्षात यावी. आदर्श ग्राम संकल्पनेसाठी अण्णा हजारे यांनी या गावाची निवड केली होती. सत्यशोधक विचारांच्या कृतीशील वारसा जपणारी माणसं अजूनही गावात सक्रीय आहेत. शिक्षण आणि श्रमाची उपासना मनापासून करणाºया गावातील ‘तरुणाई’ने ग्रामसुधारणेची पताका आता आपल्या खाद्यांवर घेतली आहे.त्याचे काय झाले, नोकरीनिमित्त शिरोळ तालुक्यात राहणारे एक तरुण प्राथमिक शिक्षक अभ्यास सहलीच्या निमित्ताने एप्रिलमध्ये ‘हिवरेबाजार’ला जाऊन आले.

सुट्टीत गावी आल्यानंतर आपल्या ‘आवाटा’ गल्लीतील तरुणांना त्यांनी ‘हिवरेबाजार’ची यशोगाथा सांगितली. त्यामुळे प्रभावित होऊन त्यांनी हा उपक्रम आपल्या गावात राबविण्याचा निर्णय घेतला.प्रारंभी ‘पाणी प्रतिष्ठान’ बटकणंगले नावाने ‘व्हॉटस् अ‍ॅप’ ग्रुप तयार करण्यात आला. त्यात गावातील सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख, तरुण मंडळे व सहकारी संस्था पदाधिकारी व मुंबईकर ग्रामस्थांचा समावेश करण्यात आला. त्यावरून ‘पाणी अडवा..पाणी जिरवा’ उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करून सूचना मागविण्यात आल्या. अनेकांना हा उपक्रम आवडला. धडाधड सूचनांचा ओघ आणि ‘आम्हीदेखील तयार आहोत’, असा आश्वासक प्रतिसाद सुरू झाला.

१५ दिवसांपूर्वी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीकडे रितसर अर्ज केला. ६-७ एकरातील सरकारी गायरानात आणि गावच्या पूर्वेकडील ४२ एकरांतील भैरीच्या डोंगरात पाण्यासाठी दगडी बांध व चर खुदाईची परवानगी मागितली. त्याला ग्रामपंचायतीने तत्काळ संमती दिली अन् प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.

दरम्यान, या मोहिमेसाठी विशेष गावसभा बोलावून ग्रामपंचायतीने संपूर्ण पाठबळही दिले. पहिल्या टप्प्यात गोठण नावाने ओळखल्या जाणाºया गायरानात २ फुट रूंदी, २ फूट खोल आणि १२ फूल लांबीच्या ५ चरी खोदण्यात आल्या. त्याच कालावधीत वळीवाचा मोठा पाऊस आल्याने पाण्याने भरलेल्या चरी पाहून तरुणांचा उत्साहात द्विगुणीत झाला व कामाची गती वाढली.

दुसºया टप्प्यात गावच्या पूर्वेकडील भैरीच्या डोंगरातदेखील २ फूट रूंद, ३ फूट खोल आणि १२ ते २० फूट लांबीच्या सुमारे ३०-३५ चरी खोदण्यात आल्या तर चार ठिकाणी दगडी बांध घालण्यात आले आहेत. १५ दिवसात सुमारे ३५००-४००० फूट लांबीची चर खोदण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात सुमारे ५० हजार लिटर पाणी साठण्याची क्षमता निर्माण झाली आहे.

यानंतर गावातील ओढे-नाल्यांवर बंधारे घालण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पाणी अडविण्यासाठी चर खुदाईचे काम पावसाळ्यापर्यंत सुरुच राहणार आहे. पावसाळ्यात गावच्या डोंगराच्या परिसरात सीड बॉलस्च्या माध्यमातून वृक्षलागवड करण्यात येणार आहे.बोलावणे नसतानाही..!दुसºया दिवशी कुठे जमायचे, काय काम करायचे. त्याचे नियोजन ‘व्हॉटस् अ‍ॅप’वरूनच कळविले जाते. ते वाचून सारी मंडळी एकत्र येत आहेत. कामाची आणखी आणि अंमलबजावणीकरिता तरुणांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला आहे. गावच्या पाणी चळवळीत श्रमदानासाठी काही मुंबईकरही येत्या शनिवार/रविवारी खास गाड्या करून गावी येणार आहेत.गुरुवारी शिवार फेरीजलयुक्त शिवार योजनेत गावाचा समावेश व्हावा अशी मागणी ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे केली आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरूवारी (२४) संबंधित सर्व खात्याचे अधिकारी व पदाधिकारी बटकणंगले गावाला भेट देणार आहेत. 

चाकरमानी राबताहेतनोकरी आणि व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहणारी कांही चाकरमानी मंडळी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी आली आहेत. तेही या उपक्रमात सहकुटुंब सक्रीय सहभागी झाले आहेत.मदतगारही आले धाऊन

गावासाठी राबणाºयांच्या श्रमपरिहारासाठी काही मंडळी चहा-नाष्टा आणि सरबत इत्यादी उत्स्फूर्तपणे देत आहेत. कुणी त्यांना टोप्या दिल्या आहेत, कुणी कुदळ, फावडी आणि बुट्या इत्यादी साहित्य पुरविले आहे. काहींनी शक्य तेवढी आर्थिक मदत दिली आहे.पाणी फौंडेशनची स्थापनाउत्कर्ष युवक मंडळ, चाणक्य मंडळ आणि युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याकरिता ‘पाणी प्रतिष्ठान बटकणंगले’ची स्थापना करण्यात आली आहे. दररोज सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ५ ते ७ अशा दोन सत्रात हे काम सुरू आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईkolhapurकोल्हापूर