शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘गडहिंग्लज’मध्येही पाणी प्रतिष्ठानचे काम सुरू ‘बटकणंगले’त सुरुवात : तरुणाईचा पुढाकार,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:21 IST

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील ८९ पैकी ३२ गावात यंदा पाणीटंचाई जाहीर झाली आहे. त्या यादीत नाव नसतानाही भविष्यात विदर्भ-मराठवाड्यासारखी वेळ आपल्या गावावर येऊ नये म्हणून

राम मगदूम।गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील ८९ पैकी ३२ गावात यंदा पाणीटंचाई जाहीर झाली आहे. त्या यादीत नाव नसतानाही भविष्यात विदर्भ-मराठवाड्यासारखी वेळ आपल्या गावावर येऊ नये म्हणून शेकडो हात राबताहेत. केवळ सरकारी उपाययोजनेवर भरवसा न ठेवता बटकणंगलेकरांनी लोकसहभागातून ‘पाणी अडवा.. पाणी जिरवा..’ मोहीम खºया अर्थाने हाती घेतली आहे. आपापसातील सर्व मतभेद बाजूला ठेवून पाण्यासाठी, उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी गावकºयांनी एकीची मूठ बांधली आहे.

३५०० हजार लोकवस्तीच्या गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील बटकणंगले गावात प्रवेश करताच वेशीवरच उजव्या हाताला टोलेजंग इमारत दिसते. ५० वर्षांपूर्वी गावकºयांनी वर्गणी काढून बांधलेली ही इमारत माध्यमिक शाळेला नाममात्र भाड्याने दिलीय. यावरूनच गावाची वैचारिक बैठक लक्षात यावी. आदर्श ग्राम संकल्पनेसाठी अण्णा हजारे यांनी या गावाची निवड केली होती. सत्यशोधक विचारांच्या कृतीशील वारसा जपणारी माणसं अजूनही गावात सक्रीय आहेत. शिक्षण आणि श्रमाची उपासना मनापासून करणाºया गावातील ‘तरुणाई’ने ग्रामसुधारणेची पताका आता आपल्या खाद्यांवर घेतली आहे.त्याचे काय झाले, नोकरीनिमित्त शिरोळ तालुक्यात राहणारे एक तरुण प्राथमिक शिक्षक अभ्यास सहलीच्या निमित्ताने एप्रिलमध्ये ‘हिवरेबाजार’ला जाऊन आले.

सुट्टीत गावी आल्यानंतर आपल्या ‘आवाटा’ गल्लीतील तरुणांना त्यांनी ‘हिवरेबाजार’ची यशोगाथा सांगितली. त्यामुळे प्रभावित होऊन त्यांनी हा उपक्रम आपल्या गावात राबविण्याचा निर्णय घेतला.प्रारंभी ‘पाणी प्रतिष्ठान’ बटकणंगले नावाने ‘व्हॉटस् अ‍ॅप’ ग्रुप तयार करण्यात आला. त्यात गावातील सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख, तरुण मंडळे व सहकारी संस्था पदाधिकारी व मुंबईकर ग्रामस्थांचा समावेश करण्यात आला. त्यावरून ‘पाणी अडवा..पाणी जिरवा’ उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करून सूचना मागविण्यात आल्या. अनेकांना हा उपक्रम आवडला. धडाधड सूचनांचा ओघ आणि ‘आम्हीदेखील तयार आहोत’, असा आश्वासक प्रतिसाद सुरू झाला.

१५ दिवसांपूर्वी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीकडे रितसर अर्ज केला. ६-७ एकरातील सरकारी गायरानात आणि गावच्या पूर्वेकडील ४२ एकरांतील भैरीच्या डोंगरात पाण्यासाठी दगडी बांध व चर खुदाईची परवानगी मागितली. त्याला ग्रामपंचायतीने तत्काळ संमती दिली अन् प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.

दरम्यान, या मोहिमेसाठी विशेष गावसभा बोलावून ग्रामपंचायतीने संपूर्ण पाठबळही दिले. पहिल्या टप्प्यात गोठण नावाने ओळखल्या जाणाºया गायरानात २ फुट रूंदी, २ फूट खोल आणि १२ फूल लांबीच्या ५ चरी खोदण्यात आल्या. त्याच कालावधीत वळीवाचा मोठा पाऊस आल्याने पाण्याने भरलेल्या चरी पाहून तरुणांचा उत्साहात द्विगुणीत झाला व कामाची गती वाढली.

दुसºया टप्प्यात गावच्या पूर्वेकडील भैरीच्या डोंगरातदेखील २ फूट रूंद, ३ फूट खोल आणि १२ ते २० फूट लांबीच्या सुमारे ३०-३५ चरी खोदण्यात आल्या तर चार ठिकाणी दगडी बांध घालण्यात आले आहेत. १५ दिवसात सुमारे ३५००-४००० फूट लांबीची चर खोदण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात सुमारे ५० हजार लिटर पाणी साठण्याची क्षमता निर्माण झाली आहे.

यानंतर गावातील ओढे-नाल्यांवर बंधारे घालण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पाणी अडविण्यासाठी चर खुदाईचे काम पावसाळ्यापर्यंत सुरुच राहणार आहे. पावसाळ्यात गावच्या डोंगराच्या परिसरात सीड बॉलस्च्या माध्यमातून वृक्षलागवड करण्यात येणार आहे.बोलावणे नसतानाही..!दुसºया दिवशी कुठे जमायचे, काय काम करायचे. त्याचे नियोजन ‘व्हॉटस् अ‍ॅप’वरूनच कळविले जाते. ते वाचून सारी मंडळी एकत्र येत आहेत. कामाची आणखी आणि अंमलबजावणीकरिता तरुणांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला आहे. गावच्या पाणी चळवळीत श्रमदानासाठी काही मुंबईकरही येत्या शनिवार/रविवारी खास गाड्या करून गावी येणार आहेत.गुरुवारी शिवार फेरीजलयुक्त शिवार योजनेत गावाचा समावेश व्हावा अशी मागणी ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे केली आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरूवारी (२४) संबंधित सर्व खात्याचे अधिकारी व पदाधिकारी बटकणंगले गावाला भेट देणार आहेत. 

चाकरमानी राबताहेतनोकरी आणि व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहणारी कांही चाकरमानी मंडळी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी आली आहेत. तेही या उपक्रमात सहकुटुंब सक्रीय सहभागी झाले आहेत.मदतगारही आले धाऊन

गावासाठी राबणाºयांच्या श्रमपरिहारासाठी काही मंडळी चहा-नाष्टा आणि सरबत इत्यादी उत्स्फूर्तपणे देत आहेत. कुणी त्यांना टोप्या दिल्या आहेत, कुणी कुदळ, फावडी आणि बुट्या इत्यादी साहित्य पुरविले आहे. काहींनी शक्य तेवढी आर्थिक मदत दिली आहे.पाणी फौंडेशनची स्थापनाउत्कर्ष युवक मंडळ, चाणक्य मंडळ आणि युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याकरिता ‘पाणी प्रतिष्ठान बटकणंगले’ची स्थापना करण्यात आली आहे. दररोज सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ५ ते ७ अशा दोन सत्रात हे काम सुरू आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईkolhapurकोल्हापूर