शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

शेतकऱ्यांची वाढवलेली २०० टक्के पाणीपट्टी माफ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरात केल्या विविध घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 15:47 IST

आशासेविकांना सरकार निराश करणार नाही

अतुल आंबी

इचलकरंजी : शहरांतर्गत फिरणाºया बसमध्ये महिलांना ५० टक्के सवलत, शेती पंपांना वाढविलेली २०० टक्के पाणीपट्टी माफ, इचलकरंजीतील रस्त्यांसाठी नगरोत्थान योजनेतून १०० कोटींचा निधी, साध्या मागाला १ रुपये, आधुनिकला ७५ पैशांची वीज सवलत अशा विविध घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या. कोरोची (ता.हातकणंगले) येथे आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाप्रसंगी ते बोलत होते.शिंदे म्हणाले, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूर येतो. त्यासाठी जागतिक बॅँकेच्या माध्यमातून तीन हजार २०० कोटींचा प्रकल्प तयार करण्यात आला असून, त्यातून पुराचा प्रश्न नाहीसा होईल. दूषित पाणी मिसळून पंचगंगा प्रदूषित होते. ते रोखण्यासाठी ७५० कोटी रुपये देण्यात येतील. त्यातून आवश्यक त्या सर्व ठिकाणी एसटीपी प्रकल्प उभारला जाईल. कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्यासाठी अ‍ॅडव्होकेट जनरल आणि मुख्य न्यायाधीश यांच्याशी चर्चा सुरू आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लावला जाईल.इचलकरंजी शहरात रस्त्यासाठी नगरोत्थानमधून १०० कोटी  रुपयांचा निधी दिला जाईल. त्यातून चांगले रस्ते करा. यंत्रमाग उद्योगाचे अनेक प्रश्न आहेत, ते मार्गी लावले जातील. २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांना ७५ पैसे, तर साध्या यंत्रमागधारकांना एक रुपयांची सवलत देण्याची अंमलबजावणी केली जाईल. वारणानगर येथील दिव्यांग विद्यालयात रिक्त असलेली पदे आमदार विनय कोरे यांच्या मागणीनुसार भरली जातील.अंगणवाडी आणि मदतनीसांची रिक्त पदे भरली जातील. आशासेविकांना सरकार निराश करणार नाही, त्यांनाही न्याय दिला जाईल. महिला बचत गटांना १५ हजार रुपये अनुदान देण्यात येत होते, ते या सरकारने ३० हजार रुपये केले आहे. दहा शहरांतील पाच हजार महिलांना पिंक रिक्षा देऊन त्यांना स्वावलंबी करण्यात येत आहे. ज्येष्ठ व वयोवृद्ध महिलांनाही अनेक लाभ दिले जात आहेत. हे सरकार गरीब, कष्टकरी, सर्वसामान्यांचे आहे. मुख्यमंत्री हे सामान्य शेतकरी कुटुंबातून आले असून, गरिबांच्या दु:ख, वेदना, अडचणी त्यांना माहित आहेत. मुख्यमंत्री उद्योग योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना उद्योगमंत्र्यांनी लाभ द्यावा.विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोºहे म्हणाल्या, पंचगंगेला आलेला महापूरही कमी पडेल, इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांनी या सभेला उपस्थिती लावली. मुख्यमंत्री भावासारखे महिलांच्या मागे उभे आहेत. दिल्ली, मुंबईला भगवे तोरण, हेच आमचे महिला धोरण.पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, महिलांमध्ये सशक्तीकरण आणणे हा मेळाव्याचा उद्देश आहे. भारताला जगातील तिसºया क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्याचे स्वप्न  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. त्यांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे.खासदार धैर्यशील माने म्हणाले, महिला जे मागतील, त्या अपेक्षा मुख्यमंत्री पूर्ण करतील. महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी  सवलत जाहीर करावी.जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वागत केले. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार संजय मंडलिक, धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, मनीषा कायंडे, आयुक्त ओमप्रकाश दिवटे, के.मंजूलक्ष्मी, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी खासदार निवेदिता माने, जिल्हाध्यक्ष रवींद्र माने, आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEknath Shindeएकनाथ शिंदेFarmerशेतकरीichalkaranji-acइचलकरंजी