शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

विभागातील २८ हजार वीज ग्राहकांची प्रतीक्षा संपली

By admin | Updated: August 31, 2015 00:44 IST

‘महावितरण आपल्या दारी’ : परिमंडळात १८०० नवे रोहित्र उभारणार

कोल्हापूर : ओव्हरलोडची समस्या आणि काही तांत्रिक कारणांमुळे नियमांनुसार पैसे भरूनदेखील वीज जोडणीची (कनेक्शन) ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत होती. गेल्या तीन वर्षांपासून अशा कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील सुमारे २७ हजार ग्राहकांची आता प्रतीक्षा संपली आहे. संबंधित ग्राहकांना वीज जोडणी लवकरात लवकर देण्यासाठी ‘महावितरण’ने कोल्हापूर परिमंडळात १८०० नवीन रोहित्र (ट्रान्स्फॉर्मर) उभारणीची प्रक्रिया सुरू केली आहे. ‘महावितरण आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत ही प्रक्रिया करण्यात येणार आहे. परिमंडळात सध्या कार्यान्वित असलेल्या रोहित्रांमध्ये ओव्हरलोडची समस्या उद्भवत असल्याने तेथून नवीन वीजजोडणी देणे तांत्रिकदृष्ट्या शक्य होत नाही. नियमांनुसार शुल्क भरूनही (पेड पेडिंग) कोल्हापूर जिल्ह्यातील ८ हजार आणि सांगलीतील २० हजार ग्राहक नव्या वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना वीज जोडणी देण्यासाठी ‘महावितरण’ने कोल्हापूर परिमंडळात एकूण १८०० नवीन रोहित्र उभारणी आणि एच. टी., एल. टी. लाईन उभारणीचे काम सुरू केले आहे. हे काम लवकर पूर्ण करण्याचे ‘महावितरण’चे नियोजन आहे. महावितरणच्या नव्या रोहित्र उभारणीच्या निर्णयामुळे गेल्या तीन वर्षांपासून वीज जोडणीच्या प्रतीक्षेतील ग्राहकांची घरे लवकरच विजेच्या प्रकाशामुळे लखलखणार आहेत. (प्रतिनिधी)पाचशे कोटींचा पायाभूत आराखडाग्राहकांना अधिक चांगल्या पद्धतीने सेवा पुरविण्यासाठी ‘महावितरण’कडून पाचशे कोटी रुपयांचा पायाभूत आराखडा कोल्हापूर परिमंडळासाठी राबविण्यात येत आहे. त्यात कोल्हापूरसाठी तीनशे आणि सांगलीसाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी आहे. त्यातून कोल्हापूरमध्ये २८ नवीन उपकेंद्रे (सबस्टेशन) आणि सांगलीत ३० उपकेंद्रांची उभारणी केली जाणार आहे. त्यासह सध्या कार्यरत असलेली उपकेंद्रे, ट्रान्स्फॉर्मरचे अद्ययावतीकरण केले जाणार आहे. या पायाभूत आराखडा योजना दोन अंतर्गत सध्या नव्या रोहित्र उभारणीचे काम होत आहे.पैसे मागितल्यास ‘लाचलुचपत’शी बोलावीज जोडणीची प्रक्रिया पारदर्शकपणे करण्यात येणार असल्याचे परिमंडळाचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, या उपक्रमांतर्गत रोहित्र, एच. टी., एल.टी.ची लाईन उभारण्याचे काम ठेकेदाराला दिले आहे. या कामासाठी लागणाऱ्या वाहिन्या उपलब्ध करून देणे. सामानांची वाहतूक करणे अशी सर्व जबाबदारी ठेकेदारांची आहे. यामुळे ग्राहकांनी अनाधिकृतपणे साहित्याची खरेदी, वाहतूक तसेच आर्थिक व्यवहार करू नये. कोणत्या व्यक्तीने पैशांची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन शिंदे यांनी केले