शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

विभागातील २८ हजार वीज ग्राहकांची प्रतीक्षा संपली

By admin | Updated: August 31, 2015 00:44 IST

‘महावितरण आपल्या दारी’ : परिमंडळात १८०० नवे रोहित्र उभारणार

कोल्हापूर : ओव्हरलोडची समस्या आणि काही तांत्रिक कारणांमुळे नियमांनुसार पैसे भरूनदेखील वीज जोडणीची (कनेक्शन) ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत होती. गेल्या तीन वर्षांपासून अशा कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील सुमारे २७ हजार ग्राहकांची आता प्रतीक्षा संपली आहे. संबंधित ग्राहकांना वीज जोडणी लवकरात लवकर देण्यासाठी ‘महावितरण’ने कोल्हापूर परिमंडळात १८०० नवीन रोहित्र (ट्रान्स्फॉर्मर) उभारणीची प्रक्रिया सुरू केली आहे. ‘महावितरण आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत ही प्रक्रिया करण्यात येणार आहे. परिमंडळात सध्या कार्यान्वित असलेल्या रोहित्रांमध्ये ओव्हरलोडची समस्या उद्भवत असल्याने तेथून नवीन वीजजोडणी देणे तांत्रिकदृष्ट्या शक्य होत नाही. नियमांनुसार शुल्क भरूनही (पेड पेडिंग) कोल्हापूर जिल्ह्यातील ८ हजार आणि सांगलीतील २० हजार ग्राहक नव्या वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना वीज जोडणी देण्यासाठी ‘महावितरण’ने कोल्हापूर परिमंडळात एकूण १८०० नवीन रोहित्र उभारणी आणि एच. टी., एल. टी. लाईन उभारणीचे काम सुरू केले आहे. हे काम लवकर पूर्ण करण्याचे ‘महावितरण’चे नियोजन आहे. महावितरणच्या नव्या रोहित्र उभारणीच्या निर्णयामुळे गेल्या तीन वर्षांपासून वीज जोडणीच्या प्रतीक्षेतील ग्राहकांची घरे लवकरच विजेच्या प्रकाशामुळे लखलखणार आहेत. (प्रतिनिधी)पाचशे कोटींचा पायाभूत आराखडाग्राहकांना अधिक चांगल्या पद्धतीने सेवा पुरविण्यासाठी ‘महावितरण’कडून पाचशे कोटी रुपयांचा पायाभूत आराखडा कोल्हापूर परिमंडळासाठी राबविण्यात येत आहे. त्यात कोल्हापूरसाठी तीनशे आणि सांगलीसाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी आहे. त्यातून कोल्हापूरमध्ये २८ नवीन उपकेंद्रे (सबस्टेशन) आणि सांगलीत ३० उपकेंद्रांची उभारणी केली जाणार आहे. त्यासह सध्या कार्यरत असलेली उपकेंद्रे, ट्रान्स्फॉर्मरचे अद्ययावतीकरण केले जाणार आहे. या पायाभूत आराखडा योजना दोन अंतर्गत सध्या नव्या रोहित्र उभारणीचे काम होत आहे.पैसे मागितल्यास ‘लाचलुचपत’शी बोलावीज जोडणीची प्रक्रिया पारदर्शकपणे करण्यात येणार असल्याचे परिमंडळाचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, या उपक्रमांतर्गत रोहित्र, एच. टी., एल.टी.ची लाईन उभारण्याचे काम ठेकेदाराला दिले आहे. या कामासाठी लागणाऱ्या वाहिन्या उपलब्ध करून देणे. सामानांची वाहतूक करणे अशी सर्व जबाबदारी ठेकेदारांची आहे. यामुळे ग्राहकांनी अनाधिकृतपणे साहित्याची खरेदी, वाहतूक तसेच आर्थिक व्यवहार करू नये. कोणत्या व्यक्तीने पैशांची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन शिंदे यांनी केले