शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

अंडी पिल्ली बाहेर काढायला कुणाची वाट बघता ? जयंत पाटील यांची विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 15:08 IST

गेली साडे चार वर्षे महाराष्ट्रातील सत्ता तुमच्या हातात असताना तुम्ही कुणाची अंडी पिल्ली बाहेर का काढली नाहीत असा खणखणीत सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला. कोल्हापूर येथील ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेटीसाठी आलेल्या जयंत पाटील यांनी ही विचारणा करतानाच राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देअंडी पिल्ली बाहेर काढायला कुणाची वाट बघता ? जयंत पाटील यांची विचारणा हिमंत असेल तर मुख्यमंत्र्यांनी मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी

कोल्हापूर : गेली साडे चार वर्षे महाराष्ट्रातील सत्ता तुमच्या हातात असताना तुम्ही कुणाची अंडी पिल्ली बाहेर का काढली नाहीत असा खणखणीत सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला. कोल्हापूर येथील ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेटीसाठी आलेल्या जयंत पाटील यांनी ही विचारणा करतानाच राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगितले.राष्ट्रवादीतून आऊटगोर्इंग सुरू असल्याबाबत विचारल्यानंतर जयंत पाटील म्हणाले, एखादा, दुसरा नेता गेला तरी त्यांचे स्थानिक विरोधक आमच्या संपर्कात आहेत. वैभव पिचड केवळ ६ हजार मतांनी निवडून आले होते. आता त्यांचे विरोधक आमच्याकडे येत आहेत. शिवेंद्रराजे गेले. मात्र शरद पवार यांच्यावर प्रेम करणारे दुसऱ्या फळीतील नेते, कार्यकर्ते आमच्यासोबतच आहेत.कॉंग्रेस आणि आम्ही एकत्र लढलो तर आम्ही सत्तेत येवू शकतो याची जाणीव असल्याने आम्ही आघाडी करूनच लढणार असल्याचा पुनरूच्चार पाटील यांनी केला. आर्थिक पातळीवर राज्याची घडी विस्कटल्याचे सांगून पाटील यांनी यावेळी अनेक उदाहरणे दिली. चाळीस हजार कोटींचा समृध्दी महामार्ग, सत्तर हजार कोटींचा हायपरलूप प्रकल्प, नवी मुंबई विमानतळ याच्या घोषणा झाल्या. पण प्रत्यक्षात काही झाले नाही. अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे नाव कुणी घेत नाही. पाटबंधारे प्रकल्पावरील तरतूदही कमी केली गेली. आता तर नितीन गडकरी यांच्याकडील हे खाते काढून घेतल्याने तिकडूनही निधी मिळणार नाही.देशाची अर्थव्यवस्थेचा क्रमवारी खालावली असून रिझर्व्ह बँकेकडून निधी घेण्याची वेळ सरकारवर आली आहे. धडाधड नोकऱ्या जात आहेत. कंत्राटी कामगारांची संख्या वाढवली जात आहे. देशापुढे फार मोठे आर्थिक संकट येण्याचीच ही लक्षणे असल्याचे पाटील यांनी सांगितले.‘लोकमत’सर्वदूर, समतोल, वैविध्यपूर्ण‘लोकमत’चा गौरव करताना जयंत पाटील म्हणाले, मी महाराष्ट्रामध्ये फिरत असतो. सर्वत्र ‘लोकमत’चा प्रभाव जाणवतो. विशेष म्हणजे बातम्यांचे वैविध्य खूपच आहे. राजकारण, कला, क्रीडा, सामाजिक अशा सर्व प्रकारच्या बातम्या असतात. कोणताही पूर्वग्रहदूषितपणा नाही. हे कोणा एका विचारधारेचे वृत्तपत्र आहे असे वाचताना वाटत नाही इतका समतोल ‘लोकमत’ने साधला आहे. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलkolhapurकोल्हापूर