शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

अंडी पिल्ली बाहेर काढायला कुणाची वाट बघता ? जयंत पाटील यांची विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 15:08 IST

गेली साडे चार वर्षे महाराष्ट्रातील सत्ता तुमच्या हातात असताना तुम्ही कुणाची अंडी पिल्ली बाहेर का काढली नाहीत असा खणखणीत सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला. कोल्हापूर येथील ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेटीसाठी आलेल्या जयंत पाटील यांनी ही विचारणा करतानाच राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देअंडी पिल्ली बाहेर काढायला कुणाची वाट बघता ? जयंत पाटील यांची विचारणा हिमंत असेल तर मुख्यमंत्र्यांनी मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी

कोल्हापूर : गेली साडे चार वर्षे महाराष्ट्रातील सत्ता तुमच्या हातात असताना तुम्ही कुणाची अंडी पिल्ली बाहेर का काढली नाहीत असा खणखणीत सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला. कोल्हापूर येथील ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेटीसाठी आलेल्या जयंत पाटील यांनी ही विचारणा करतानाच राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगितले.राष्ट्रवादीतून आऊटगोर्इंग सुरू असल्याबाबत विचारल्यानंतर जयंत पाटील म्हणाले, एखादा, दुसरा नेता गेला तरी त्यांचे स्थानिक विरोधक आमच्या संपर्कात आहेत. वैभव पिचड केवळ ६ हजार मतांनी निवडून आले होते. आता त्यांचे विरोधक आमच्याकडे येत आहेत. शिवेंद्रराजे गेले. मात्र शरद पवार यांच्यावर प्रेम करणारे दुसऱ्या फळीतील नेते, कार्यकर्ते आमच्यासोबतच आहेत.कॉंग्रेस आणि आम्ही एकत्र लढलो तर आम्ही सत्तेत येवू शकतो याची जाणीव असल्याने आम्ही आघाडी करूनच लढणार असल्याचा पुनरूच्चार पाटील यांनी केला. आर्थिक पातळीवर राज्याची घडी विस्कटल्याचे सांगून पाटील यांनी यावेळी अनेक उदाहरणे दिली. चाळीस हजार कोटींचा समृध्दी महामार्ग, सत्तर हजार कोटींचा हायपरलूप प्रकल्प, नवी मुंबई विमानतळ याच्या घोषणा झाल्या. पण प्रत्यक्षात काही झाले नाही. अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे नाव कुणी घेत नाही. पाटबंधारे प्रकल्पावरील तरतूदही कमी केली गेली. आता तर नितीन गडकरी यांच्याकडील हे खाते काढून घेतल्याने तिकडूनही निधी मिळणार नाही.देशाची अर्थव्यवस्थेचा क्रमवारी खालावली असून रिझर्व्ह बँकेकडून निधी घेण्याची वेळ सरकारवर आली आहे. धडाधड नोकऱ्या जात आहेत. कंत्राटी कामगारांची संख्या वाढवली जात आहे. देशापुढे फार मोठे आर्थिक संकट येण्याचीच ही लक्षणे असल्याचे पाटील यांनी सांगितले.‘लोकमत’सर्वदूर, समतोल, वैविध्यपूर्ण‘लोकमत’चा गौरव करताना जयंत पाटील म्हणाले, मी महाराष्ट्रामध्ये फिरत असतो. सर्वत्र ‘लोकमत’चा प्रभाव जाणवतो. विशेष म्हणजे बातम्यांचे वैविध्य खूपच आहे. राजकारण, कला, क्रीडा, सामाजिक अशा सर्व प्रकारच्या बातम्या असतात. कोणताही पूर्वग्रहदूषितपणा नाही. हे कोणा एका विचारधारेचे वृत्तपत्र आहे असे वाचताना वाटत नाही इतका समतोल ‘लोकमत’ने साधला आहे. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलkolhapurकोल्हापूर