शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विष्णुपंतांच्या शिवबंधनाने ताराराणी ‘गोत्यात’

By admin | Updated: February 4, 2017 00:38 IST

आजऱ्यातील राजकारण : श्रीपतरावही नाराजी व्यक्त करून ताराराणीपासून दूर; अशोकअण्णांची कसोटी

ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा साखर कारखाना निवडणुकीत ‘महाआघाडी’च्या माध्यमातून एकत्रितपणे राष्ट्रीय-राष्ट्रवादी काँगे्रस आघाडीविरोधात निवडणुकीला सामोरे गेलेल्या अण्णा-भाऊ गट, भाजप-शिवसेना, श्रीपतराव देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी निवडणुकीत निसटते का असेना बहुमत मिळविले. परंतु, केवळ आठच महिन्याच होत असलेल्या जि. प. निवडणुकीत बहुतांश मंडळींनी महाआघाडीचे ‘ताराराणी आघाडी’ असे नामकरण झाल्यानंतर या आघाडीपासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यमान सभापती विष्णूपंत केसरकर यांनी थेट सेनेत प्रवेश करून अनेक राजकीय खेळ्या साध्य केल्या आहेत. श्रीपतराव थेट नाराजी व्यक्त करून अद्याप तरी ताराराणीपासून दूर आहेत. त्यामुळे ताराराणी समोरील अडचणी वाढतच असून, या सर्व प्रकारात अशोकअण्णांची कसोटी लागली आहे.साखर कारखान्यातील महाआघाडीअंतर्गत असणारा संघर्ष या निवडणुकीच्या माध्यमातून उफाळून आला आहे. ‘महाआघाडी’ होती ते बर होतं अशी प्रतिक्रिया या आघाडीचे ताराराणीत रूपांतर झाल्यानंतर महाआघाडीच्या पाठीशी असणारी अनेक मंडळी देत आहेत. कारखाना निवडणुकीतील यशानंतर जि. प. व पं. स. इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत गेली.ही वाढलेली संख्या प्राधान्याने अशोकअण्णांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरली. एक-दोन संचालकांच्या अपवाद वगळता सर्वच सत्तारूढ संचालक जि.प. व पं.स. निवडणुकीकरिता रेटा लाऊ लागले. यातून मान-अपमानाचे नाट्य सुरू झाले आणि कारखाना कारभाराबाबत चर्चा सुरू झाली.विष्णुपंत शिवसेनेत गेल्यामुळे आमदार प्रकाश आबीटकर यांना शिवसेना उमेदवारांचाच प्रचार करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. प्रा. सुनील शिंत्रे, श्रीमती अंजनाताई रेडेकर यांच्या प्रचारात थेट उतरू शकत नाहीत. आता भाजपला किमान पं. स. करिता ताराराणीतून संधी दिल्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना हाताळताना मोठ्या अडचणींची शक्यता आहे.पेरणोली पं. स. मतदारसंघात ‘ताराराणी’कडून उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होणे याचा साधा अर्थ नाराजांना शांत करूनच निर्णय जाहीर करणे असाच आहे. शिवसेनेकडून ठिकठिकाणी उमेदवार उभे करून काँगे्रस-राष्ट्रवादीपेक्षा ‘ताराराणी’ला अडचणीत आणण्याची व्यूहरचना सुरू आहे. भाजपचे उमेदवारच रिंगणात नसल्याने भाजपचा आक्षेपाचा प्रश्न नाही आणि आता भाजपशी काडीमोड झालाच आहे. ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्तेही सोयीची भूमिका घेत आहेत.साखर कारखाना निवडणुकीत सुरक्षित असणारी महाआघाडी ‘ताराराणी’त रूपांतर झाल्यानंतर ‘खडतर’ प्रवासाची बनू लागली आहे. महाआघाडी तालुक्यापुरती मर्यादित होती. ‘ताराराणी’ जिल्ह्यामध्ये सक्रीय असल्याने या आघाडीवर अनेक मर्यादा येऊ लागल्याचे दिसते. ताराराणी विरोधातील जिल्ह्यतील नेत्यांची रसद आता ‘ताराराणी’ विरोधातील सक्षम उमेदवारांना मिळणार हे सुद्धा स्पष्ट आहे.केसरकर, शिवसेना, श्रीपतराव यांच्या भूमिकेने अशोकअण्णा व रवींद्र आपटेंच्या खांद्यावरील ओझे वाढतच चालले आहे. रवींद्र आपटेंनी उत्तूर भागात उमेश आपटेंविरोधात जोरदार फिल्डींग लावली आहे.मतदानापर्यंत तेथून ‘लक्ष’ काढणे त्यांना अडचणीचे आहे. राहिले अशोकअण्णा. अण्णांनी आजरा जि.प. मतदारसंघ सांभाळायचा की इतरत्र लक्ष घालायचे? हेदेखील विचार करण्याची गोष्ट आहे. त्यामुळे ‘ताराराणी’चा भार आता अशोकअण्णांनाच पेलावा लागणार हे निश्चित.राष्ट्रवादीचे दुखणेराष्ट्रवादी काँगे्रस जि. प. करिता उमेदवारी न घेता श्रीमती अंजना रेडेकर यांच्या पाठीशी रहावी यासाठी राष्ट्रवादीतील एक गट प्रयत्नशील आहे. तर कोणत्याही परिस्थितीत आपण उमेदवारी करणारच असा निर्णय राष्ट्रवादीच्या विद्यमान जि. प. सदस्य संजीवनी गुरव यांनी जाहीर करून ‘अपक्ष’ लढण्याची तयारी सुरू केली आहे.