शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Kolhapur- विशाळगड जाळपोळ प्रकरण: आंदोलकांनी जातीपातीत तेढ वाढवली हे दुर्दैवी - अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 11:42 IST

गजापूरमधील नुकसानग्रस्तांशी साधला संवाद

आंबा : विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला आंदोलकांनी हिंसक वळण देऊन जातीपातीमधील तेढ वाढवले हे दुर्दैवी असल्याचे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. पवार यांनी गुरुवारी दुपारी गजापूरला भेट देऊन नुकसानग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. पवार सुमारे दोन तास या परिसरात होते. त्यांनी बारकाईने अधिकाऱ्यांकडून या सर्व प्रकाराची माहिती घेतली.मंत्री पवार म्हणाले, कोणतीही संघटना असो किंवा पक्ष, लोकप्रतिनिधी यांनी समाजामध्ये सलोखा टिकवण्याचे काम करण्याची गरज आहे. आमचे सरकार पहिल्या दिवसापासून येथील घटनेवर लक्ष ठेवून आहे. बारकाईने येथील घटनेची खात्री करण्यास आलो. बांधवांनो, तुम्ही घाबरून जाऊ नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे. निष्पाप व्यक्तींना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून दोषींवर कठोर कारवाई करू. आपदग्रस्तांना नियमानुसार भरपाई दिली जाईल.पवार यांच्या या अचानक ठरलेल्या दौऱ्यामुळे प्रशासन यंत्रणा दुपारी सज्ज होती. कोल्हापूरहून येण्याऐवजी सांगली जिल्ह्यातून गजापूरला आले. प्रार्थनास्थळासह तोडफोड केलेल्या घरांची व वाहनांची त्यांनी पाहणी करून कुटुंबातील सदस्यांच्या वेदना समजून घेतल्या. यावेळी त्यांनी व्यावसायिक अतिक्रमणे प्राधान्याने काढली जातील. तिथे कोणताही भेदभाव होणार नाही असे स्पष्ट केले. न्यायालयाच्या आदेशाबाहेर जाऊन कोणताच निर्णय होणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी आमदार राजेश पाटील, सर्जेराव पाटील पेरीडकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे त्यांच्यासोबत होते.

संभाजीराजे थांबले असते तर ..पत्रकारांशी बोलताना मंत्री पवार म्हणाले, विशाळगडावरील अतिक्रमणे काढण्यासाठी संभाजीराजेंनी धरलेल्या आग्रहाबाबत चर्चा करण्यास सरकार सकारात्मक होते. जिल्हा प्रशासन त्यांच्याशी सातत्याने संपर्कात होते. दोन दिवसांनी चर्चेतून उत्तम मार्ग काढण्याची तयारी शासनाने दर्शवली होती. दोन दिवस ते थांबले असते तर आंदोलनाला हिंसक वळण लागले नसते. कोणताही जमाव एकदा आक्रमक झाला की कुणाचे कोण ऐकत नाही. हेच इथे घडले आहे. याआधीही अनेकदा असे अनुभव आले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवार