शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

Kolhapur- विशाळगड जाळपोळ प्रकरण: आंदोलकांनी जातीपातीत तेढ वाढवली हे दुर्दैवी - अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 11:42 IST

गजापूरमधील नुकसानग्रस्तांशी साधला संवाद

आंबा : विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला आंदोलकांनी हिंसक वळण देऊन जातीपातीमधील तेढ वाढवले हे दुर्दैवी असल्याचे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. पवार यांनी गुरुवारी दुपारी गजापूरला भेट देऊन नुकसानग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. पवार सुमारे दोन तास या परिसरात होते. त्यांनी बारकाईने अधिकाऱ्यांकडून या सर्व प्रकाराची माहिती घेतली.मंत्री पवार म्हणाले, कोणतीही संघटना असो किंवा पक्ष, लोकप्रतिनिधी यांनी समाजामध्ये सलोखा टिकवण्याचे काम करण्याची गरज आहे. आमचे सरकार पहिल्या दिवसापासून येथील घटनेवर लक्ष ठेवून आहे. बारकाईने येथील घटनेची खात्री करण्यास आलो. बांधवांनो, तुम्ही घाबरून जाऊ नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे. निष्पाप व्यक्तींना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून दोषींवर कठोर कारवाई करू. आपदग्रस्तांना नियमानुसार भरपाई दिली जाईल.पवार यांच्या या अचानक ठरलेल्या दौऱ्यामुळे प्रशासन यंत्रणा दुपारी सज्ज होती. कोल्हापूरहून येण्याऐवजी सांगली जिल्ह्यातून गजापूरला आले. प्रार्थनास्थळासह तोडफोड केलेल्या घरांची व वाहनांची त्यांनी पाहणी करून कुटुंबातील सदस्यांच्या वेदना समजून घेतल्या. यावेळी त्यांनी व्यावसायिक अतिक्रमणे प्राधान्याने काढली जातील. तिथे कोणताही भेदभाव होणार नाही असे स्पष्ट केले. न्यायालयाच्या आदेशाबाहेर जाऊन कोणताच निर्णय होणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी आमदार राजेश पाटील, सर्जेराव पाटील पेरीडकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे त्यांच्यासोबत होते.

संभाजीराजे थांबले असते तर ..पत्रकारांशी बोलताना मंत्री पवार म्हणाले, विशाळगडावरील अतिक्रमणे काढण्यासाठी संभाजीराजेंनी धरलेल्या आग्रहाबाबत चर्चा करण्यास सरकार सकारात्मक होते. जिल्हा प्रशासन त्यांच्याशी सातत्याने संपर्कात होते. दोन दिवसांनी चर्चेतून उत्तम मार्ग काढण्याची तयारी शासनाने दर्शवली होती. दोन दिवस ते थांबले असते तर आंदोलनाला हिंसक वळण लागले नसते. कोणताही जमाव एकदा आक्रमक झाला की कुणाचे कोण ऐकत नाही. हेच इथे घडले आहे. याआधीही अनेकदा असे अनुभव आले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवार