शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
2
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
3
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पंना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
4
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
5
मुंबईत उमेदवार भाजपचा अन् चिन्ह मात्र शिंदेसेनेचे? आता उच्च पातळीवर होणार चर्चा
6
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
7
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
8
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
9
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
10
वर्षभरात बॉलिवूडची बांधकाम उद्योगात  तब्बल एक हजार कोटींची उलाढाल; ८५५ कोटींच्या व्यवहारासह जितेंद्र पहिल्या क्रमांकावर
11
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
12
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
13
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
14
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
15
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
16
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
17
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
18
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
19
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अतिक्रमणास ग्रामपंचायतीच जबाबदार, स्थापनेपासून गावठाण वाढीचे प्रस्तावच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 19:27 IST

ग्रामीण भागातील लाखो कुटुंबांचा जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला असताना सत्तेतील एकही लोकप्रतिनिधी बोलण्यास तयार नाही.

राजाराम लोंढेकोल्हापूर : गावागावांतील लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली. एका कुटुंबाची दहा कुटुंब झाली. मग राहायचे कोठे असा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी जागा मिळेल तिथे निवारा उभा केला. वाढती लोकसंख्येनुसार दर दहा वर्षांनी शासनाकडे गावठाण वाढीचा प्रस्ताव देऊन त्यानुसार लोकांना निवारा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची होती. मात्र, अनेक गावांत ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून गावठाण वाढ न झाल्याने ग्रामस्थांनी आपले निवारे उभा केले आणि आज ४०-५० वर्षे ते तिथे वास्तव्यास असताना अचानक डोक्यावरील छप्पर जाणार असल्याने ग्रामस्थांच्या झोपा उडाल्या.देशात दर दहा वर्षांनी जनगणना होते. त्यातून गावात, तालुक्यात, जिल्ह्यात लोकसंख्येत किती वाढ झाली हे समजते. वास्तविक वाढीव लोकसंख्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने दर दहा वर्षांनी गावठाण वाढीसाठी प्रातांधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करणे कायद्याला अपेक्षित आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांत ग्रामपंचायतींच्या स्थापनेपासून एकदाही गावठाण वाढीचा प्रस्ताव सादर केलेला नाही, अथवा जिल्हा प्रशासनानेही या बाबीकडे कधी गांभीर्याने पाहिलेले नाही. त्याचे भोग आज अतिक्रमणातील ग्रामस्थांना भोगावे लागत आहेत.जिल्हा प्रशासनाने प्रातांधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून, अतिक्रमणधारकांच्या याद्या तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. या याद्यानुसार संबधितांना नोटिसा लागू केल्या जाणार असून, अतिक्रमण काढून घेण्यास ३१ डिसेंबर २०२२ ची मुदत दिली आहे. तोपर्यंत अतिक्रमणे काढली नाही तर हातोडा पडणार असला तरी जनतेमध्ये असंतोष कमालीचा आहे. अतिक्रमणावर कारवाई करणे प्रशासनाला तितकेसे सोपेही नाही.

न्यायालयात वस्तुस्थिती मांडणे गरजेचेगायी, म्हशी चारण्यासाठी शासनाने प्रत्येक गावात ‘गायरान’ म्हणून जमीन राखीव ठेवलेली आहे. मात्र, सध्या जी अतिक्रमणे आहेत, ती चराऊ जमिनीत नाहीत. गावठाण शेजारी गायरान जमिनीत असल्याची वस्तुस्थिती न्यायालयासमोर मांडणे गरजेचे आहे.

दहा लाखांत एक गुंठा कसा घ्यायचा?गेल्या पाच-दहा वर्षांपासून शहराप्रमाणे ग्रामीण भागातील निवासी जागांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे खासगी जागा घ्यायची म्हटले तर दहा लाख रुपये गुंठा दर आहेत. मोलमजुरी करणाऱ्यांनी दहा लाख रुपये आणायचे कोठून?

‘लोकप्रतिनिधींनो,’ फक्त मतासाठी येणार का?ग्रामीण भागातील लाखो कुटुंबांचा जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला असताना सत्तेतील एकही लोकप्रतिनिधी बोलण्यास तयार नाही. अतिक्रमणधारकांकडे केवळ मतांसाठी येणार का? असा सवालही आता विचारला जात आहे.

छप्पर वाचविण्यासाठी आता जनरेट्याची गरजआपल्या डोक्यावरील छप्पर जाणार असल्याने आता यातून वाचण्यासाठी जनरेट्याची गरज आहे. एकीकडे जनआंदोलन आणि दुसऱ्या बाजूला न्यायालयीन लढाई लढावी लागेल. या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

शासन काय करू शकते?पंतप्रधान नरेंद मोदी यांचा प्रत्येकाला घर या योजनेंतर्गत नियमाकुल करणे, शासनाच्या धोरणानुसार निवासासाठी जागा देणे, त्या जागेचे शासकीय दरानुसार संबधित अतिक्रमणधारकाकडून पैसे भरून घेणे, निवासी जागेशिवाय असणारी जागा काढून घेणे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतCourtन्यायालय