शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्यांची गय नको

By admin | Published: May 21, 2017 12:47 AM

विभागीय आयुक्तांच्या प्रदूषण नियंत्रणला सूचना : ३१ गावांसाठी शंभर कोटींचा आराखडा तयार

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेसह सर्वच घटकांना ठरावीक कालावधी द्या. त्या कालावधीत शुद्धिकरण प्रकल्प उभे केले नाहीत, तर त्यांची गय करू नका, अशा सूचना पंचगंगा प्रदूषणाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाला केल्याची माहिती विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ३९ गावांवरच लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देऊन त्यातील आठ गावांचा प्रश्न नाबार्डच्या मदतीने मार्गी लागला आहे. उर्वरित ३१ गावांसाठी जिल्हा परिषदेने शंभर कोटींचा आराखडा तयार केला असून, तो लवकरच सरकारकडे पाठविण्याची सूचनाही संबधितांना केल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, महापालिकेचे शुद्धिकरण प्रकल्प प्रगतिपथावर असून, इचलकरंजी ‘एसटीपी’ प्लॅन्ट जागेअभावी प्रलंबित आहेत. १७४ गावांतील सांडपाण्याचा प्रश्न आहे; पण त्यापैकी ३९ गावे ७० टक्के प्रदूषण करतात. त्यामुळे पहिल्या टप्प्यात तेथील सांडपाण्याबाबत उपाय करावे लागणार आहेत. त्यातील आठ गावांमध्ये नाबार्डच्या सहकार्याने शुद्धीकरण प्रकल्प मंजूर झाले आहेत. उर्वरित ३१ गावांकडे आता लक्ष द्यावे लागणार आहे. जिल्हा परिषदेने २०१४ ला ३९ गावांचा १०८ कोटींचा आराखडा सादर केला होता; पण आता ३१ गावांचा आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय दहा साखर कारखाने व औद्योगिक वसाहतीमधून प्रदूषण होते. यासाठी त्यांना युनिटनिहाय नोटिसा देऊन कालमर्यादा द्या. जादा गाळप करणाऱ्यांनी क्षमता वाढवावीगेल्या हंगामात क्षमतेपेक्षा जादा गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांवर फौजदारी दाखल केली आहे. त्यांनी आपल्या वाढलेल्या सांडपाण्याचेही नियोजन करून प्लॅन्टची क्षमता वाढवावी, असे आवाहन दळवी यांनी केले. उचगाव, शिरोली पुलाची, पट्टणकोडोली, हुपरी, कबनूर, रुकडी, हातकणंगले, शिरोळ या आठ गावांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी ‘नाबार्ड’कडून प्रत्येकी साडेचार कोटी उपलब्ध होणार आहेत. यामुळे एकूण प्रदूषणापैकी ५१ टक्के प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असल्याचे दळवी यांनी सांगितले.