शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

कबनूर चौकात वाहनांना कासवगती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:23 IST

अतुल आंबी।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : इचलकरंजी म्हणजे वस्त्रोद्योगातील अग्रेसर शहर. वस्त्रोद्योगाशी निगडित सूत व कापडाची वाहतूक येथे मोठ्या प्रमाणात होते. आसपासच्या ग्रामीण परिसरातील वीस हजारांहून अधिक कामगारांची ये-जा येथे असते. तसेच दररोज दहा हजारांहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी ज्ञानार्जन करण्यासाठी येथे येतात. साहजिकच इचलकरंजीत येणाºया व जाणाºया वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक आहे. ...

अतुल आंबी।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी :इचलकरंजी म्हणजे वस्त्रोद्योगातील अग्रेसर शहर. वस्त्रोद्योगाशी निगडित सूत व कापडाची वाहतूक येथे मोठ्या प्रमाणात होते. आसपासच्या ग्रामीण परिसरातील वीस हजारांहून अधिक कामगारांची ये-जा येथे असते. तसेच दररोज दहा हजारांहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी ज्ञानार्जन करण्यासाठी येथे येतात. साहजिकच इचलकरंजीत येणाºया व जाणाºया वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक आहे. वाहतुकीच्या ‘पिकअवर्स’मध्ये शहरात प्रवेश करण्यासाठी असलेल्या चारही प्रवेशद्वारांवर वाहतूक कोंडी होते. त्याचा व त्यावरील उपायांचा आढावा क्रमश: आजपासून.जिल्ह्यातून शहरात येणारा मुख्य मार्ग म्हणजे इचलकरंजी-कोल्हापूर रोड. मात्र, या मुख्य मार्गावरील कबनूर चौकात वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहनधारकांना येथून जाताना कासवगतीने वाहने चालवावी लागतात. इचलकरंजी बसस्थानक ते कबनूर ओढा हे अवघे तीन किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी लागणाºया वेळेत संबंधित वाहनचालक कबनूर ओढ्यापासून शिरोलीपर्यंत पोहोचू शकतो. दररोज होणारी कोंडी गुरुवारी तर अधिकच जाम होते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे आवश्यक बनले आहे.इचलकरंजीतून दररोज कोल्हापूरला जाणाºयांची संख्या मोठी आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी जाणाºया या मार्गावर दररोज गर्दी असते. बसस्थानक ते एएससी महाविद्यालयापर्यंतचा रस्ता साधारण टप्पा, त्यानंतर एएससी महाविद्यालय ते कोल्हापूर नाका हा दुसरा टप्पा आणि आजरा बॅँक ते कबनूर पेट्रोल पंप हा मुख्य टप्पा. या तीन टप्प्यांत वाहनाची गती मंदावत जाते. तेथून पुढे कबनूर ओढ्यापासून बाहेर पडल्यानंतरच वाहनाला गती मिळते.कोंडी होण्याचे मुख्य कारण बसस्थानक ते एएससी महाविद्यालय या पहिल्या टप्प्यातील वाहतूक मंदावण्याचे मुख्य कारण. अस्ताव्यस्त पार्किंग, रस्त्याकडेला उभारणारे खाद्यपदार्थांचे गाडे, किरकोळ विक्रेत्यांचे अतिक्रमण आणि त्यांच्याकडे येणाºया वाहनधारकांचे होणारे पार्किंग यामुळे वाहनधारकांची गती मंदावते.त्यानंतर दुसºया टप्प्यातील एएससी महाविद्यालय ते कोल्हापूर नाका या मार्गावर रस्ता अतिशय अरुंद बनला आहे. त्याचबरोबर समोरासमोर बसथांबे, अस्ताव्यस्त पार्किंग, दुकानदारांचे फलक, मंगल कार्यालय, बार, हॉटेल, तसेच अन्य दुकानदार यांच्याकडे येणाºया ग्राहकांचे रस्त्यावर होणारे पार्किंग या कारणांमुळे रस्ता अतिशय अरुंद बनला आहे. त्यामुळे या दुसºया टप्प्यातून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. मोटारसायकलस्वारही एखाद्या वाहनाला ओव्हरटेक करून पुढे जाऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती नेहमी या टप्प्यामध्ये असते. बस, ट्रक अशी मोठी वाहने पुढे असल्यास रुग्णवाहिकेलाही ओव्हरटेक करून पुढे जाण्यासाठी वाव मिळत नाही, अशी गंभीर परिस्थिती या टप्प्यात आढळते. त्यातच एखादे मोठे वाहन आल्यास बºयाच वेळा वाहतूक ठप्प होते. आजरा बॅँक ते कबनूर पेट्रोल पंप या टप्प्यात वाहतुकीची वारंवार कोंडी होते. गुरुवारी ग्रामदैवत असलेल्या दर्ग्याला भाविकांची गर्दी होते. त्यादिवशी भाविकांची गर्दी, तसेच त्यांच्याबरोबर असलेली वाहने रस्त्यावरच थांबल्यामुळे वाहतूक बºयाच वेळा आणि वारंवार ठप्प होते. कबनूर चौकामधून चंदूर, रुई, इंगळी, कोल्हापूर, कोरोची, इचलकरंजी याठिकाणची वाहतूक नियमित होत असते. त्यामुळे या चौकात वारंवार कोंडी निर्माण होते.कबनूर चौक पार करून कोल्हापूरकडे जाणाºया वाहनधारकाला या वाहतुकीच्या कोंडीतून थांबत-थांबतच मार्ग काढावा लागतो. वाहनधारकांबरोबरच रुग्णवाहिकेलाही या कोंडीचा सामना करावा लागतो. (क्रमश:)उपाययोजना१ मुख्य मार्गावरील ब्लॉकचा मुख्य टप्पा ओलांडण्यासाठी होणारा त्रास संपविण्यासाठी कबनूर येथे उड्डाण पूल केल्यास यातून इचलकरंजीकडील वाहतुकीचा मोठा ताण कबनूरमधून कमी होईल. तसेच इचलकरंजीवासीयांनाही कोल्हापूरकडे जाताना हा ब्लॉक सहन करावा लागणार नाही.२ दुसºया टप्प्यातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी या मार्गावरील लग्न कार्यालये, हॉटेल, विविध प्रकारची दुकाने यांना त्यांच्याकडे येणाºया ग्राहकांच्या पार्किंगसाठी नियोजन करायला लावणे. इतर ठिकाणी होणाºया अस्ताव्यस्त पार्किंगसाठी सम-विषम पार्किंगचे नियोजन करावे. त्याचबरोबर मार्गावरील अतिक्रमणे हटवावीत.३ तिसºया टप्प्यातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभारणारे खाद्यपदार्थांचे गाडे, त्याच्याभोवती ग्राहकांचे अस्ताव्यस्त होणारे पार्किंग, किरकोळ विक्रेत्यांचे रस्त्यावर अतिक्रमण करून लावलेले विक्रीचे स्टॉल हटविणे. तसेच नियमित पार्किंगसाठी सम-विषम पार्किंगचे नियोजन करणे. अशा उपाययोजना राबविल्यास या मार्गावरील होणारी कोंडी नक्कीच सुरळीत होईल.