शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कबनूर चौकात वाहनांना कासवगती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:23 IST

अतुल आंबी।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : इचलकरंजी म्हणजे वस्त्रोद्योगातील अग्रेसर शहर. वस्त्रोद्योगाशी निगडित सूत व कापडाची वाहतूक येथे मोठ्या प्रमाणात होते. आसपासच्या ग्रामीण परिसरातील वीस हजारांहून अधिक कामगारांची ये-जा येथे असते. तसेच दररोज दहा हजारांहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी ज्ञानार्जन करण्यासाठी येथे येतात. साहजिकच इचलकरंजीत येणाºया व जाणाºया वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक आहे. ...

अतुल आंबी।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी :इचलकरंजी म्हणजे वस्त्रोद्योगातील अग्रेसर शहर. वस्त्रोद्योगाशी निगडित सूत व कापडाची वाहतूक येथे मोठ्या प्रमाणात होते. आसपासच्या ग्रामीण परिसरातील वीस हजारांहून अधिक कामगारांची ये-जा येथे असते. तसेच दररोज दहा हजारांहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी ज्ञानार्जन करण्यासाठी येथे येतात. साहजिकच इचलकरंजीत येणाºया व जाणाºया वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक आहे. वाहतुकीच्या ‘पिकअवर्स’मध्ये शहरात प्रवेश करण्यासाठी असलेल्या चारही प्रवेशद्वारांवर वाहतूक कोंडी होते. त्याचा व त्यावरील उपायांचा आढावा क्रमश: आजपासून.जिल्ह्यातून शहरात येणारा मुख्य मार्ग म्हणजे इचलकरंजी-कोल्हापूर रोड. मात्र, या मुख्य मार्गावरील कबनूर चौकात वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहनधारकांना येथून जाताना कासवगतीने वाहने चालवावी लागतात. इचलकरंजी बसस्थानक ते कबनूर ओढा हे अवघे तीन किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी लागणाºया वेळेत संबंधित वाहनचालक कबनूर ओढ्यापासून शिरोलीपर्यंत पोहोचू शकतो. दररोज होणारी कोंडी गुरुवारी तर अधिकच जाम होते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे आवश्यक बनले आहे.इचलकरंजीतून दररोज कोल्हापूरला जाणाºयांची संख्या मोठी आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी जाणाºया या मार्गावर दररोज गर्दी असते. बसस्थानक ते एएससी महाविद्यालयापर्यंतचा रस्ता साधारण टप्पा, त्यानंतर एएससी महाविद्यालय ते कोल्हापूर नाका हा दुसरा टप्पा आणि आजरा बॅँक ते कबनूर पेट्रोल पंप हा मुख्य टप्पा. या तीन टप्प्यांत वाहनाची गती मंदावत जाते. तेथून पुढे कबनूर ओढ्यापासून बाहेर पडल्यानंतरच वाहनाला गती मिळते.कोंडी होण्याचे मुख्य कारण बसस्थानक ते एएससी महाविद्यालय या पहिल्या टप्प्यातील वाहतूक मंदावण्याचे मुख्य कारण. अस्ताव्यस्त पार्किंग, रस्त्याकडेला उभारणारे खाद्यपदार्थांचे गाडे, किरकोळ विक्रेत्यांचे अतिक्रमण आणि त्यांच्याकडे येणाºया वाहनधारकांचे होणारे पार्किंग यामुळे वाहनधारकांची गती मंदावते.त्यानंतर दुसºया टप्प्यातील एएससी महाविद्यालय ते कोल्हापूर नाका या मार्गावर रस्ता अतिशय अरुंद बनला आहे. त्याचबरोबर समोरासमोर बसथांबे, अस्ताव्यस्त पार्किंग, दुकानदारांचे फलक, मंगल कार्यालय, बार, हॉटेल, तसेच अन्य दुकानदार यांच्याकडे येणाºया ग्राहकांचे रस्त्यावर होणारे पार्किंग या कारणांमुळे रस्ता अतिशय अरुंद बनला आहे. त्यामुळे या दुसºया टप्प्यातून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. मोटारसायकलस्वारही एखाद्या वाहनाला ओव्हरटेक करून पुढे जाऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती नेहमी या टप्प्यामध्ये असते. बस, ट्रक अशी मोठी वाहने पुढे असल्यास रुग्णवाहिकेलाही ओव्हरटेक करून पुढे जाण्यासाठी वाव मिळत नाही, अशी गंभीर परिस्थिती या टप्प्यात आढळते. त्यातच एखादे मोठे वाहन आल्यास बºयाच वेळा वाहतूक ठप्प होते. आजरा बॅँक ते कबनूर पेट्रोल पंप या टप्प्यात वाहतुकीची वारंवार कोंडी होते. गुरुवारी ग्रामदैवत असलेल्या दर्ग्याला भाविकांची गर्दी होते. त्यादिवशी भाविकांची गर्दी, तसेच त्यांच्याबरोबर असलेली वाहने रस्त्यावरच थांबल्यामुळे वाहतूक बºयाच वेळा आणि वारंवार ठप्प होते. कबनूर चौकामधून चंदूर, रुई, इंगळी, कोल्हापूर, कोरोची, इचलकरंजी याठिकाणची वाहतूक नियमित होत असते. त्यामुळे या चौकात वारंवार कोंडी निर्माण होते.कबनूर चौक पार करून कोल्हापूरकडे जाणाºया वाहनधारकाला या वाहतुकीच्या कोंडीतून थांबत-थांबतच मार्ग काढावा लागतो. वाहनधारकांबरोबरच रुग्णवाहिकेलाही या कोंडीचा सामना करावा लागतो. (क्रमश:)उपाययोजना१ मुख्य मार्गावरील ब्लॉकचा मुख्य टप्पा ओलांडण्यासाठी होणारा त्रास संपविण्यासाठी कबनूर येथे उड्डाण पूल केल्यास यातून इचलकरंजीकडील वाहतुकीचा मोठा ताण कबनूरमधून कमी होईल. तसेच इचलकरंजीवासीयांनाही कोल्हापूरकडे जाताना हा ब्लॉक सहन करावा लागणार नाही.२ दुसºया टप्प्यातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी या मार्गावरील लग्न कार्यालये, हॉटेल, विविध प्रकारची दुकाने यांना त्यांच्याकडे येणाºया ग्राहकांच्या पार्किंगसाठी नियोजन करायला लावणे. इतर ठिकाणी होणाºया अस्ताव्यस्त पार्किंगसाठी सम-विषम पार्किंगचे नियोजन करावे. त्याचबरोबर मार्गावरील अतिक्रमणे हटवावीत.३ तिसºया टप्प्यातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभारणारे खाद्यपदार्थांचे गाडे, त्याच्याभोवती ग्राहकांचे अस्ताव्यस्त होणारे पार्किंग, किरकोळ विक्रेत्यांचे रस्त्यावर अतिक्रमण करून लावलेले विक्रीचे स्टॉल हटविणे. तसेच नियमित पार्किंगसाठी सम-विषम पार्किंगचे नियोजन करणे. अशा उपाययोजना राबविल्यास या मार्गावरील होणारी कोंडी नक्कीच सुरळीत होईल.