शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

कबनूर चौकात वाहनांना कासवगती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:23 IST

अतुल आंबी।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : इचलकरंजी म्हणजे वस्त्रोद्योगातील अग्रेसर शहर. वस्त्रोद्योगाशी निगडित सूत व कापडाची वाहतूक येथे मोठ्या प्रमाणात होते. आसपासच्या ग्रामीण परिसरातील वीस हजारांहून अधिक कामगारांची ये-जा येथे असते. तसेच दररोज दहा हजारांहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी ज्ञानार्जन करण्यासाठी येथे येतात. साहजिकच इचलकरंजीत येणाºया व जाणाºया वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक आहे. ...

अतुल आंबी।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी :इचलकरंजी म्हणजे वस्त्रोद्योगातील अग्रेसर शहर. वस्त्रोद्योगाशी निगडित सूत व कापडाची वाहतूक येथे मोठ्या प्रमाणात होते. आसपासच्या ग्रामीण परिसरातील वीस हजारांहून अधिक कामगारांची ये-जा येथे असते. तसेच दररोज दहा हजारांहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी ज्ञानार्जन करण्यासाठी येथे येतात. साहजिकच इचलकरंजीत येणाºया व जाणाºया वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक आहे. वाहतुकीच्या ‘पिकअवर्स’मध्ये शहरात प्रवेश करण्यासाठी असलेल्या चारही प्रवेशद्वारांवर वाहतूक कोंडी होते. त्याचा व त्यावरील उपायांचा आढावा क्रमश: आजपासून.जिल्ह्यातून शहरात येणारा मुख्य मार्ग म्हणजे इचलकरंजी-कोल्हापूर रोड. मात्र, या मुख्य मार्गावरील कबनूर चौकात वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहनधारकांना येथून जाताना कासवगतीने वाहने चालवावी लागतात. इचलकरंजी बसस्थानक ते कबनूर ओढा हे अवघे तीन किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी लागणाºया वेळेत संबंधित वाहनचालक कबनूर ओढ्यापासून शिरोलीपर्यंत पोहोचू शकतो. दररोज होणारी कोंडी गुरुवारी तर अधिकच जाम होते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे आवश्यक बनले आहे.इचलकरंजीतून दररोज कोल्हापूरला जाणाºयांची संख्या मोठी आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी जाणाºया या मार्गावर दररोज गर्दी असते. बसस्थानक ते एएससी महाविद्यालयापर्यंतचा रस्ता साधारण टप्पा, त्यानंतर एएससी महाविद्यालय ते कोल्हापूर नाका हा दुसरा टप्पा आणि आजरा बॅँक ते कबनूर पेट्रोल पंप हा मुख्य टप्पा. या तीन टप्प्यांत वाहनाची गती मंदावत जाते. तेथून पुढे कबनूर ओढ्यापासून बाहेर पडल्यानंतरच वाहनाला गती मिळते.कोंडी होण्याचे मुख्य कारण बसस्थानक ते एएससी महाविद्यालय या पहिल्या टप्प्यातील वाहतूक मंदावण्याचे मुख्य कारण. अस्ताव्यस्त पार्किंग, रस्त्याकडेला उभारणारे खाद्यपदार्थांचे गाडे, किरकोळ विक्रेत्यांचे अतिक्रमण आणि त्यांच्याकडे येणाºया वाहनधारकांचे होणारे पार्किंग यामुळे वाहनधारकांची गती मंदावते.त्यानंतर दुसºया टप्प्यातील एएससी महाविद्यालय ते कोल्हापूर नाका या मार्गावर रस्ता अतिशय अरुंद बनला आहे. त्याचबरोबर समोरासमोर बसथांबे, अस्ताव्यस्त पार्किंग, दुकानदारांचे फलक, मंगल कार्यालय, बार, हॉटेल, तसेच अन्य दुकानदार यांच्याकडे येणाºया ग्राहकांचे रस्त्यावर होणारे पार्किंग या कारणांमुळे रस्ता अतिशय अरुंद बनला आहे. त्यामुळे या दुसºया टप्प्यातून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. मोटारसायकलस्वारही एखाद्या वाहनाला ओव्हरटेक करून पुढे जाऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती नेहमी या टप्प्यामध्ये असते. बस, ट्रक अशी मोठी वाहने पुढे असल्यास रुग्णवाहिकेलाही ओव्हरटेक करून पुढे जाण्यासाठी वाव मिळत नाही, अशी गंभीर परिस्थिती या टप्प्यात आढळते. त्यातच एखादे मोठे वाहन आल्यास बºयाच वेळा वाहतूक ठप्प होते. आजरा बॅँक ते कबनूर पेट्रोल पंप या टप्प्यात वाहतुकीची वारंवार कोंडी होते. गुरुवारी ग्रामदैवत असलेल्या दर्ग्याला भाविकांची गर्दी होते. त्यादिवशी भाविकांची गर्दी, तसेच त्यांच्याबरोबर असलेली वाहने रस्त्यावरच थांबल्यामुळे वाहतूक बºयाच वेळा आणि वारंवार ठप्प होते. कबनूर चौकामधून चंदूर, रुई, इंगळी, कोल्हापूर, कोरोची, इचलकरंजी याठिकाणची वाहतूक नियमित होत असते. त्यामुळे या चौकात वारंवार कोंडी निर्माण होते.कबनूर चौक पार करून कोल्हापूरकडे जाणाºया वाहनधारकाला या वाहतुकीच्या कोंडीतून थांबत-थांबतच मार्ग काढावा लागतो. वाहनधारकांबरोबरच रुग्णवाहिकेलाही या कोंडीचा सामना करावा लागतो. (क्रमश:)उपाययोजना१ मुख्य मार्गावरील ब्लॉकचा मुख्य टप्पा ओलांडण्यासाठी होणारा त्रास संपविण्यासाठी कबनूर येथे उड्डाण पूल केल्यास यातून इचलकरंजीकडील वाहतुकीचा मोठा ताण कबनूरमधून कमी होईल. तसेच इचलकरंजीवासीयांनाही कोल्हापूरकडे जाताना हा ब्लॉक सहन करावा लागणार नाही.२ दुसºया टप्प्यातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी या मार्गावरील लग्न कार्यालये, हॉटेल, विविध प्रकारची दुकाने यांना त्यांच्याकडे येणाºया ग्राहकांच्या पार्किंगसाठी नियोजन करायला लावणे. इतर ठिकाणी होणाºया अस्ताव्यस्त पार्किंगसाठी सम-विषम पार्किंगचे नियोजन करावे. त्याचबरोबर मार्गावरील अतिक्रमणे हटवावीत.३ तिसºया टप्प्यातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभारणारे खाद्यपदार्थांचे गाडे, त्याच्याभोवती ग्राहकांचे अस्ताव्यस्त होणारे पार्किंग, किरकोळ विक्रेत्यांचे रस्त्यावर अतिक्रमण करून लावलेले विक्रीचे स्टॉल हटविणे. तसेच नियमित पार्किंगसाठी सम-विषम पार्किंगचे नियोजन करणे. अशा उपाययोजना राबविल्यास या मार्गावरील होणारी कोंडी नक्कीच सुरळीत होईल.