शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

लालभडक टोमॅटो दोन रुपयांवर, ऐन श्रावणात भाजीपाला घसरला : मेथी दहा रुपयांना तीन पेंढ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 10:48 IST

ऐन श्रावणात भाजीपाल्याचे दर कमालीचे गडगडले आहेत. लालभडक टोमॅटोचा दर अक्षरश: मातीमोल झाला असून, घाऊक बाजारात दोन रुपये, तर किरकोळ बाजारात आठ रुपयांपर्यंत टोमॅटो घसरला आहे.

ठळक मुद्देलालभडक टोमॅटो दोन रुपयांवर, ऐन श्रावणात भाजीपाला घसरला मेथी दहा रुपयांना तीन पेंढ्या

कोल्हापूर : ऐन श्रावणात भाजीपाल्याचे दर कमालीचे गडगडले आहेत. लालभडक टोमॅटोचा दर अक्षरश: मातीमोल झाला असून, घाऊक बाजारात दोन रुपये, तर किरकोळ बाजारात आठ रुपयांपर्यंत टोमॅटो घसरला आहे.

मेथीची आवक वाढल्याने दर उतरले आहेत. किरकोळ बाजारात दहा रुपयांना मेथीच्या तीन पेंढ्यांची विक्री सुरू आहे. या तुलनेत फळबाजार स्थिर आहे. कडधान्य बाजारामध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत फारशी चढउतार दिसत नाही.श्रावण महिन्यामुळे भाजीपाल्याची मागणी वाढते आणि दर भडकतात. त्यात यंदा पाऊस जास्त असल्याने आवक कमी होऊन भाज्यांची चणचण भासेल, असा अंदाज होता; पण ऐन श्रावणात भाजीपाल्याची आवक वाढल्याने दर घसरले आहेत. घाऊक बाजारात कोबीचा दर सरासरी चार रुपये किलो राहिला आहे. वांगी, ढब्बू, घेवड्याचा दर २० रुपये किलोपर्यंत खाली आला आहे.

गवार, ओला वाटाणा, कारली, भेंडी व वरणा ४० रुपये किलो आहे. टोमॅटोचा दर सगळ्यांत खाली आला आहे. घाऊक बाजारात दर सरासरी साडेसहा रुपये किलो असला तरी बहुतांश टोमॅटो दोन रुपये किलोनेच जातो. कोथिंबिरीची आवक स्थिर आहे. पाच ते सात रुपये पेंढी आहे.

मेथीची रोज २५ हजार पेंढीपेक्षा अधिक आवक सुरू असल्याने दरात घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात दहा रुपयांना तीन पेंढ्या विक्री आहे. कांदापात, शेपू, पालक या पालेभाज्यांना मागणी चांगली असली तरी दरात चढउतार नाही.

फळमार्केटमध्ये डाळींब, सीताफळ, पेरू, पपईची रेलचेल सुरू आहे. सफरचंदची आवकही चांगली असून दर ८० ते १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे. डाळींब ३० रुपये किलो आहे. कडधान्य मार्केटमध्ये फारशी चढउतार दिसत नाही. तूरडाळ, हरभराडाळ, मटकी, मुगाचे दर स्थिर आहेत. साखरेचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत कायम आहेत. कांदा व बटाट्याची आवक स्थिर असल्याने दरात फारसा फरक पडलेला नाही.

मोरावळ्याची आवक वाढलीशहरातील मंडईत मोरावळ्याची आवक सुरू झाली आहे; पण त्याचा अपेक्षित उठाव दिसत नसल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.‘घटप्रभा’ची आवक जोरातकोल्हापूर बाजार समितीत सांगली, कर्नाटकातून भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होते; पण अलीकडे ‘घटप्रभा’ येथून भाजीपाला कोल्हापुरात येऊ लागला आहे. श्रावणाच्या पार्श्वभूमीवर आवक वाढल्याने भाज्यांचे दर घसरल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.

 

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर