शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

भाजीपाला खरेदीदारांचा संप मागे..

By admin | Updated: March 8, 2017 00:42 IST

समन्वयासाठी समितीची स्थापना : अडतीचा विषय अडते-व्यापाऱ्यांच्या पातळीवर सोडविण्याचा निर्णय

कोल्हापूर : बाजार समितीच्या भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी संप मागे घेत आज, बुधवारपासून खरेदी नियमित करण्याचा निर्णय जाहीर केला. ६ टक्के अडतीविषयी अडते व व्यापाऱ्यांच्या पातळीवर सोडवून इतर मागण्यांबाबत समन्वय व समितीची स्थापनाही करण्यात आली. भाजीपाला मार्केटमधील ‘मोघम पद्धती’ बंद करा, ६ टक्के अडत रद्द करा, सौदा सकाळी पाच ते सात या वेळेत काढा, या मागणीसाठी गेले आठ दिवस समितीमधील भाजीपाला व्यापाऱ्यांनी ‘खरेदी बंद’ आंदोलन सुरू केले. अडते, व्यापारी व समिती प्रशासन यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, पण व्यापारी अडत न देण्यावर ठाम राहिल्याने पेच निर्माण झाला होता. मंगळवारी सकाळपासून भाजीपाला विक्रेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात उपोषणास सुरुवात केल्याने प्रकरण चांगलेच चिघळले होते. त्यामुळे दुपारनंतर संप मागे घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले. सायंकाळी सहा वाजता बाजार समितीच्या सभागृहात अडते व व्यापाऱ्यांची बैठक होऊन विविध विषयांवर जोरदार चर्चा झाली. शेतकरी माल भरताना भाजीच्या खाली एक ते दोन किलो पाला घालतात त्याचा फटका बसतो. वांग्यांच्या करंडीत वर चांगला माल आणि तळाला मोठा माल घातल्याने मोठे नुकसान होत असल्याचे व्यापाऱ्यांनी निदर्शने आणून देत त्यात अडत द्यायची म्हटले तर आमचे कंबरडे मोडते, अशी व्यापाऱ्यांनी कैफियत मांडली. अडतीचा विषय सरकारच्या पातळीवर असल्याने येथे काहीच निर्णय होणार नाही. त्यात हातावर पोट असणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या अधिक आहे. गेले आठ दिवस सगळ्यांनाच त्रास झाल्याने अडतीचा विषय बाजूला ठेवून संप मागे घेत असल्याचे व्यापाऱ्यांनी बैठकीत सांगितले. सभापती सर्जेराव पाटील, नंदकुमार वळंजू, सदानंद कोरगांवकर, जमीर बागवान, विलास मेढे, राजू लायकर आदी उपस्थित होते. अडतीचा विषयी सरकारच्या पातळीवर असल्याने त्या पातळीवर आम्ही प्रयत्न करणार आहे. संपामुळे गोरगरीब व्यापाऱ्यांच्या नुकसानीचा विचार त्यामुळे संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. - मेहबूब बागवान (किरकोळ भाजीपाला विक्रेता संघटना) अडतीबाबत सरकारच्या पातळीवर लढा देण्यासाठी व्यापाऱ्यांना आम्ही पाठबळ देऊ, या मुद्द्यावरच संप मिटला. - जमीर बागवान (अध्यक्ष, भाजीपाला व्यापारी असोसिएशन) व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन तोडगा काढला, त्यांच्या इतर मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ पण येथून पुढे पूर्वकल्पना न देता मार्केट बंद पाडायचे नाही. यासाठी समितीची स्थापना केली आहे. - नंदकुमार वळंजू (व्यापारी प्रतिनिधी) अडत ५०-५० टक्के?व्यापाऱ्यांना ६ टक्के अडत अडचणीची ठरत असल्याने त्यातील ३ टक्के अडत अडत दुकानदारांनी सोसावी, असा एक प्रवाह चर्चेदरम्यान पुढे आला. त्यामुळे अडतीचा विषयी दोघांच्या पातळीवर सोडून संप मागे घेण्यात आल्याचे समजते. कायद्याने अडत व्यापाऱ्यांकडूनच खरेदी करावी लागते. व्यापाऱ्यांच्या इतर मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ. आठ दिवसांच्या कोंडीमुळे सर्वच घटकांना त्रास झाला, अखेर व्यापाऱ्यांनी समजूतदारपणा घेतल्याने मार्ग निघाला. - सर्जेराव पाटील-गवशीकर सभापती, बाजार समिती