शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

इचलकरंजीसाठी वारणा नळ योजना दिवास्वप्नच :राजकीय अनास्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 00:03 IST

शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा व कृष्णा अशा दोन योजना असूनही गळती व पंपांची क्षमता कमी झाल्याने आवश्यक असलेल्या ५४ दशलक्ष लिटर पाण्याऐवजी ६० टक्के पाणीपुरवठा होतो. त्यासाठी वारणा नळ योजना

ठळक मुद्देदोन योजना; पण तीन दिवसांतून एकवेळ पाणी

राजाराम पाटील ।इचलकरंजी : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा व कृष्णा अशा दोन योजना असूनही गळती व पंपांची क्षमता कमी झाल्याने आवश्यक असलेल्या ५४ दशलक्ष लिटर पाण्याऐवजी ६० टक्के पाणीपुरवठा होतो. त्यासाठी वारणा नळ योजना प्रस्तावित असूनही तिला होणारा विरोध पाहता शाश्वत व शुद्ध पाणी दररोज मिळणे हे शहरवासीयांसाठी सध्यातरी दिवास्वप्नच आहे. परिणामी, पावसाळ्यात सुद्धा इचलकरंजीकरांना तीन दिवसांतून एकवेळ पाणीपुरवठा होत आहे.

पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा करण्याची नळ योजना संस्थानकालीन आहे. त्यावेळी इचलकरंजीत विविध ठिकाणी जमिनीत व जमिनीवर बांधलेल्या हौदातून नागरिक घरी पाणी नेत असत. अशा प्रकारे महादेव मंदिर, मुजुमदार, फडणीस, गणपती, नारायण, आदी ठिकाणी दगडी बांधलेले हौद होते. तर मोठे तळे याठिकाणी सुद्धा पाण्याची सोय केली होती.

साधारणत: ५० वर्षांपूर्वी नगरपालिकेने नळाद्वारे घरोघरी पाणीपुरवठा केला. पाणीपुरवठ्यासाठी पंचगंगा नदीवरील जॅकवेलवर १२५ अश्वशक्तीचे दोन पाणी उपसा पंप आहेत. मात्र, पंप जुने झाल्याने त्यांची क्षमता कमी झाली आहे. २५ वर्षांपूर्वीपासून पंचगंगा नदी प्रदूषित झाली आणि कृष्णा नदीवरून मजरेवाडी (ता. शिरोळ) येथून पाणीपुरवठा करणारी योजना कार्यान्वित झाली. कृष्णा योजनेची दाबनलिका सडली असून, तिला वारंवार गळती लागत आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी ही योजना अनेकवेळा बंद ठेवावी लागते, तर पंपांचीही क्षमता कमी झाली. त्यामुळे दोन्ही नळ योजनांतून ३५ दशलक्ष लिटर इतकेच पाणी मिळते आहे. म्हणून इचलकरंजीसाठी शुद्ध व शाश्वत पाणी मिळावे म्हणून दानोळी (ता. शिरोळ) येथून वारणा नदीतून पाण्याचा उपसा करणारी नळ योजना शासनाने मंजूर केली.

मात्र, या योजनेला तीव्र विरोध झाला. मे महिन्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीत वारणा योजनेसाठी दानोळीऐवजी कोथळी येथून पाणी उपसा करण्याचे ठरविण्यात आले. ही योजना पूर्ण होईपर्यंत गळकी असलेल्या कृष्णा योजनेची दाबनलिका व पंप बदलणे हा प्रस्ताव पालिकेने शासनाकडे ताबडतोब द्यावा, असे निर्देश मंत्र्यांनी दिले. त्यानंतर तब्बल अडीच महिन्यांनी कृष्णा योजनेची अकरा किलोमीटर लांबीची दाबनलिका व एक पंप बदलणे, अशा २६ कोटी रुपयांच्या प्रस्तावास जीवन प्राधिकरणने तांत्रिक मंजुरी दिली आहे. आता कोथळी येथून सुद्धा पाण्याचा उपसा करण्यासाठी विरोध होऊ लागला आहे.कृष्णेसाठी युद्धपातळीवर प्रयत्नकृष्णा नळ योजनेची दाबनलिका व पंप बदलणे आणि दाबनलिकेसाठी पंचगंगा नदीवर पूल बांधणे, अशा प्रस्तावास तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. आता हा प्रस्ताव नगरविकास मंत्रालयाकडे तातडीने पाठविण्यात येईल आणि या प्रस्तावास त्वरित मंजुरी मिळावी, यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या मदतीने युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येतील. जेणेकरून नजीकच्या पाच-सहा महिन्यांमध्ये कृष्णा नळ योजना पूर्ण क्षमतेने चालू होईल. याकरिता पाणीपुरवठा विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती जलअभियंता अजय साळुंखे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwater transportजलवाहतूकwater shortageपाणीटंचाई