शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

इचलकरंजीसाठी वारणा नळ योजना दिवास्वप्नच :राजकीय अनास्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 00:03 IST

शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा व कृष्णा अशा दोन योजना असूनही गळती व पंपांची क्षमता कमी झाल्याने आवश्यक असलेल्या ५४ दशलक्ष लिटर पाण्याऐवजी ६० टक्के पाणीपुरवठा होतो. त्यासाठी वारणा नळ योजना

ठळक मुद्देदोन योजना; पण तीन दिवसांतून एकवेळ पाणी

राजाराम पाटील ।इचलकरंजी : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा व कृष्णा अशा दोन योजना असूनही गळती व पंपांची क्षमता कमी झाल्याने आवश्यक असलेल्या ५४ दशलक्ष लिटर पाण्याऐवजी ६० टक्के पाणीपुरवठा होतो. त्यासाठी वारणा नळ योजना प्रस्तावित असूनही तिला होणारा विरोध पाहता शाश्वत व शुद्ध पाणी दररोज मिळणे हे शहरवासीयांसाठी सध्यातरी दिवास्वप्नच आहे. परिणामी, पावसाळ्यात सुद्धा इचलकरंजीकरांना तीन दिवसांतून एकवेळ पाणीपुरवठा होत आहे.

पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा करण्याची नळ योजना संस्थानकालीन आहे. त्यावेळी इचलकरंजीत विविध ठिकाणी जमिनीत व जमिनीवर बांधलेल्या हौदातून नागरिक घरी पाणी नेत असत. अशा प्रकारे महादेव मंदिर, मुजुमदार, फडणीस, गणपती, नारायण, आदी ठिकाणी दगडी बांधलेले हौद होते. तर मोठे तळे याठिकाणी सुद्धा पाण्याची सोय केली होती.

साधारणत: ५० वर्षांपूर्वी नगरपालिकेने नळाद्वारे घरोघरी पाणीपुरवठा केला. पाणीपुरवठ्यासाठी पंचगंगा नदीवरील जॅकवेलवर १२५ अश्वशक्तीचे दोन पाणी उपसा पंप आहेत. मात्र, पंप जुने झाल्याने त्यांची क्षमता कमी झाली आहे. २५ वर्षांपूर्वीपासून पंचगंगा नदी प्रदूषित झाली आणि कृष्णा नदीवरून मजरेवाडी (ता. शिरोळ) येथून पाणीपुरवठा करणारी योजना कार्यान्वित झाली. कृष्णा योजनेची दाबनलिका सडली असून, तिला वारंवार गळती लागत आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी ही योजना अनेकवेळा बंद ठेवावी लागते, तर पंपांचीही क्षमता कमी झाली. त्यामुळे दोन्ही नळ योजनांतून ३५ दशलक्ष लिटर इतकेच पाणी मिळते आहे. म्हणून इचलकरंजीसाठी शुद्ध व शाश्वत पाणी मिळावे म्हणून दानोळी (ता. शिरोळ) येथून वारणा नदीतून पाण्याचा उपसा करणारी नळ योजना शासनाने मंजूर केली.

मात्र, या योजनेला तीव्र विरोध झाला. मे महिन्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीत वारणा योजनेसाठी दानोळीऐवजी कोथळी येथून पाणी उपसा करण्याचे ठरविण्यात आले. ही योजना पूर्ण होईपर्यंत गळकी असलेल्या कृष्णा योजनेची दाबनलिका व पंप बदलणे हा प्रस्ताव पालिकेने शासनाकडे ताबडतोब द्यावा, असे निर्देश मंत्र्यांनी दिले. त्यानंतर तब्बल अडीच महिन्यांनी कृष्णा योजनेची अकरा किलोमीटर लांबीची दाबनलिका व एक पंप बदलणे, अशा २६ कोटी रुपयांच्या प्रस्तावास जीवन प्राधिकरणने तांत्रिक मंजुरी दिली आहे. आता कोथळी येथून सुद्धा पाण्याचा उपसा करण्यासाठी विरोध होऊ लागला आहे.कृष्णेसाठी युद्धपातळीवर प्रयत्नकृष्णा नळ योजनेची दाबनलिका व पंप बदलणे आणि दाबनलिकेसाठी पंचगंगा नदीवर पूल बांधणे, अशा प्रस्तावास तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. आता हा प्रस्ताव नगरविकास मंत्रालयाकडे तातडीने पाठविण्यात येईल आणि या प्रस्तावास त्वरित मंजुरी मिळावी, यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या मदतीने युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येतील. जेणेकरून नजीकच्या पाच-सहा महिन्यांमध्ये कृष्णा नळ योजना पूर्ण क्षमतेने चालू होईल. याकरिता पाणीपुरवठा विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती जलअभियंता अजय साळुंखे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwater transportजलवाहतूकwater shortageपाणीटंचाई