शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-मुंबईसाठीही हवी 'वंदे भारत'; तीन खासदार असूनही अपेक्षाभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 17:57 IST

एकाही खासदारांकडून कोल्हापूर ते मुंबई वंदे भारतची मागणी का होत नाही

कोल्हापूर : मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अशा दोन वंदे भारत रेल्वे गाड्या सुरु झाल्या. दुसरीकडे कोल्हापूरहून मुंबईकडे सुटणाऱ्या केवळ दोनच रेल्वे उरल्या आहेत. मागणी असतानाही अन्य गाड्या रद्द झालेल्या आहेत किंवा कायमच्या बंद करण्यात आल्या आहेत. संसदेत कोल्हापूरचे तीन खासदार आहेत; पण एकाही खासदारांकडून कोल्हापूर ते मुंबई वंदे भारतची मागणी का होत नाही. असा सवाल प्रवाशांकडून होत आहे.कोराेनापूर्वी कोल्हापूरहून मुंबईला जाण्यासाठी महालक्ष्मी, सह्याद्री आणि कोयना अशा तीन रेल्वे सुरळीत सुरु होत्या; मात्र प्रवाशांचा प्रतिसाद कमी म्हणून यातील सह्याद्री एक्स्प्रेस रेल्वे प्रशासनाने कायमची रद्द केली. कोरोनानंतर ही रेल्वे पूर्ववत सुरु होणे गरजेचे होते; मात्र अद्यापही ही रेल्वे सुरु झालेली नाही. कोल्हापूरहून मुंबईला कामानिमित्त जाणाऱ्या उद्योजक, नोकरदार, व्यापारी, वकील, प्रशासनातील अधिकारी व सामान्य नागरिक अशा पाच ते सात हजार प्रवाशांना अन्य प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे येत्या काळात याही रेल्वे गाड्या सुरु राहतात की नाही याची खात्री प्रवाशांना नाही. ज्या भागातील राज्यकर्ते आणि खासदार स्ट्राँग त्या भागात नियमित काय वंदे भारत सारखी विशेष रेल्वेही सुरु होते; पण कोल्हापूरला तीन तीन खासदार असूनही मुंबईला जाण्यासाठी जादा रेल्वे सुरु कराव्यात. अशी जोरदार मागणी रेल्वे मंत्रालयाकडे होत नाही हे विशेषच म्हणावे लागेल. कोल्हापूर ते पुणे मार्गावर दुहेरीकरण सुरु आहे. त्यामुळे कोल्हापूर-पुणे, पुणे-कोल्हापूर, सातारा- कोल्हापूर, कोल्हापूर-सातारा ही पॅसेंजर सेवाही २ मार्च २०२३ पर्यंत बंद करण्यात आली आहे. अन्य वाहनांचा आधार सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा नाही; पण विचार कोण करणार असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.वंदे भारत रेल्वे आवश्यककोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यात मुंबईकरांचा अग्रक्रम लागतो. तर कोल्हापूरहून २००० प्रवाशांचे आरक्षण महालक्ष्मी आणि कोयना एक्स्प्रेससाठी रोज आहे. वंदे भारत सारखी रेल्वे सुरु झाली तर अन्य प्रवाशांचा प्रवासही सुलभ होईल आणि पर्यटन वाढीसाठी उपयोगही होईल.

दुहेरीकरण ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. विधानसभा आणि राज्यसभेच्या निवडणुकांपूर्वी हे काम पूर्ण होण्याची शक्यता अधिक आहे. त्यानंतर वंदे भारत सारख्या रेल्वे कोल्हापूरला सुरु होतील. खासदार धनंजय महाडिक, संजय मंडलिक, धैर्यशील माने यांनीही हा प्रश्न संसदेत लावून धरावा. - मोहन शेटे, रेल्वे अभ्यासक, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMumbaiमुंबईrailwayरेल्वेVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस