शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

कोल्हापूर-मुंबईसाठीही हवी 'वंदे भारत'; तीन खासदार असूनही अपेक्षाभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 17:57 IST

एकाही खासदारांकडून कोल्हापूर ते मुंबई वंदे भारतची मागणी का होत नाही

कोल्हापूर : मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अशा दोन वंदे भारत रेल्वे गाड्या सुरु झाल्या. दुसरीकडे कोल्हापूरहून मुंबईकडे सुटणाऱ्या केवळ दोनच रेल्वे उरल्या आहेत. मागणी असतानाही अन्य गाड्या रद्द झालेल्या आहेत किंवा कायमच्या बंद करण्यात आल्या आहेत. संसदेत कोल्हापूरचे तीन खासदार आहेत; पण एकाही खासदारांकडून कोल्हापूर ते मुंबई वंदे भारतची मागणी का होत नाही. असा सवाल प्रवाशांकडून होत आहे.कोराेनापूर्वी कोल्हापूरहून मुंबईला जाण्यासाठी महालक्ष्मी, सह्याद्री आणि कोयना अशा तीन रेल्वे सुरळीत सुरु होत्या; मात्र प्रवाशांचा प्रतिसाद कमी म्हणून यातील सह्याद्री एक्स्प्रेस रेल्वे प्रशासनाने कायमची रद्द केली. कोरोनानंतर ही रेल्वे पूर्ववत सुरु होणे गरजेचे होते; मात्र अद्यापही ही रेल्वे सुरु झालेली नाही. कोल्हापूरहून मुंबईला कामानिमित्त जाणाऱ्या उद्योजक, नोकरदार, व्यापारी, वकील, प्रशासनातील अधिकारी व सामान्य नागरिक अशा पाच ते सात हजार प्रवाशांना अन्य प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे येत्या काळात याही रेल्वे गाड्या सुरु राहतात की नाही याची खात्री प्रवाशांना नाही. ज्या भागातील राज्यकर्ते आणि खासदार स्ट्राँग त्या भागात नियमित काय वंदे भारत सारखी विशेष रेल्वेही सुरु होते; पण कोल्हापूरला तीन तीन खासदार असूनही मुंबईला जाण्यासाठी जादा रेल्वे सुरु कराव्यात. अशी जोरदार मागणी रेल्वे मंत्रालयाकडे होत नाही हे विशेषच म्हणावे लागेल. कोल्हापूर ते पुणे मार्गावर दुहेरीकरण सुरु आहे. त्यामुळे कोल्हापूर-पुणे, पुणे-कोल्हापूर, सातारा- कोल्हापूर, कोल्हापूर-सातारा ही पॅसेंजर सेवाही २ मार्च २०२३ पर्यंत बंद करण्यात आली आहे. अन्य वाहनांचा आधार सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा नाही; पण विचार कोण करणार असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.वंदे भारत रेल्वे आवश्यककोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यात मुंबईकरांचा अग्रक्रम लागतो. तर कोल्हापूरहून २००० प्रवाशांचे आरक्षण महालक्ष्मी आणि कोयना एक्स्प्रेससाठी रोज आहे. वंदे भारत सारखी रेल्वे सुरु झाली तर अन्य प्रवाशांचा प्रवासही सुलभ होईल आणि पर्यटन वाढीसाठी उपयोगही होईल.

दुहेरीकरण ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. विधानसभा आणि राज्यसभेच्या निवडणुकांपूर्वी हे काम पूर्ण होण्याची शक्यता अधिक आहे. त्यानंतर वंदे भारत सारख्या रेल्वे कोल्हापूरला सुरु होतील. खासदार धनंजय महाडिक, संजय मंडलिक, धैर्यशील माने यांनीही हा प्रश्न संसदेत लावून धरावा. - मोहन शेटे, रेल्वे अभ्यासक, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMumbaiमुंबईrailwayरेल्वेVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस