शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितांच्या छळाचे दीड वर्षात १५२ गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:44 IST

एकनाथ पाटील ।कोल्हापूर : पती व सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी होणाºया विवाहितांच्या छळाच्या गुन्ह्यात सासरच्या लोकांना तत्काळ होणारी अटक आता करता येणार नाही. त्याच गुन्ह्यात विवाहिता गंभीर जखमी किंवा मृत्यू पावल्यास अटक केली जाणार आहे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात विवाहितेच्या छळाचे १५२ गुन्हे पोलीस दप्तरी ...

ठळक मुद्दे विवाहितांच्या छळाच्या गुन्ह्यात सासरच्या लोकांना तत्काळ होणारी अटक करता येणार नाही

एकनाथ पाटील ।कोल्हापूर : पती व सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी होणाºया विवाहितांच्या छळाच्या गुन्ह्यात सासरच्या लोकांना तत्काळ होणारी अटक आता करता येणार नाही. त्याच गुन्ह्यात विवाहिता गंभीर जखमी किंवा मृत्यू पावल्यास अटक केली जाणार आहे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात विवाहितेच्या छळाचे १५२ गुन्हे पोलीस दप्तरी दाखल आहेत.हुंडाविरोधी कायद्याच्या गैरवापरावर तीव्र चिंता व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाने चौकशीशिवाय सासरच्यांना अटक करू नका, असे निर्देश पोलिसांना दिले आहे. यानिमित्ताने गावागावांत आणि पोलीस दलातसुद्धा महिलांकडून अनेक प्रकरणांत ४९८ (अ) पती व सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळासंबंधी फिर्यादी दाखल केल्या जात आहेत. त्यानिमित्ताने अशा प्रकरणात कोल्हापूर जिल्ह्यातील सद्य:स्थितीचा घेतलेला आढावा...सन २०१६ मध्ये जानेवारी ते डिसेंबरअखेर महिलांच्या छळाचे ९७ गुन्हे, तर सन २०१७ मध्ये जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत हा आकडा ५५ वर पोहोचला आहे. कित्येकदा कौटुंबिक छळाशी केवळ पतीचा संबंध असतो; परंतु सर्वांवरच सूड उगवायचा म्हणून सासू, सासरे, दीर, भावजय, नणंद, तिचा पती यांच्याविरुद्ध छळाच्या खोट्या तक्रारी केल्या जातात. पाठोपाठ मुलीच होणे, चारित्र्यावर संशय, पतीचा आळशीपणा, कामधंदा न करणे, माहेरहून पैसे आणण्यासाठी लावला जाणारा तगादा, व्यसनाधीनता, नशेत होणारी मारहाण ही कारणे प्रत्येक विवाहितेच्या फिर्यादीमध्ये दिसून येतात. अशा गुन्ह्यांमध्ये कित्येकदा पतीसोबतच कुटुंबातील इतरांचाही नामोल्लेख केला जातो. प्रत्यक्ष छळाशी केवळ पतीचा संबंध असताना इतरांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते. फिर्याद दाखल होताच सासरच्या लोकांना अटक केली जात असे. सर्वोच्च न्यायालयाने हुंड्यासाठी छळाच्या गुन्ह्यात सासरच्या लोकांना तत्काळ अटक करू नये, विवाहिता गंभीर जखमी झाल्यास किंवा मृत्यू पावल्यास अटक करावी, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता सासरच्या लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.छळाची कारणेजिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात कौटुंबिक कलहाच्या अशा प्रकरणांमध्ये समुपदेशन करण्यासाठी पोलिसांमार्फत स्वतंत्र केंद्र चालविले जात आहे. विभक्त कुटुंब, चारित्र्यांवर संशय, दारूचे व्यसन, त्यातून होणारी मारहाण, मुली जन्माला येणे, सतत फोनवर बोलणे, माहेरच्या लोकांचा अवाजवी हस्तक्षेप, पैशांची चणचण, आदी कारणे पुढे आली आहेत.या कारणांमुळे पती-पत्नीमध्ये खटके उडणे, मारहाण, माहेरी निघून जाणे, नातेवाइकांकडून नातेसंबंधाचा कोणताही विचार न करता पोलिसांतील तक्रारीसाठी अथवा थेट न्यायालयातील खटल्यासाठी प्रोत्साहित करणे, असे प्रकार घडत आहेत.माहेरच्या पाठबळामुळे आणि आर्थिक संपन्नतेमुळे अनेकदा मुली इच्छानसूनही पती व सासरच्या विरोधातपोलिसांत तक्रारी दाखल करीत असल्याचे आढळून आले.बदलती संस्कृतीसध्या मुला-मुलींना मोकळीकता हवी आहे. कोणाचेही बंधन नको. पतीसोबत मित्रही हवा, तर पत्नीबरोबर मैत्रीणही हवी, अशा काही मानसिकतेच्या मुला-मुलींच्या तक्रारी केंद्राकडे आल्या आहेत; परंतु समाजामध्ये अशा गोष्टींना मान्यता नसल्याने या तक्रारी वाढू लागल्या आहेत.समुपदेशन केंद्रात गेल्यानंतर मात्र अनेक प्रकरणांत तडजोड होते. त्यांची चूक त्यांना कळते. कित्येकदा तर पती-पत्नीचा वादच नसतो. त्यांच्या नातेवाइकांनी दोघांचेही कान भरून तो उभा केला असल्याचे जाणवते. अशा प्रकरणात विवाहितेला प्रोत्साहित करून गुन्हा दाखल केला जातो.हुंड्यासाठी छळाच्या गुन्ह्यात चोवीस तासांत सासरच्या लोकांना अटक करणे हे बंधनकारक आहे. हे एकमेव कलम महिलांच्या न्याय्य हक्कांसाठी आहे. त्याच कलमामध्ये अटक केली नाही तर महिलांवर फार मोठा अन्याय आहे. महिलांच्या सुरक्षेचे कवच काढून घेणे चुकीचे आहे. - तनुजा शिपूरकर, महिला दक्षता समितीपती-पत्नीमधील भांडणाचे कारण असलेले गैरसमज, हेवेदावे दूर करण्यासाठी समुपदेशन केंद्र हे व्यासपीठ आहे. छळाच्या घटनांमागे कुटुंबाला धरून न राहणे, चारित्र्यावर संशय घेणे ही कारणे आढळून आली आहेत. आमच्याकडे दीड वर्षात ८५४ अर्ज दाखल झाले होते. त्यांपैकी बहुतांश अर्जांवर समझोता काढण्यात आला आहे. - प्रियांका जगताप, सहायक पोलीस निरीक्षकहुंड्यासाठी छळाच्या गुन्ह्यात सासरच्या लोकांना अटक करता येणार नाही, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत आहे. या कायद्याची अंमलबजावणी करताना विशेषत: शासनाने, स्वयंसेवी संस्था, पालक व मुलींनी खरोखरच शारीरिक व मानसिक छळ झाला आहे का? पैशांची मागणी झाली आहे का? याची खात्री करून फिर्याद दाखल करावी. कायद्याचा गैरफायदा घेणाºया तक्रारींना या नवीन निर्णयामुळे आळा बसणार आहे.- प्रा. रूपा शहा, समुपदेशक