क्रीडा पार्श्वभूमी नसणाऱ्या कुटुंबातील वैष्णवीचे यश नेत्रदीपक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:24 IST2021-09-27T04:24:53+5:302021-09-27T04:24:53+5:30
पाडळी खुर्द (ता. करवीर) मध्ये आशियायी रग्बी स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या वैष्णवी पाटीलचा नागरी सत्कार कोपार्डे : कोल्हापूर जिल्ह्यातील मातीत ...

क्रीडा पार्श्वभूमी नसणाऱ्या कुटुंबातील वैष्णवीचे यश नेत्रदीपक
पाडळी खुर्द (ता. करवीर) मध्ये आशियायी रग्बी स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या वैष्णवी पाटीलचा नागरी सत्कार
कोपार्डे : कोल्हापूर जिल्ह्यातील मातीत गुणवत्तेचे व ताकदीचे टाॅनिक आहे. यातून क्रीडा संस्कृती निर्माण करण्यासाठी शाहू महाराजांनी विविध खेळाडूंना व खेळांना राजाश्रय दिला. म्हणून कोल्हापूरच्या क्रीडा वैभवाचा लाभ घेण्यासाठी अनेक खेळाडू कोल्हापूर येथे येतात. खेळाची कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या कुटुंबातील वैष्णवीचे रग्बी खेळातून आंतराष्ट्रीय यश नेत्रदीपक असल्याचे गौरवोद्गार वेस्टर्न फुटबॉल समितीच्या अध्यक्षा मधुरिमा राजे यांनी काढले.
पाडळी खुर्दमध्ये आशियायी रग्बी स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या वैष्णवी पाटीलचा ग्रामस्थांनी नागरी सत्कार केला. या वेळी मधुरिमाराजे बोलत होत्या. माजी आ. चंद्रदीप नरके, करवीर पंचायत समितीच्या सभापती मंगल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम वैष्णवी पाटीलचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. नरके म्हणाले, रग्बी खेळ शारीरिक कष्टाचा आहे. यात ताकद व युक्तीला महत्त्व आहे. वैष्णवीने मुलगी असून या खेळात यश मिळविले आहे. भविष्यात तिला खेळाडूंना मिळणाऱ्या आरक्षणाचा फायदा होणार आहे. या खेळात भारताच्या संघाला आॅलिम्पिकसाठी पात्र करण्याची जबाबदारी पार पाडावी असे सांगितले.
रसिका पाटील यांनी गावातील क्रीडांगणाला भरीव निधी देणार असल्याचे सांगितले. गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, राजेंद्र सूर्यवंशी, क्रीडा अधिकारी बालाजी बलकवडे, डीवायएसपी संदीप पाटील, प्रशिक्षक संदीप पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. या वेळी सरपंच तानाजी पालकर, उपसरपंच सुवर्णा पाटील, कुंभीचे संचालक आनंदराव पाटील उपस्थित होते.
260921\20210926_121536.heic
पाडळी खुर्दमध्ये आशियायी रग्बी स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या वैष्णवी पाटीलचा ग्रामस्थांनी नागरी सत्कार मधुरिमा राजे यांच्या हस्ते झाला. यावेळी माजी आ. चंद्रदीप नरके,शिक्षण सभापती रसिका पाटीलकरवीर पंचायत समितीच्या सभापती मंगल पाटील सरपंच तानाजी पालकर,बाळासाहेब खाडे,राजेंद्र सुर्यवंशी, आनंदराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.