शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

पूर्ण होत नाही धरण, तोपर्यंत शेतकऱ्यांचे मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:20 IST

जिल्ह्यात एकीकडे आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांकडून जोरदार राजकीय मोर्चेबांधणी सुरू आहे. तर दुसरीकडे धामणी खोरा परिसरातील सर्वसामान्य शेतकरी गावोगावी एकत्र येऊन, धामणी प्रकल्प अपूर्ण असल्याने येणाºया निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यासाठी बैठका

ठळक मुद्देनिवडणुकांपूर्वी धामणीचे पाणी पेटणार एकीकडे निवडणुकीची लगीनघाई, तर धामणी खोºयात बहिष्काराची तयारी

कृष्णात पाटील ।सावर्डे : जिल्ह्यात एकीकडे आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांकडून जोरदार राजकीय मोर्चेबांधणी सुरू आहे. तर दुसरीकडे धामणी खोरा परिसरातील सर्वसामान्य शेतकरी गावोगावी एकत्र येऊन, धामणी प्रकल्प अपूर्ण असल्याने येणाºया निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यासाठी बैठका घेत आहे. आतापर्यंत लोकशाही पद्धतीने मोर्चा, आंदोलने केली तरीही शासन दरबारी पाझर फुटलेला नाही. अखेर येथील जनतेने मतदानावर बहिष्कार टाकण्याचे रणशिंग फुंकले आहे. गाववार बैठका घेऊन शासन व लोकप्रतिनिधीबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

धामणी खोरा परिसरात पन्हाळा, गगनबावडा व राधानगरी तालुक्यांतील ५० ते ६० गावांचा समावेश होतो. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील तीन तालुक्यात विभागलेल्या धामणी खोºयात आजही अनेक प्रश्नांनी थैमान घातले आहे. जिव्हाळ्याचा असणारा पाणीप्रश्न आजही धगधगताच राहिला आहे. धामणी नदी उथळ असल्यामुळे सप्टेंबरनंतर वाहणाºया पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत जाते. डिसेंबरअखेर वाहणाºया पाण्याचा स्रोत पूर्ण कमी होत असल्यामुळे दरम्यानच्या काळात वाहणारे पाणी एकदाच अडवून ठेवावे लागते. नैसर्गिक पाण्याच्या कमतरतेमुळे डिसेंबर महिन्यातच नदी कोरडी पडते. त्यामुळे थेंब अन् थेंब पाण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू होते.

चौके ते आंबर्डेपर्यंतच्या ३९ गावांतील शेतकºयांना शेतीच्या पाण्यासाठी शासनाने गवशी, गारिवडे, म्हसुर्ली, घेरिवडे, आंबर्डे याठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले आहेत. परंतु या गळक्या बंधाºयांनी पाण्याचा साठा होत नसल्याने केवळ वाहतुकीसाठी बंधाºयांचा उपयोग होतो. त्यामुळे पावसाळा संपताच पाण्यासाठी दरवर्षी शेतकºयांना स्वखर्च करून बंधाºयाशेजारीच मातीचा पर्यायी बंधारा घालावा लागतो. ट्रॅक्टर, जेसीबीच्या साहाय्याने हा बंधारा पूर्ण करावा लागतो. यासाठी माती, झाडांच्या फांद्या यांचाही मोठ्या प्रमाणात वापर करावा लागत असल्याने जंगल संपत्ती व सुपीक मातीचा ºहास होत आहे.धामणी नदीवर अशा पद्धतीच्या समांतर बंधाºयासह लहान-मोठे सुमारे आठ ते नऊ बंधारे घातले जात असून, दरवर्षी सुमारे २0 लाख रुपये खर्च करावा लागतो. तसेच जीव धोक्यात घालून शेतकºयांना काम करावे लागत आहे. परिणामी, मातीच्या बंधाºयांमुळे बळिराजा अक्षरश: मेटाकुटीस आला आहे.

धामणी परिसरातील शेतकºयांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी रखडलेल्या धामणी मध्यम प्रकल्पाचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. सन २००० साली धामणी मध्यम प्रकल्पाच्या कामाला सुरूवात झाली. आज वीस वर्षे पूर्ण झाली. पण या प्रकल्पाचे काम अर्धवटच आहे. परिसरात कोणताच प्रकल्प नसल्याने शेतकºयांना फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पाणी संपत आले की वाळत चाललेल्या पिकांकडे केविलवाण्या नजरेने बघण्याशिवाय कोणताच पर्याय नसतो.शेवटी शेतकरी आभाळाकडे नजरा लावून चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहात बसतो. प्रत्येक वर्षाचे हे दुष्टचक्र असल्याने येथील शेतकरी शेती असूनही आर्थिक मागासलेला आहे.ठराव गोळा करण्याचे काम सुरूलोकप्रतिनिधी फक्त निवडणूक लागली की यावर्षी धामणी प्रकल्प पूर्ण केला जाईल, असे आश्वासने देत मतांचा जोगवा मागतात. निवडणूक होताच पुन्हा ये रे माझ्या मागल्या.. अशी गत होत आहे. या सर्व भूलथापांना वैतागून शेतकºयांनी मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत धामणी प्रकल्प पूर्ण होत नाही. या परिसरातील जनतेचा पाण्याचा वनवास संपत नाही तोपर्यंत येणाºया निवडणुकांवर बहिष्कार टाकला जाणार आहे. आता नाही तर केव्हाच नाही, अशा निर्णयाप्रत शेतकरी आला आहे. परिसरातील चाळीस वाड्या-वस्त्यांतील नागरिक मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत. त्यासाठी धामणी खोरा विकास कृती समितीकडून गाववार सभा घेऊन ग्रामपंचायतींचा बहिष्कार निर्णयाचा ठराव गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरण