शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

पूरग्रस्तांचे मनोधैर्य वाढविण्याचा विद्यापीठाचा ‘मानस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 00:37 IST

प्रदीप शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : नैसर्गिक आपत्तीमध्ये आयुष्यभराची कमाई पाण्यात वाहून गेल्याने मानसिकदृष्ट्या खचलेल्या पूरग्रस्तांचे मनोधैर्य ...

प्रदीप शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : नैसर्गिक आपत्तीमध्ये आयुष्यभराची कमाई पाण्यात वाहून गेल्याने मानसिकदृष्ट्या खचलेल्या पूरग्रस्तांचे मनोधैर्य वाढविण्याचा ‘मानस’ शिवाजी विद्यापीठाच्या वतीने करण्यात आला आहे. मानसशास्त्र अधिविभागाच्या पुढाकाराने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील विविध कॉलेजमध्ये शिकणारे ‘मानसशास्त्र’चे एम.ए. भाग दोनचे विद्यार्थी पूरग्रस्तांचे समुपदेशन करणार आहेत.विद्यापीठात मानसशास्त्र अधिविभागाच्या वतीने नुकतीच ‘पूरगस्तांचे समुपदेशन’ कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये कोल्हापुरातील महावीर, राजाराम महाविद्यालय, सांगलीतील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, केबीपी कॉलेज (इस्लामपूर), एसजीएम कॉलेजचे (कºहाड) मानसशास्त्र विषयाचे विद्यार्थी सामील झाले होते. या विद्यार्थ्यांचा गट पूरबाधित गावांत जाऊन संवाद साधणार असून, पूरग्रस्तांंच्या मानसिकतेचे आकलन करणार आहेत. यानंतर हे विद्यार्थी संबंधितांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न करणार आहेत. यासाठी ‘आरईबीटी’ या थेरपीचा वापर करणार आहेत. हा उपक्रम दर शनिवारी व रविवारी राबविला जाणार आहे. यामध्ये १०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, मानसशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. भारती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिविभागातील प्रा. डॉ. अश्विनी पाटील, प्रा. अमोल कांबळेंसह डॉ. भरत नाईक (महावीर कॉलेज), डॉ. विकास मिणचेकर (केडब्लूसी), डॉ. घन:शाम कांबळे (एबीपी कॉलेज), प्रा. स्वाती मोरकर (एसजीएम), प्रा. विजय मुतनाळे (राजाराम कॉलेज) विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.‘आरईबीटी’ थेरपीच्या आधारे समुपदेशनविद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या ‘पूरग्रस्तांचे समुपदेशन’कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलेले ‘मानसशास्त्र’चे विद्यार्थी हे पूरबाधित गावात जाऊन शाळेतील मुले, तरुण-तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक, आदींशी संवाद साधणार आहेत. त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. यावेळी त्यांच्यावरील ताण-तणावांचेही आकलन करून ‘आरईबीटी’ थेरपीच्या आधारे समुपदेश करणार आहेत.पूरग्रस्तांमधील लक्षणेभीती, निद्रानाश, झोप नीट न लागणे, छातीमध्ये धडधड वाढणे, उदासीनता ही लक्षणे प्रामुख्याने पूरग्रस्तांमध्ये दिसतात. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मानसिक खच्चीकरण होण्याची शक्यता असते.