शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
4
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
5
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
6
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
7
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
8
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
9
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
10
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
11
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
12
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
13
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
14
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
15
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
16
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
17
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
18
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
19
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
20
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!

पूरग्रस्तांचे मनोधैर्य वाढविण्याचा विद्यापीठाचा ‘मानस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 00:37 IST

प्रदीप शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : नैसर्गिक आपत्तीमध्ये आयुष्यभराची कमाई पाण्यात वाहून गेल्याने मानसिकदृष्ट्या खचलेल्या पूरग्रस्तांचे मनोधैर्य ...

प्रदीप शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : नैसर्गिक आपत्तीमध्ये आयुष्यभराची कमाई पाण्यात वाहून गेल्याने मानसिकदृष्ट्या खचलेल्या पूरग्रस्तांचे मनोधैर्य वाढविण्याचा ‘मानस’ शिवाजी विद्यापीठाच्या वतीने करण्यात आला आहे. मानसशास्त्र अधिविभागाच्या पुढाकाराने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील विविध कॉलेजमध्ये शिकणारे ‘मानसशास्त्र’चे एम.ए. भाग दोनचे विद्यार्थी पूरग्रस्तांचे समुपदेशन करणार आहेत.विद्यापीठात मानसशास्त्र अधिविभागाच्या वतीने नुकतीच ‘पूरगस्तांचे समुपदेशन’ कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये कोल्हापुरातील महावीर, राजाराम महाविद्यालय, सांगलीतील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, केबीपी कॉलेज (इस्लामपूर), एसजीएम कॉलेजचे (कºहाड) मानसशास्त्र विषयाचे विद्यार्थी सामील झाले होते. या विद्यार्थ्यांचा गट पूरबाधित गावांत जाऊन संवाद साधणार असून, पूरग्रस्तांंच्या मानसिकतेचे आकलन करणार आहेत. यानंतर हे विद्यार्थी संबंधितांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न करणार आहेत. यासाठी ‘आरईबीटी’ या थेरपीचा वापर करणार आहेत. हा उपक्रम दर शनिवारी व रविवारी राबविला जाणार आहे. यामध्ये १०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, मानसशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. भारती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिविभागातील प्रा. डॉ. अश्विनी पाटील, प्रा. अमोल कांबळेंसह डॉ. भरत नाईक (महावीर कॉलेज), डॉ. विकास मिणचेकर (केडब्लूसी), डॉ. घन:शाम कांबळे (एबीपी कॉलेज), प्रा. स्वाती मोरकर (एसजीएम), प्रा. विजय मुतनाळे (राजाराम कॉलेज) विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.‘आरईबीटी’ थेरपीच्या आधारे समुपदेशनविद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या ‘पूरग्रस्तांचे समुपदेशन’कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलेले ‘मानसशास्त्र’चे विद्यार्थी हे पूरबाधित गावात जाऊन शाळेतील मुले, तरुण-तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक, आदींशी संवाद साधणार आहेत. त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. यावेळी त्यांच्यावरील ताण-तणावांचेही आकलन करून ‘आरईबीटी’ थेरपीच्या आधारे समुपदेश करणार आहेत.पूरग्रस्तांमधील लक्षणेभीती, निद्रानाश, झोप नीट न लागणे, छातीमध्ये धडधड वाढणे, उदासीनता ही लक्षणे प्रामुख्याने पूरग्रस्तांमध्ये दिसतात. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मानसिक खच्चीकरण होण्याची शक्यता असते.