शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

संत विचारामुळेच देशात एकता, बंधुता अबाधित: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 11:12 IST

संतांचे विचार आणि शिकवणुकीमुळेच आज देशात एकता आणि बंधुता टिकून आहे, पुढेही याच विचारावर वाटचाल करावी लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

कोल्हापूर : संतांचे विचार आणि शिकवणुकीमुळेच आज देशात एकता आणि बंधुता टिकून आहे, पुढेही याच विचारावर वाटचाल करावी लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर, संस्कृती मंत्रालय भारत सरकार आणि इंडसमून मीडिया प्रा.लि., मुंबई प्रायोजित पहिले विश्वात्मक संतसाहित्य सांस्कृतिक संमेलन मंगळवारी कोल्हापुरात झाले. संमेलन अध्यक्ष ह.भ.प. मदन महाराज गोसावी आणि संमेलन स्वागताध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, पंढरपूरला निघणारी वारी ही जगासाठी कुतूहलाचा विषय आहे. संपूर्ण जग हे आपले कुटुंब आहे, असाच विचार संतांनी सांगितला. मानवतेच्या कल्याणासाठी त्यांनी आयुष्य वेचले. वेगवेगळ्या भाषेत, प्रातांत संत जन्माला आले तरी त्यांचा भाव हा कायम एकतेचा आणि समाज जोडणाराच राहिला. या सर्वांनी समाजाला एकतेच्या तत्त्वात गुंफले. आज जग संतसाहित्याचा अभ्यास करीत आहे, आपणही तो अधिक आत्मीयतेने करायला हवा.

स्वागत अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे म्हणाले, संतसाहित्यामध्ये घेण्यासारखे खूप आहे. राज्याला साहित्य संमेलनाची मोठी परंपरा आहे. संतांनी आपल्या साहित्यातून भूतदया हा मंत्र जगासमोर आणला. संमेलनाच्या माध्यमातून हा मंत्र जोपासण्याचा विचारही रुजेल.

दरम्यान, सकाळी टाळ-मृदंग व हरिनामाच्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रंथदिंडीचे उद्घाटन मदन महाराज गोसावी व लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथदालनाचे उद्घाटन संत साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते, तर आध्यात्मिक विश्वाचे दर्शन घडविणाऱ्या चित्रदालनाचे उद्घाटन डॉ. सुहास बहुलकर यांच्या हस्ते झाले.

जातिभेदविरहित समाज निर्माण करणे हाच उद्देश : मदन महाराज गोसावी

संमेलन अध्यक्ष मदन महाराज गोसावी म्हणाले, आज वर्तमान अस्वस्थ असल्याच्या काळात संतविचार मार्गदर्शक आहेत. कोरोनासारख्या विषाणूने अख्ख्या जगाला त्रास दिला; पण याच वेळी विश्वबंधुत्वाची जाणीवही करून दिली. या मातीत अनेक संत, पंथ उदयास आले. या सर्वांचे मानवतावादी तत्त्वज्ञान पुन्हा एकदा जगासमोर आणण्याची गरज आहे. समानतेच्या वाटेवर चालणारा, जातिभेदरहित समाज निर्माण करणे, हाच हे संमेलन भरवण्यामागचा उद्देश आहे.

महंत ऋषिश्वरानंद यांना जीवनगौरव पुरस्कार

हरिद्वारचे महंत ऋषिश्वरानंद यांचा कणेरी मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते विश्वात्मक संत जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी