शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

बेरोजगारी हेच शाहूवाडीत रुग्णसंख्या वाढीचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 23:13 IST

या तालुक्यात बॉक्साईटचे साठे मोठ्या प्रमाणावर आहेत. परंतु त्यातून सर्वसामान्य जनतेचे भले होईल, असा उद्योग उभा राहिला नाही. दिवंगत नेते उदयसिंहराव गायकवाड यांना कोल्हापूर जिल्'ाने भरभरून राजकीय ताकद दिली. पाचवेळा खासदार केले. ते मुळचे या तालुक्याचे परंतु त्यांनीही तालुक्याचा पांग फेडला नाही. त्यांनी उभा केलेला साखर कारखानाही नीट चालवता आला नाही.

ठळक मुद्दे पोटापाण्याची अडचण असल्याने शेतीत गुंतवणूक करता येत नाही, असे एक ना अनेक प्रश्न पायात बेडी बनून घट्ट बसले आहेत.

विश्वास पाटील-

कोल्हापूर : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने गेल्या काही दिवसांत कोल्हापूर जिल्'ातच नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्रासह मुंबईतही शाहूवाडी तालुका चर्चेत आला आहे. रोजगारासाठी मुंबईसह अन्य शहरांत झालेले मोठ्या प्रमाणावरील स्थलांतर हेच वाढलेल्या रुग्णसंख्येचे मुख्य कारण आहे. प्रचंड पाऊस, भरपूर पाणी, नैसर्गिक साधनसंपत्ती व खनिज संपत्तीने नटलेला असा हा तालुका अनेक बाबतीत मागे राहिला.

साधारणत: १९६० ते ८० च्या दोन दशकांत जे लोक उदरनिर्वाहासाठी मुंबईला जवळ केले, त्यांच्या पुढच्या पिढ्या कधीच मागे आल्या नाहीत. त्यांनी मागे यावे असे विकासाचे वारेही तालुक्यात वाहिले नाही. तालुक्याचा विकास झाला पाहिजे, गोरगरीब जनतेच्या हाताला काम मिळाले पाहिजे, अशी इच्छाशक्ती असणारे नेतृत्व तालुक्यास लाभले नाही, त्यामुळे विकासाच्या लाटेत हा तालुका मागे राहिल्याचे वास्तव आहे.शाहूवाडी तालुक्यातील ११४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांत दोन हजारांहून जास्त लोक आले आहेत. हे सर्व मुख्यत: रोजगार व उदरनिर्वाहासाठी मुंबईत गेले आहेत. ते मुंबईहून गावी आल्याने त्यांच्यातील काहीजण कोरोनाबाधित झाले. परंतु त्या निमित्ताने सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल झाल्या.

शाहूवाडीत जास्त लोक बाधित झाले; कारण या तालुक्यातील स्थलांतराचे प्रमाण जास्त आहे. स्थलांतर जास्त आहे; कारण बेरोजगारी जास्त आहे. दहावी-बारावी झाली की मुले नोकरीच्या शोधात गाववाल्याच्या ओळखीने मुंबईला जातात. या तालुक्यात बॉक्साईटचे साठे मोठ्या प्रमाणावर आहेत. परंतु त्यातून सर्वसामान्य जनतेचे भले होईल, असा उद्योग उभा राहिला नाही. दिवंगत नेते उदयसिंहराव गायकवाड यांना कोल्हापूर जिल्'ाने भरभरून राजकीय ताकद दिली. पाचवेळा खासदार केले. ते मुळचे या तालुक्याचे परंतु त्यांनीही तालुक्याचा पांग फेडला नाही. त्यांनी उभा केलेला साखर कारखानाही नीट चालवता आला नाही.

वारणा नदीवरून पाणी योजना करून भाडळे खिंडीत पाणी आणा अशी त्या परिसरातील जनतेची मागणी होती. जिल्हा बँकेचे तत्कालीन उपाध्यक्ष असलेल्या मानसिंग गायकवाड यांना ते सहज शक्य होते, परंतु विकासाची दृष्टी तिथेही आड आली. दिवंगत माजी आमदार संजय गायकवाड यांनी एमआयडीसीचा प्रकल्प मंजूर केला होता, परंतु तिथे उद्योग उभा राहिला नाही. माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्याकडून मका प्रकल्प शेअर्स भांडवल गोळा करण्यापुरताच मर्यादित राहिले. आमदार विनय कोरे यांनीही प्रत्येक निवडणुकीत वारणेसारख्या विकासाचे स्वप्न दाखविले, परंतु मूळ वारणेचेच विकासाचे शिल्प अडचणीत आल्याने शाहूवाडी पुन्हा विकासापासून लांब राहिली.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी फळप्रक्रिया उद्योगाला बळ देण्याच्या घोषणा केल्या; परंतु त्यांनीही प्रत्यक्षात काही करून दाखविले नाही. त्यांचा विकास बांबवडेत भात परिषदेपुरताच मर्यादित राहिला. अन्य पिके कमी पिकत असली तरी तालुक्यात राजकारणाचे पीक मात्र जोमात आहे. त्यातून पोलीस ठाण्यात सर्वाधिक गुन्हे दाखल होतात. भांडळे खिंड ते भेडसगांवपर्यंतचा पूर्व भाग चांगला विकसित आहे. परंतु आंबा-विशाळगड ते उदगिरी पर्यंतचा प्रदेश डोंगराळ आणि जंगलमय आहे. तेथील जनतेचे पाय अजूनही करवंदाच्या काट्यांनी रक्तबंबाळ होतात, हे वास्तव आहे.

मुबलक पाणी आहे परंतु जमीन हलक्या दर्जाची आहे. वर्ग दोनच्या जमिनीचे प्रमाण जास्त असल्याने त्या विकसित होण्यात अडचणी आहेत. पोटापाण्याची अडचण असल्याने शेतीत गुंतवणूक करता येत नाही, असे एक ना अनेक प्रश्न पायात बेडी बनून घट्ट बसले आहेत.

शाहूवाडी तालुक्यातील किती लोक मुंबईत :

सुमारे ६० हजारांपर्यंतमुंबईत शाहूवाडीकर काय करतो..हॉटेल-बेकरीमध्ये रोजगार : ५० टक्केस्वत:चे दुकान, चहा किंवा खाद्यपदार्थ हॉटेल, पानटपरी, भाजी विक्री : २० टक्केचांगली खासगी नोकरी किंवा सरकारी नोकरीत : १५ टक्केछोटे-मोठे उद्योग स्वत: करणारे : १० टक्केमाथाडी, हमाल अशी कामे करणारा वर्ग :

०५तालुक्यातील औद्योगीकरणाचे प्रकल्प

बांबवडे येथील उदयसिंहराव गायकवाड सहकारी साखर कारखाना : रोजगार - ७०० विश्वासराव नाईक साखर कारखाना चिखली- उद्योग अन्य तालुक्यात पण रोजगार-२५०एमआयडीसी मंजूर; परंतु उद्योग उभा राहिला नाहीमाजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर यांचा बहिरेवाडी येथील मका प्रकल्प : सुरूच झाला नाहीतालुक्यातील मुख्य पिके : भात, ऊस, मका, नाचणी, रताळीआंबा-विशाळगड परिसरात पर्यटनाला वाव परंतु त्याची दृष्टी व नावीन्य नाही.बर्की येथील धबधबा प्रसिध्द परंतु भाजलेली मक्याची कणसे आणि भजी या पलीकडे विकास नाही.

शाहूवाडी तालुका : गावे १४५लोकसंख्या : १,८५ हजार ६६१ (२०११ च्या जनगणनेनुसार) त्यापैकी ५३३९ नागरी लोकसंख्यासाक्षरता दर : ७२.६८दूध संकलन : फक्त गोकुळ : ५३ हजार, कोल्हापूर जिल्'ांत नवव्या क्रमांकावरपाटबंधारे प्रकल्प : वारणा (चांदोली येथे): ३४.५० टीएमसी.कडवी (भेंडवडे)- २.७१, कासारी (गेळवडे) : २.७७लपा तलाव (२०० दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता) - एकूण १०कांडवण, मानोली, पालेश्वर, मानोली, कुंभवडे, केसरकरवाडी, चांदोली, भंडारवाडी, बुरंबाळी, बर्की, नांदारी.सरासरी पाऊस : ६ हजार मिलीमीटर-कासारी परिसर, वारणा परिसर : अडीच हजार मिलीमीटर.प्राथमिक आरोग्य केंद्रे : ०७ (सरासरी ३० किलोमीटरच्या परिघातील गावे समाविष्ट)माध्यमिक विद्यालये : ४३, प्राथमिक शाळा : २४०तालुक्यात ८० धनगरवाडे त्यातील सुमारे ८५ टक्के लोक नोकरी, रोजगारासाठी स्थलांतरित.

टॅग्स :MLAआमदारSugar factoryसाखर कारखानेjobनोकरीPuneपुणेMumbaiमुंबई