शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
8
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
9
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
10
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
11
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
12
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
13
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
14
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
15
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
16
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
17
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
18
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
19
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
20
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!

केंद्राच्या धोरणांमुळेच वाढती बेरोजगारी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 12:58 IST

मोठ्या उद्योगपतींच्या फायद्याच्या धोरणामुळे शेती, औद्योगिक, व्यापारी क्षेत्रात काही बोटावर मोजण्याइतक्या लोकांचे वर्चस्व निर्माण होऊन रोजगारनिर्मिती धोक्यात येऊन बेरोजगारी वाढू लागली

जयसिंगपूर : देशामध्ये वाढत चाललेल्या बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष वाढू लागलेला आहे. भीषण महागाई व केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेती, औद्योगिक व व्यापार क्षेत्रामध्ये प्रचंड मंदी आलेली आहे. या सर्व गोष्टीस केंद्र सरकारचे चुकीचे व धरसोडीचे धोरण कारणीभूत असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.दिल्ली येथील जंतर-मंतर येथे रविवारी राष्ट्रीय रोजगार निती कायदा करण्याबाबत सुरू असलेल्या रोजगार आंदोलनावेळी ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, देशामध्ये प्रत्येक रिकाम्या हाताला काम देणे ही सरकारची जबाबदारी आहे. देशामध्ये वाढत असलेल्या बेरोजगारीबाबत केंद्र सरकारला गांभीर्य नसून, मोठ्या उद्योगपतींच्या फायद्याच्या धोरणामुळे शेती, औद्योगिक, व्यापारी क्षेत्रात काही बोटावर मोजण्याइतक्या लोकांचे वर्चस्व निर्माण होऊन रोजगारनिर्मिती धोक्यात येऊन बेरोजगारी वाढू लागली असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

आंदोलनास आम आदमी पक्षाचे दिल्लीचे राज्याचे पर्यावरणमंत्री गोपाळ राय, राज्यसभेचे खासदार संजय सिंग, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक व्ही. एम. सिंग, किसान संघर्ष मजदूर समितीचे गुरूनाम चढोणी यांच्यासह देशातील विविध पक्ष, शेतकरी संघटना, कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

युवा वर्ग शेतीपासून अलिप्त होऊ लागला

लॉकडाऊनच्या काळात रोजगार निर्मिती ठप्प होती. जवळपास अडीच कोटी लोक बेरोजगार झाले. मात्र, शेती क्षेत्राने नवीन ४० लाख रोजगारनिर्मिती केली. देशात सर्वाधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता असलेल्या शेती क्षेत्रात पिकांना किमान आधारभूत किंमत मिळत नसल्याने व केंद्र शाश्वत धोरण नसल्याने युवा वर्ग शेतीपासून अलिप्त होऊ लागला असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीCentral Governmentकेंद्र सरकारUnemploymentबेरोजगारी