शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

केंद्राच्या धोरणांमुळेच वाढती बेरोजगारी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 12:58 IST

मोठ्या उद्योगपतींच्या फायद्याच्या धोरणामुळे शेती, औद्योगिक, व्यापारी क्षेत्रात काही बोटावर मोजण्याइतक्या लोकांचे वर्चस्व निर्माण होऊन रोजगारनिर्मिती धोक्यात येऊन बेरोजगारी वाढू लागली

जयसिंगपूर : देशामध्ये वाढत चाललेल्या बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष वाढू लागलेला आहे. भीषण महागाई व केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेती, औद्योगिक व व्यापार क्षेत्रामध्ये प्रचंड मंदी आलेली आहे. या सर्व गोष्टीस केंद्र सरकारचे चुकीचे व धरसोडीचे धोरण कारणीभूत असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.दिल्ली येथील जंतर-मंतर येथे रविवारी राष्ट्रीय रोजगार निती कायदा करण्याबाबत सुरू असलेल्या रोजगार आंदोलनावेळी ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, देशामध्ये प्रत्येक रिकाम्या हाताला काम देणे ही सरकारची जबाबदारी आहे. देशामध्ये वाढत असलेल्या बेरोजगारीबाबत केंद्र सरकारला गांभीर्य नसून, मोठ्या उद्योगपतींच्या फायद्याच्या धोरणामुळे शेती, औद्योगिक, व्यापारी क्षेत्रात काही बोटावर मोजण्याइतक्या लोकांचे वर्चस्व निर्माण होऊन रोजगारनिर्मिती धोक्यात येऊन बेरोजगारी वाढू लागली असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

आंदोलनास आम आदमी पक्षाचे दिल्लीचे राज्याचे पर्यावरणमंत्री गोपाळ राय, राज्यसभेचे खासदार संजय सिंग, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक व्ही. एम. सिंग, किसान संघर्ष मजदूर समितीचे गुरूनाम चढोणी यांच्यासह देशातील विविध पक्ष, शेतकरी संघटना, कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

युवा वर्ग शेतीपासून अलिप्त होऊ लागला

लॉकडाऊनच्या काळात रोजगार निर्मिती ठप्प होती. जवळपास अडीच कोटी लोक बेरोजगार झाले. मात्र, शेती क्षेत्राने नवीन ४० लाख रोजगारनिर्मिती केली. देशात सर्वाधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता असलेल्या शेती क्षेत्रात पिकांना किमान आधारभूत किंमत मिळत नसल्याने व केंद्र शाश्वत धोरण नसल्याने युवा वर्ग शेतीपासून अलिप्त होऊ लागला असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीCentral Governmentकेंद्र सरकारUnemploymentबेरोजगारी