शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

उदगाव-अंकली पुलाचे मजबुतीकरण होणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:24 IST

मजबुतीकरणाचा नव्याने प्रस्ताव जयसिंगपूर : दीडशे वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव-अंकली पुलाच्या मजबुतीकरणासाठी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी ...

मजबुतीकरणाचा नव्याने प्रस्ताव

जयसिंगपूर : दीडशे वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव-अंकली पुलाच्या मजबुतीकरणासाठी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पुढाकार घेतला आहे. तात्पुरत्या डागडुजीसाठी निधी मंजूर झाला असला तरी या पुलाचे संवर्धन व्हावे व पुढे हा पूल आणखी मजबूत असावा, हा हेतू ठेवून प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. दळणवळणाला चालना मिळावी, यासाठी १४४ वर्षांपूर्वी संस्थानिक व ब्रिटिश सरकारने सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर हा पूल उभारला होता. त्यामुळे हा पूल इतिहासाची साक्ष देत आहे. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत पुलाची दुरवस्था झाली आहे. पिलरमध्ये भेगा पडल्यामुळे या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. पुलाला कोणताही मोठा धोका नसला तरी त्याची दुरुस्ती करून घेण्याबाबतचा अहवाल देण्यात आला होता. शिवाय पुलाच्या पाण्याखालील भागाची दुरुस्ती करण्याच्या आयआयटी तज्ज्ञांच्या समितीकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर या पुलाच्या मजबुतीकरणाचा विषय पुढे आला होता. पुलाच्या डागडुजीसाठी निधी मंजूर झाला होता. मात्र, अपुऱ्या निधीमुळे शासनाकडे नव्याने प्रस्ताव देण्यात आला होता. दरम्यान, तात्पुरत्या डागडुजीऐवजी रेल्वेपुलाप्रमाणे या पुलाचे देखील मजबुतीकरण करण्यात यावे. जॅकेट पद्धतीने हा पूल मजबूत व्हावा, यासाठी राज्यमंत्री यड्रावकर यांनी पुढाकार घेतला. याचा प्रस्तावही तयार केला जात आहे.

फोटो - ०९०४२०२१-जेएवाय-०८-लोकमतचे वृत्त