शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
ठाण्यात मनसे, उद्धवसेनेचे दोन उमेदवार निवडणुकीतून बाहेर! अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, कोणाचे अर्ज झाले रद्द? 
4
'हा देश सर्वांचा; धर्म, जात, भाषा आणि प्रदेशाच्या आधारे भेदभाव होऊ नये'- मोहन भागवत
5
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
6
४० वर्षे ठाकरेंचा निष्ठावंत, एबी फॉर्मही घेतला; ऐनवेळी पक्षाला रामराम अन् भाजपातून अर्ज भरला
7
रोममध्ये विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचा रोमान्स, 'त्या' फोटोवरुन चाहत्यांनी ओळखलंच!
8
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
9
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
10
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
11
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
12
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
13
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
14
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
15
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
16
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
17
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
18
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
19
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
20
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
Daily Top 2Weekly Top 5

उदगाव-अंकली पुलाचे मजबुतीकरण होणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:24 IST

मजबुतीकरणाचा नव्याने प्रस्ताव जयसिंगपूर : दीडशे वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव-अंकली पुलाच्या मजबुतीकरणासाठी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी ...

मजबुतीकरणाचा नव्याने प्रस्ताव

जयसिंगपूर : दीडशे वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव-अंकली पुलाच्या मजबुतीकरणासाठी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पुढाकार घेतला आहे. तात्पुरत्या डागडुजीसाठी निधी मंजूर झाला असला तरी या पुलाचे संवर्धन व्हावे व पुढे हा पूल आणखी मजबूत असावा, हा हेतू ठेवून प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. दळणवळणाला चालना मिळावी, यासाठी १४४ वर्षांपूर्वी संस्थानिक व ब्रिटिश सरकारने सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर हा पूल उभारला होता. त्यामुळे हा पूल इतिहासाची साक्ष देत आहे. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत पुलाची दुरवस्था झाली आहे. पिलरमध्ये भेगा पडल्यामुळे या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. पुलाला कोणताही मोठा धोका नसला तरी त्याची दुरुस्ती करून घेण्याबाबतचा अहवाल देण्यात आला होता. शिवाय पुलाच्या पाण्याखालील भागाची दुरुस्ती करण्याच्या आयआयटी तज्ज्ञांच्या समितीकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर या पुलाच्या मजबुतीकरणाचा विषय पुढे आला होता. पुलाच्या डागडुजीसाठी निधी मंजूर झाला होता. मात्र, अपुऱ्या निधीमुळे शासनाकडे नव्याने प्रस्ताव देण्यात आला होता. दरम्यान, तात्पुरत्या डागडुजीऐवजी रेल्वेपुलाप्रमाणे या पुलाचे देखील मजबुतीकरण करण्यात यावे. जॅकेट पद्धतीने हा पूल मजबूत व्हावा, यासाठी राज्यमंत्री यड्रावकर यांनी पुढाकार घेतला. याचा प्रस्तावही तयार केला जात आहे.

फोटो - ०९०४२०२१-जेएवाय-०८-लोकमतचे वृत्त