शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

कोल्हापूर हद्दवाढ: उचगाव ग्रामस्थांचा तीव्र विरोध, गावातील सर्व व्यवहार ठेवले बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 16:22 IST

गाव बंद ठेवून एकजुटीने हद्दवाढीला विरोध दर्शविला.

मोहन सातपुतेउचगाव: उचगाव (ता.करवीर) येथील ग्रामस्थांनी हद्दवाढीला तीव्र विरोध दर्शवत आज, सोमवारी गाव बंदची हाक देत सर्व व्यवहार बंद ठेवले. आमच्या गावात आमचंच सरकार, हद्दवाढीस उचगाव ग्रामस्थांचा तीव्र इन्कार, असे म्हणत गाव बंद ठेवले.उचगाव येथील हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वतीने आज उचगाव बंद करण्याची हाक देण्यात आली होती. या अनुषंगाने उचगाव हद्द वाढविरोधी कृती समितीने ग्रामपंचायत कमानी जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ एकत्र येत गाव बंद ठेवून एकजुटीने हद्दवाढीला विरोध दर्शविला.यावेळी कृती समिती सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोल्हापूर महानगरपालिका आपल्या नागरिकांना सेवा देण्यात अपयशी ठरली आहे. हद्दीतील गावांचा समावेश करून कर वसूल करण्याचे मनसूबे रचत आहे. परंतु हद्दवाडीमध्ये उचगावला समाविष्ट करू नये. उचगाव कधीही हद्दवाढीमध्ये समाविष्ट होणार नाही असा निश्चय करत हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या सदस्यांनी गाव बंद करुन हद्दवाढ विरोधात एल्गार पुकारला. नागरिकाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन गांधीनगर पोलीस ठाण्यातर्फे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.यावेळी हद्दवाढ विरोधी कृती समिती अभिजीत पाटील, विक्रम चौगुले, अजित पाटील, शरद चव्हाण, गोगा पाटील, अभिजीत कदम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हापूर महापालिकेने पहिला उपनगरांचा विकास करावा. त्यांना पहिल्या सुखसोयी द्याव्यात. गावाचा विकास करायला महानगरपालिकेचा कर ग्रामीण जनतेला न सोसनारा आहे. शेती व्यवसाय त्याचबरोबर शेतीवर अवलंबून असणारा दुग्धव्यवसाय हद्दवाढीमुळे धोक्यात येवू शकतो. - अभिजीत पाटील, मनसे, करवीर तालुका अध्यक्ष

टॅग्स :kolhapurकोल्हापूर