शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

यंत्रमाग कामगारांना पाच वर्षांत दुप्पट मजुरीवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:36 IST

इचलकरंजी : येथील यंत्रमाग कामगारांनी २०१३ साली ३९ दिवस काम बंद आंदोलन करून मिळविलेली मजुरीवाढ व केलेला करार यामुळे या पाच वर्षांत कामगारांच्या मजुरीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे.

अतुल आंबी ।इचलकरंजी : येथील यंत्रमाग कामगारांनी २०१३ साली ३९ दिवस काम बंद आंदोलन करून मिळविलेली मजुरीवाढ व केलेला करार यामुळे या पाच वर्षांत कामगारांच्या मजुरीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. २०१३ साली असलेली ५२ पिकास ५८.५ पैसे मजुरी आज एक रुपये ५ पैसे झाली आहे. या मजुरीवाढीमुळे बोनसची रक्कमही वाढली आहे. सर्व कामगार संघटनांनी एकत्रित उभारलेल्या लढ्याचे हे फलित म्हणावे लागेल.

सन २०१३ पूर्वी तीन वर्षांतून एकदा यंत्रमागधारक संघटना व कामगार संघटना यांचे प्रतिनिधी व प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लवाद समिती नेमून मजुरीवाढ ठरवली जात होती. या परंपरेनुसार काही वर्षे मजुरीवाढ घोषित केली जात होती. त्यानुसार २०१३ साली ५२ पिकाला ५८.५ पैसे मजुरी होती. त्यावेळी सर्व यंत्रमाग कामगार संघटनांनी एकत्रित येऊन काम बंद आंदोलन सुरू केले. मजुरीवाढीचा तिढा सुटत नसल्याने २१ जानेवारी २०१३ ला सुरू झालेले आंदोलन लांबत जाऊन तब्बल ३९ दिवसांनी २८ फेब्रुवारी २०१३ ला कोल्हापूर शासकीय विश्रामगृह येथे तोडगा काढून संपविण्यात आले.

यावेळी मागील काही वर्षांत समाधानकारक मजुरीवाढ झाली नाही. सद्य:परिस्थितीत वाढलेली महागाई, कर्जबाजारी होत चाललेला कामगार अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी सन २०१३ सालच्या करारामध्ये २८.५ पैशांची मोठी मजुरीवाढ घोषित करण्यात आली. त्यामुळे ५८.५ पैशांवरून कामगारांना ८७ पैसे मजुरी झाली. या मजुरीवाढीबरोबरच प्रत्येक तीन वर्षांनी आंदोलने करावी लागू नयेत, यासाठी सर्वमान्य तोडगा म्हणून शासनाकडून घोषित केल्या जाणाºया महागााई भत्त्याला या मजुरीवाढीची सांगड घालण्यात आली.त्यामध्ये वर्षातून दोनदा घोषित होणाºया महागाई भत्त्याची रक्कम एकत्रित करून त्याचे पीस रेटवर रूपांतर करून प्रत्येक वर्षी ३१ डिसेंबरपूर्वी सहायक कामगार आयुक्त कार्यालयातून याची घोषणा करावी, असा करार करण्यात आला.

२०१३ साली झालेल्या या करारानुसार दरवर्षी मजुरीवाढ घोषित केली जाते. त्यामध्ये २०१४ साली ४ पैसे, २०१५ साली ७ पैसे, २०१६ साली ७ पैसे अशी मजुरीवाढ घोषित करण्यात आली आहे.त्याप्रमाणे सध्या एक रुपये ५ पैशांपर्यंत ही मजुरीवाढ पोहोचली आहे. २०१३ साली असलेली ५८.५ पैशांची मजुरी पाच वर्षांत दामदुप्पट होऊन एक रुपये ५ पैशांपर्यंत पोहोचली आहे. सन २०१३ नंतर दरवर्षी २०१६ पर्यंत घोषित झालेली १८ पैशांची मजुरीवाढ व त्याप्रमाणात वाढलेली बोनसची रक्कम पाहता पाच वर्षांत कामगाराची मजुरी दामदुप्पट झाली आहे.‘बोनस’चा हिशेब वेगळाचसन २०१३ पूर्वी २३ ते २७ टक्क्यांपर्यंत बोनस दिला जात होता. २०१३ सालच्या करारामध्ये १६.६६ टक्के बोनस ठरविण्यात आला. मात्र, मजुरीवाढ झाल्यामुळे कामगारांना बोनसची रक्कमही आपोआपच वाढून मिळाली. ५८.५ पैसे मजुरी असताना सरासरी २५ टक्क्यांनी चौदा हजार ६२५ रुपयांच्या जवळपास मिळणारा बोनस हा ८७ पैसे मजुरी झाल्यानंतर १६.६६ टक्क्यांनी चौदा हजार ४९४ रुपयांपर्यंत पोहोचला. त्यानंतर दरवर्षी होणाºया मजुरीवाढीनुसार त्यावरील टक्केवारीनुसार बोनसच्या रकमेतही वाढ होत गेली आहे.मजुरीवाढीचा हिशेबएक कामगार एका वर्षात आठ माग बारा तास काम केल्यास सरासरी एक लाख मीटर कापड उत्पादन करतो. त्यानुसार २०१३ सालच्या ५८.५ पैसे मजुरीनुसार त्याला वर्षाचे ५८ हजार ५०० रुपये अधिक सरासरी २५ टक्क्यांनी दिला जाणारा चौदा हजार ६२५ रुपयांचा बोनस असे ७३ हजार १२५ रुपये कामगारांना मिळत होते. २०१३ सालच्या २८.५ पैसे मजुरीवाढीमुळे ८७ पैसे मजुरी झाली. वरील हिशेबाप्रमाणे ८७ हजार रुपये अधिक १६.६६ प्रमाणे दिला जाणारा चौदा हजार ४९४ रुपयांचा बोनस असे एक लाख १ हजार ४९४ रुपये कामगाराला मिळू लागले.३९ दिवसांच्या संपाचे अन्य परिणामएकूण ३९ दिवस संप झाला असला तरी चाळीसाव्या दिवशी शुक्रवार असल्याने त्यादिवशी यंत्रमाग बंदच राहिले. त्यानंतर शनिवारपासून शहरातील यंत्रमाग टप्प्याटप्प्याने सुरू झाले. त्यामुळे घडी बसण्यासाठी पुढे पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी गेला. एकूण ५०-६० दिवसांच्या या बंदमुळे वस्त्रोद्योग मंडीवर परिणाम झाला. कापडाची मागणी घटणे, घेतलेले काम वेळेत पूर्ण करून न दिल्याने बाहेरील कापड मंडीतून व्यक्त होणारी नाराजी, यंत्रमागधारकांचे बॅँकांकडे थकलेले हप्ते असे अनेक परिणाम वस्त्रोद्योगाला सहन करावे लागले.

टॅग्स :Power Shutdownभारनियमनkolhapurकोल्हापूर