शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
2
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
3
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
4
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
5
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
6
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
7
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
8
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
9
अमेठी, रायबरेलीत काँग्रेसच्या हाताला सपाच्या सायकलची साथ, अखिलेश यादव यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश 
10
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
11
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
12
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
13
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
14
UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी
15
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
16
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
18
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
19
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?
20
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?

‘स्वाईन फ्लू’ने दोन रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 9:51 PM

लोकमत न्यूज नेटवर्क,कोल्हापूर : हवामानातील बदलामुळे स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढू लागल्याने बुधवारी दोन स्वाईन फ्लूच्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रघुनाथ महादेव सावंत (वय ६६, रा. दापोली, जि. रत्नागिरी) व लता कुसरेजा (४७, रा. गांधीनगर) अशी मृतांची नावे आहेत. एकाच दिवशी स्वाईन फ्लूच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य प्रशासन खडबडले आहे. ...

ठळक मुद्दे♦मृत रत्नागिरी, गांधीनगरातील, आरोग्य यंत्रणा खडबडली♦जिल्'ात १९ रुग्णांवर उपचार सुरू;♦उर्वरित ५० रुग्णांपैकी ३८ जणांना डिस्चार्ज

लोकमत न्यूज नेटवर्क,कोल्हापूर : हवामानातील बदलामुळे स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढू लागल्याने बुधवारी दोन स्वाईन फ्लूच्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रघुनाथ महादेव सावंत (वय ६६, रा. दापोली, जि. रत्नागिरी) व लता कुसरेजा (४७, रा. गांधीनगर) अशी मृतांची नावे आहेत. एकाच दिवशी स्वाईन फ्लूच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य प्रशासन खडबडले आहे. त्यामुळे जानेवारी २०१७ नंतर जिल्'ात ‘स्वाईन’ने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १५ पर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, बुधवारी जिल्'ातील शासकीय रुग्णालयात ‘स्वाईन’चे एकूण १९ रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी ८ रुग्ण हे सीपीआरमध्ये दाखल आहेत.बुधवारी मृत्यू झालेल्यांतील रघुनाथ सावंत यांना दि. १६ जुलैला उपचारासाठी सीपीआर रग्णालयात दाखल केले होते. २० जूननंतर त्यांच्यात ‘स्वाईन फ्लू’ची लक्षणे दिसू लागल्यानंतर त्यांना सीपीआरमधील ‘स्वाईन’च्या विशेष कक्षात स्थलांतरीत करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या रक्त तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर ‘स्वाईन’ प्रतिकार करणारे औषधोपचार सुरू होते; पण बुधवारी त्यांचा मृत्यू झाला तर दुसरे लता कुसरेजा या महिलेतही स्वाईनसदृश लक्षणे दिसू लागल्याने त्यांना २० जुलैपासून शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्यांच्याही रक्ताची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांचाही बुधवारी मृत्यू झाला.ही साथ आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पाऊस आणि ऊन या दोन हवामानातील बदलांमुळे स्वाईन फ्लूचा संसर्ग झपाट्याने वाढतो. या बदलत्या वातावरणामुळे विशेषत: ग्रामीण भागात संख्या लक्षणीय दिसत आहे. प्राथमिक लक्षणांकडे दुर्लक्षानंतर आजार बळावल्यावर रुग्ण गंभीर अवस्थेत सीपीआरकडे येत असल्याचे दिसत आहे.सध्या जिल्'ात ‘स्वाईन’चे एकूण १९ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामध्ये १२ पॉझिटिव्ह तर ७ संशयित रुग्ण आहेत. बुधवारी पॉझिटिव्ह ३ तर ५ संशयित रुग्णांची वाढ झाली, असून ते सीपीआरमध्ये उपचार घेत आहेत. या पॉझिटिव्ह तीन रुग्णांपैकी २ कोल्हापूर शहरातील तर १ रुग्ण हा सांगली शहरातील आहे तर आठ रुग्णांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आलाआतापर्यंत १५१ रुग्णांवर उपचारजानेवारीपासून आतापर्यंत १५१ स्वाईन फ्लूची लक्षणे असणाºया रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यामध्ये ६५ पॉझिटिव्ह होते, तर उर्वरित ५० रुग्णांपैकी ३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर १२ जणांवर अद्याप उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने माहिती दिली.दक्षता घ्या..नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी टाळणे. सर्दी व खोकला आल्यावर तोंडावर रूमाल लावणे, थंडी, ताप, अशक्तपणा, स्नायूदुखी, उलटी, मळमळ अशी ‘स्वाईन’ची लक्षणे आहेत. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांकडून उपचार करून घेतल्यास ‘स्वाईन’चा संसर्ग रोखता येतो.१५ पैकी ८ मृत कोल्हापूर जिल्'ातीलगेल्या सात महिन्यांत ‘स्वाईन’मुळे जिल्'ात १५ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ८ रुग्ण हे कोल्हापूर जिल्'ातील इतर ७ रुग्ण हे कर्नाटक, सांगली, रत्नागिरी या जिल्'ांतील असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.