शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

राज्यात आणखी दोन भारत राखीव बटालियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 05:54 IST

भारत राखीव बटालियन ४ व ५ आणि हातनूर-वरणगाव जळगाव येथे राज्य राखीव पोलीस दल क्रमांक १९ ची नव्याने उभारणी करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली

दीपक जाधव कोल्हापूर : कोर्टी मोक्ता (चंद्रपूर) आणि शिसा उदेगाव अकोला येथे भारत राखीव बटालियन ४ व ५ आणि हातनूर-वरणगाव जळगाव येथे राज्य राखीव पोलीस दल क्रमांक १९ ची नव्याने उभारणी करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून त्यासाठी २९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती करण्यात येणार आहे.महाराष्ट्रात सध्या औरंगाबाद, गोंदिया, कोल्हापूर येथे भारत राखीव बटालियन आहेत. या बटालियनसाठी केंद्र शासनाकडून निधी पुरविण्यात येतो. कायदा व सुव्यवस्था आणखी प्रभावीपणे सांभाळण्यास या बटालियनची मदत होते, हे लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यात आणखी दोन भारत राखीव बटालियन व एक राज्य राखीव पोलीस बल उभारण्यास मान्यता दिली. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्णातील बल्लारपूर तालुक्यातील मौजे कोर्टी मोक्ता येथे भारत राखीव बटालियन क्रमांक ४ आणि अकोला जिल्ह्यातील मौजे शिसा उदेगाव व हिंगाणा शिवार येथे भारत राखीव बटालियन क्रमांक ५ ची स्थापना करण्यात येत आहे.जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हातनूर-वरणगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १९ स्थापन करण्यात येत आहे. यामध्ये समादेशक ते बिनतारी संदेश विभागातील पदे ही कायमस्वरूपी, तर प्रमुख लिपिक ते वर्ग चारपर्यंतची सर्व पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत.१३८० पदे भरणार..उच्चस्तरीय सचिव समितीने केलेल्या शिफारसीनुसार पहिल्या टप्प्यात प्रत्येक बटालियनसाठी आवश्यक असलेल्या पदांच्या (१३८४) एक तृतीयांश म्हणजेच ४६० अशी तीन बटालियनसाठी एकूण १३८० पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. राहिलेली पदे भारत राखीव बटालियन व राज्य राखीव पोलीस गट प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर समितीच्या मान्यतेने निर्माण करण्यात येणार आहेत.