शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुले: गगनबावड्यात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 18:49 IST

dam, rain, kolhapurnews चक्रीवादळामुळे गुरुवारी पहाटेपर्यंत संततधार कोसळलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले. गगनबावड्यात अतिवृष्टी झाल्याने पंचगंगेच्या पाणीपातळीत १२ तासांत तब्बल आठ फुटांनी वाढ झाली आहे. राजारामसह सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर ओसरल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी वादळी पावसाचा हवामान खात्याच्या इशाऱ्याने भीती कायम आहे.

ठळक मुद्देराधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुले: गगनबावड्यात अतिवृष्टी पावसाचा जोर ओसरला तरी वादळाचा धोका कायम

कोल्हापूर : चक्रीवादळामुळे गुरुवारी पहाटेपर्यंत संततधार कोसळलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले. गगनबावड्यात अतिवृष्टी झाल्याने पंचगंगेच्या पाणीपातळीत १२ तासांत तब्बल आठ फुटांनी वाढ झाली आहे. राजारामसह सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर ओसरल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी वादळी पावसाचा हवामान खात्याच्या इशाऱ्याने भीती कायम आहे.बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ उत्तर कर्नाटक, दक्षिण महाराष्ट् असे करत गुरुवारी मुंबईच्या दिशेने सरकले. त्यामुळे बुधवारी दिवसरात्र पावसाने अक्षरश: झोडपून काढले. गुरुवारी पहाटेपर्यंत पावसाचा कहर सुरूच होता. सकाळपासून काहीसा जोर ओसरला तरी अधूनमधून सरी कोसळत राहिल्या. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या तुडुंब भरुन वाहत असून जोर वाढल्यास पात्राबाहेर जाण्याचा धोका आहे.राधानगरी धरणाचे दोन दरवाजे गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडले. ६ आणि ३ क्रमांकाच्या या दरवाजातून ४४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावतीच्या पात्रात होऊ लागला आहे. त्यामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. बुधवारी संध्याकाळपर्यंत १० फुटांवर असणारी पातळी गुरुवारी सकाळी आठ वाजता १८ फुटांवर गेली. त्यामुळे पंचगंगेवरील राजारामसह सात बंधारे पाण्याखाली जाऊन वाहतूक थांबली.गगनबावड्यात अतिवृष्टीगुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ६७७ मि.मी. पाऊस झाला. गगनबावड्यात अतिवृष्टी झाली असून १०८ मि.मी. पाऊस पर्जन्यमापकावर नोंदवला गेला आहे. करवीर ९२, पन्हाळा ८४. शिरोळ ८०, हातकणंगले ६०, शाहूवाडी ५३, कागल ४९, गडहिंग्लज व राधानगरीत ३५, आजरा २९, चंदगड २४, भुदरगड २१ मि.मी. असा पाऊस नोंदवला गेला आहे.धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही अतिवृष्टीधरणांच्या पाणलोट क्षेत्रातही प्रचंड पाउस झाला. कुंभ, कासारी, कोदे या जलाशयांच्या पाणलोट क्षेत्रात अवघ्या कांही तासात ११५ ते १३० मि.मी. पाउस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळेच पंचगंगा खोऱ्यातील सर्व नद्यांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूरDamधरण