शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भारताची ओळख पुसून ‘डीपी’ बदलण्याचा प्रयत्न सुरू : संजय आवटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 13:56 IST

भारत ही संकल्पनाच लोकशाही टिकवेल : गांधी विचार लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही

कोल्हापूर : भारताची ओळख पुसून आणि बदलून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. आजच्या पिढीच्या भाषेत भारताचा 'डीपी' बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मत लोकमतचे पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांनी गुरुवारी व्यक्त केले. आपल्या नर्मविनोदी भाषणात त्यांनी या व्याख्यानात रंग भरताना भारत ही संकल्पनाच लोकशाही टिकवेल, म्हणून अजून आशा आहे, गांधी विचार लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही, असे स्पष्ट केले.श्रमिक प्रतिष्ठान आयोजित 'लोकशाही वाचवा' या काॅम्रेड अवि पानसरे व्याख्यानमालेत 'प्रसार माध्यमांची स्वायत्तता' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी होते. अमृता जाधव यांनी प्रास्ताविक केले. संजय सुळगावे यांनी आभार मानले.आवटे म्हणाले, प्रसार माध्यमांना स्वत:चे स्वतंत्र अधिकार नाहीत. जे जनतेचे अधिकार तेच माध्यमांचे अधिकार आहेत. जागतिकीकरणामुळे अर्थकारण बदलले, तरीही खंडन-मंडणाची कल्पना याच देशाची आहे. प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य याच घटनेने दिले आहे. माध्यमांनी लोकशाही बळकट करायची असते, परंतु आज लोकशाहीचे 'माध्यमी'करण तयार होत आहे, असे सांगत आवटे म्हणाले, भारताचा राष्ट्रवाद हे त्याचे वैशिष्ट्य आहे. वैविध्यता हे त्याचे बलस्थान आहे. ते नष्ट करण्याचा प्रयत्न 'एकचालुकानुवर्ती' नेतेपद लादून केले जात आहे, हे वेळीच ओळखले पाहिजे.भारताची ओळख अक्षय राहील. तो स्वत:ची माध्यमे स्वत: तयार करेल, असे आवटे म्हणाले. नव्या पिढीशी बोलले पाहिजे, त्यांच्या भाषेत संवाद साधला पाहिजे. आजही सामान्य माणूस केंद्रबिंदू आहे म्हणूनच त्याने बोलण्याचा अधिकार वापरला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.बुलककार्ट ते फ्लिपकार्टबुलक कार्टमधून इंटरनेटला विरोध करणारे आज फ्लिपकार्टवर आहेत. एटीएममधून पैसे यायचे हा चमत्कार पाहिला; पण आता मशीनमधून मते बाहेर येताहेत, हा चमत्कार पाहायला मिळतो आहे.

आजचे व्याख्यान :वक्ते : डॉ. हेमंत राजोपाध्ये, ठाणे.विषय : सनातन धर्म आणि आधुनिक समाज

टॅग्स :kolhapurकोल्हापूर