शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Navratri 2020-शांततेत पार पडली त्र्यंबोली यात्रा-अंबाबाई-त्र्यंबोलीची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 15:25 IST

Navratri 2020, mahalaxmitemple, tryamboli, kolhapurnews कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच त्र्यंबोली देवीची यात्रा भाविकांविना शांततेत पार पडली. अंबाबाई व त्र्यंबोली देवीची भेट झाल्यानंतर निधी गुरव या बालिकेच्या हस्ते कोहळा छेदन विधी झाला. यंदा यात्रेला भाविकांची गर्दी नसली तरी कोहळा मिळवण्यासाठीच्या धडपडीत पोलिसच आघाडीवर होते. त्यामुळे काहीवेळ झटापट झाली.

ठळक मुद्दे शांततेत पार पडली त्र्यंबोली यात्रा-अंबाबाई-त्र्यंबोलीची भेट कोहळ्यासाठी पोलिसच आघाडीवर

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच त्र्यंबोली देवीची यात्रा भाविकांविना शांततेत पार पडली. अंबाबाई व त्र्यंबोली देवीची भेट झाल्यानंतर निधी गुरव या बालिकेच्या हस्ते कोहळा छेदन विधी झाला. यंदा यात्रेला भाविकांची गर्दी नसली तरी कोहळा मिळवण्यासाठीच्या धडपडीत पोलिसच आघाडीवर होते. त्यामुळे काहीवेळ झटापट झाली.अंबाबाईचे कोल्हासुराचा वध केल्यानंतर झालेल्या विजयोत्सवात त्र्यंबोली देवीला बोलवायचे राहून गेले, त्यामुळे आपल्या रुसलेल्या सखीला भेटण्यासाठी अंबाबाई जाते व कोल्हासुराचा वध कसा केला हे कोहळा छेदनातून दाखवते. यंदा यात्रांना परवानगी नसल्याने गर्दी टाळण्यासाठी अंबाबाईची पालखी सजवलेल्या वाहनातून नेण्यात आली. तत्पूर्वी सकाळी साडे नऊ वाजता तोफेची सलामी झाल्यानंतर देवीची पालखी पूर्व दरवाज्यातून मंदिराबाहेर आली.

भवानी मंडपापर्यंत पायघड्यांवरुन आल्यानंतर येथे जुना राजवाडा पोलीस ठाण्याकडून पूजा करण्यात आली. यानंतर पालखी सजवलेल्या वाहनात ठेवण्यात आली. येथे भाविकांनी अंबा माता की जय चा गजर करत फुलांचा वर्षाव केला. पारंपारिक वाद्यांच्या गजरात वाहन निघाले. बिंदू चौक, उमा टॉकीजमार्गे शाहु मिल चौकात आणि टाकाळा चौकात परंपरेप्रमाणे पालखीचे पुजन झाले. सव्वा बाराच्या दरम्यान पालखी त्र्यंबोलीवर पोहोचली. त्याआधीच तुळजाभवानी देवीच्या पालखीचे आगमन झाले होते.अंबाबाई व तुळजाभवानीची भेट झाल्यानंतर आरती करण्यात आली. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते कुमारिका निधी श्रीकांत गुरव हिचे पूजन झाले. यावेळी शहाजीराजे, यशराजराजे, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सदस्य राजू जाधव, शिवाजीराव जाधव, सचिव विजय पोवार. मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव तसेच मानकरी उपस्थित होते. 

टॅग्स :Navratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर