शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

वीजनिर्मितीसाठी कागलमध्ये कचऱ्याची आयात

By admin | Updated: January 12, 2017 01:10 IST

इतरांसाठी अनुकरणीय : प्रकल्पासाठी बाहेरुन आणला जातो दररोज दीड टन कचरा

कागल : रोज तयार होणारा कचरा साठवायचा कोठे? तो गोळा कसा करायचा? त्याची निर्गत कोठे आणि कशी करायची, याबद्दल मोठमोठ्या स्थानिक स्वराज्य संस्था चिंतेत आहेत. कागल नगरपालिकेने मात्र घनकचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प प्रत्यक्ष सुरू करून कचऱ्याचे डोंगर होण्यापासून बचाव केला आहे. तसेच हा इतर शहरासमोर आदर्श निर्माण केला आहे. वीजनिर्मीतीसाठी कागलला प्रत्येक्षात कचऱ्याचीच टंचाई भासू लागल्याने त्यांनी कागलबाहेरुन महामार्गावरील हॉटेल, पंचतारांकित औद्योगिक वसाहत आदी ठिकाणाहून कचरा उपलब्ध केला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची दखल केंद्र आणि राज्य सरकारनेही घेतली आहे. कागल नगरपालिकेचा कचरा व्यवस्थापनाचा हा उपक्रम पाहण्यासाठी देशभरातून अधिकारी, प्रतिनिधी भेट देत आहेत.२०१५ पासून हा वीज निर्मितीचा प्रकल्प कागलमध्ये कार्यरत आहे.हा वीजनिर्मिती प्रकल्प प्रामुख्याने ओल्या कचऱ्यापासून होता. या प्रकल्पापूर्वीही गांडूळ खत, कचरा उठाव, घंटागाडी यासारखे उपक्रम राबविले होते. यामुळे मंत्रालयीन पातळीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कागलला देण्याबद्दल आमदार मुश्रीफ यांच्याशी चर्चा केली. त्यासाठी १०० टक्के अनुदान म्हणून साडेतीन कोटी रुपये मंजूर केले. रासायनिक प्रक्रियेतून गॅसनिर्मिती आणि गॅसपासून वीजनिर्मिती असे या प्रकल्पाचे सूत्र आहे. यातून राहणाऱ्या वेस्टेजपासून चांगले खत तयार होते. तसेच जो कुजणारा कचरा नाही, पण विद्युत विघटन होते, तो कचरा नष्ट केला जातो. तसेच कचऱ्यातून मिळणाऱ्या काही वस्तू घटकावर प्रक्रिया किंवा पुनर्वापर करण्यासाठी कागल परिसरातील १५ ते २० भंगार गोळा करणारे येथे येतात. त्यांना नगरपालिकेने काही सुविधा दिल्या आहेत. अशा पद्धतीने १०० टक्के कचऱ्याची निर्गत किंवा विल्हेवाट येथे लावली जाते. हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनंतर केवळ कागलमध्ये आहे. ‘क’ वर्ग नगरपालिकेत देशात हा एकमेव प्रकल्प आहे. (प्रतिनिधी)वीज प्रकल्पासाठी कागलबाहेरील हायवेलगतची हॉटेल्स, बाजारपेठा, पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथूनही सरासरी एक ते दीड टन ओला कचरा आणला जातो.आरोग्य विभागाकडे ८० कर्मचारी, नऊ वाहनेओला-सुका कचरा भरून ठेवण्यासाठी सात हजार घरांना १४ हजार बकेट पुरवठामात्र, अजून नागरिकांच्यात जनजागृतीची गरज; कचरा एकत्रच भरला जातो आणि बकेटचा इतर कामांसाठी वापर होत आहे.