शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

वीजनिर्मितीसाठी कागलमध्ये कचऱ्याची आयात

By admin | Updated: January 12, 2017 01:10 IST

इतरांसाठी अनुकरणीय : प्रकल्पासाठी बाहेरुन आणला जातो दररोज दीड टन कचरा

कागल : रोज तयार होणारा कचरा साठवायचा कोठे? तो गोळा कसा करायचा? त्याची निर्गत कोठे आणि कशी करायची, याबद्दल मोठमोठ्या स्थानिक स्वराज्य संस्था चिंतेत आहेत. कागल नगरपालिकेने मात्र घनकचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प प्रत्यक्ष सुरू करून कचऱ्याचे डोंगर होण्यापासून बचाव केला आहे. तसेच हा इतर शहरासमोर आदर्श निर्माण केला आहे. वीजनिर्मीतीसाठी कागलला प्रत्येक्षात कचऱ्याचीच टंचाई भासू लागल्याने त्यांनी कागलबाहेरुन महामार्गावरील हॉटेल, पंचतारांकित औद्योगिक वसाहत आदी ठिकाणाहून कचरा उपलब्ध केला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची दखल केंद्र आणि राज्य सरकारनेही घेतली आहे. कागल नगरपालिकेचा कचरा व्यवस्थापनाचा हा उपक्रम पाहण्यासाठी देशभरातून अधिकारी, प्रतिनिधी भेट देत आहेत.२०१५ पासून हा वीज निर्मितीचा प्रकल्प कागलमध्ये कार्यरत आहे.हा वीजनिर्मिती प्रकल्प प्रामुख्याने ओल्या कचऱ्यापासून होता. या प्रकल्पापूर्वीही गांडूळ खत, कचरा उठाव, घंटागाडी यासारखे उपक्रम राबविले होते. यामुळे मंत्रालयीन पातळीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कागलला देण्याबद्दल आमदार मुश्रीफ यांच्याशी चर्चा केली. त्यासाठी १०० टक्के अनुदान म्हणून साडेतीन कोटी रुपये मंजूर केले. रासायनिक प्रक्रियेतून गॅसनिर्मिती आणि गॅसपासून वीजनिर्मिती असे या प्रकल्पाचे सूत्र आहे. यातून राहणाऱ्या वेस्टेजपासून चांगले खत तयार होते. तसेच जो कुजणारा कचरा नाही, पण विद्युत विघटन होते, तो कचरा नष्ट केला जातो. तसेच कचऱ्यातून मिळणाऱ्या काही वस्तू घटकावर प्रक्रिया किंवा पुनर्वापर करण्यासाठी कागल परिसरातील १५ ते २० भंगार गोळा करणारे येथे येतात. त्यांना नगरपालिकेने काही सुविधा दिल्या आहेत. अशा पद्धतीने १०० टक्के कचऱ्याची निर्गत किंवा विल्हेवाट येथे लावली जाते. हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनंतर केवळ कागलमध्ये आहे. ‘क’ वर्ग नगरपालिकेत देशात हा एकमेव प्रकल्प आहे. (प्रतिनिधी)वीज प्रकल्पासाठी कागलबाहेरील हायवेलगतची हॉटेल्स, बाजारपेठा, पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथूनही सरासरी एक ते दीड टन ओला कचरा आणला जातो.आरोग्य विभागाकडे ८० कर्मचारी, नऊ वाहनेओला-सुका कचरा भरून ठेवण्यासाठी सात हजार घरांना १४ हजार बकेट पुरवठामात्र, अजून नागरिकांच्यात जनजागृतीची गरज; कचरा एकत्रच भरला जातो आणि बकेटचा इतर कामांसाठी वापर होत आहे.