शहरं
Join us  
Trending Stories
1
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
2
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
3
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
4
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
5
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
6
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
7
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
8
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
9
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
10
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
11
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
12
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
13
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
14
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
15
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
16
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
17
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
18
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
19
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
20
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
Daily Top 2Weekly Top 5

वीजनिर्मितीसाठी कागलमध्ये कचऱ्याची आयात

By admin | Updated: January 12, 2017 01:10 IST

इतरांसाठी अनुकरणीय : प्रकल्पासाठी बाहेरुन आणला जातो दररोज दीड टन कचरा

कागल : रोज तयार होणारा कचरा साठवायचा कोठे? तो गोळा कसा करायचा? त्याची निर्गत कोठे आणि कशी करायची, याबद्दल मोठमोठ्या स्थानिक स्वराज्य संस्था चिंतेत आहेत. कागल नगरपालिकेने मात्र घनकचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प प्रत्यक्ष सुरू करून कचऱ्याचे डोंगर होण्यापासून बचाव केला आहे. तसेच हा इतर शहरासमोर आदर्श निर्माण केला आहे. वीजनिर्मीतीसाठी कागलला प्रत्येक्षात कचऱ्याचीच टंचाई भासू लागल्याने त्यांनी कागलबाहेरुन महामार्गावरील हॉटेल, पंचतारांकित औद्योगिक वसाहत आदी ठिकाणाहून कचरा उपलब्ध केला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची दखल केंद्र आणि राज्य सरकारनेही घेतली आहे. कागल नगरपालिकेचा कचरा व्यवस्थापनाचा हा उपक्रम पाहण्यासाठी देशभरातून अधिकारी, प्रतिनिधी भेट देत आहेत.२०१५ पासून हा वीज निर्मितीचा प्रकल्प कागलमध्ये कार्यरत आहे.हा वीजनिर्मिती प्रकल्प प्रामुख्याने ओल्या कचऱ्यापासून होता. या प्रकल्पापूर्वीही गांडूळ खत, कचरा उठाव, घंटागाडी यासारखे उपक्रम राबविले होते. यामुळे मंत्रालयीन पातळीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कागलला देण्याबद्दल आमदार मुश्रीफ यांच्याशी चर्चा केली. त्यासाठी १०० टक्के अनुदान म्हणून साडेतीन कोटी रुपये मंजूर केले. रासायनिक प्रक्रियेतून गॅसनिर्मिती आणि गॅसपासून वीजनिर्मिती असे या प्रकल्पाचे सूत्र आहे. यातून राहणाऱ्या वेस्टेजपासून चांगले खत तयार होते. तसेच जो कुजणारा कचरा नाही, पण विद्युत विघटन होते, तो कचरा नष्ट केला जातो. तसेच कचऱ्यातून मिळणाऱ्या काही वस्तू घटकावर प्रक्रिया किंवा पुनर्वापर करण्यासाठी कागल परिसरातील १५ ते २० भंगार गोळा करणारे येथे येतात. त्यांना नगरपालिकेने काही सुविधा दिल्या आहेत. अशा पद्धतीने १०० टक्के कचऱ्याची निर्गत किंवा विल्हेवाट येथे लावली जाते. हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनंतर केवळ कागलमध्ये आहे. ‘क’ वर्ग नगरपालिकेत देशात हा एकमेव प्रकल्प आहे. (प्रतिनिधी)वीज प्रकल्पासाठी कागलबाहेरील हायवेलगतची हॉटेल्स, बाजारपेठा, पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथूनही सरासरी एक ते दीड टन ओला कचरा आणला जातो.आरोग्य विभागाकडे ८० कर्मचारी, नऊ वाहनेओला-सुका कचरा भरून ठेवण्यासाठी सात हजार घरांना १४ हजार बकेट पुरवठामात्र, अजून नागरिकांच्यात जनजागृतीची गरज; कचरा एकत्रच भरला जातो आणि बकेटचा इतर कामांसाठी वापर होत आहे.