शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

कोल्हापुरातील पंचगंगा पुलावर वाहतूक बनली धोकादायक, लोखंडी पट्ट्या आल्या बाहेर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 17:46 IST

पुलावर कोल्हापूर शहराकडे आणि पुण्याच्या दिशेने होते मोठी वाहतूक

सतीश पाटीलशिरोली : पंचगंगा नदीवरील पुलाकडे कुणाचं लक्ष नाही. पुलावरील रस्त्याची दुरवस्था गंभीर झाली असून, पुलावर खड्डे पडले आहेत आणि उघड्या झालेल्या लोखंडी पट्ट्या उचकटून बाहेर आल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे, तसेच वारंवार वाहतूक कोंडी होत आहे.कोल्हापूर शहराच्या मुख्य प्रवेशद्वारांपैकी एक असलेल्या पंचगंगा नदीवरील पुलाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पुलावर मोठमोठे खड्डे असून, काही ठिकाणी जुन्या काँक्रीटखालील वापरलेल्या लोखंडी पट्ट्या उचकटून उघड्या पडलेल्या आहेत. या कारणांमुळे वाहनचालकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे.पुलावर दररोज हजारो वाहने कोल्हापूर शहराकडे आणि पुण्याच्या दिशेने येतात आणि जातात. दिवसभर या पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. खड्ड्यांमुळे वाहनांची गती मंदावते आणि त्यामुळे लांबच लांब वाहनांच्या रांगा तयार होतात. यामुळे वेळ वाया जातो, इंधनखर्च वाढतो आणि नागरिकांचे मानसिक त्रासही वाढतात.विशेष म्हणजे, या पुलाची अवस्था इतकी खराब असूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदारांकडून कोणतीही तातडीची उपाययोजना करण्यात आलेली नाही. उघड्या लोखंडी पट्ट्यांवरून वाहने जात असल्यामुळे टायर फटना, गाडी घसरून अपघात होण्याचा धोका कायम आहे. तातडीने दुरुस्ती न केल्यास भविष्यात एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदारांची दुर्लक्षपंचगंगा पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आणि उघड्या झालेल्या लोखंडी पट्ट्यांमुळे वाहनचालकांचे हाल सुरू आहेत. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदारांकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. अपघात होईपर्यंत यंत्रणा जागी होणार का, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.

तावडे हॉटेलकडून शिरोलीकडे जाणाऱ्या पंचगंगा नदीवरील पुलावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. पुलाच्या पिलर जॉइंटच्या जागेवरील लोखंडी अँगल उघडे पडले आहेत. खड्डे इतके खोल आहेत की, दुचाकी आणि रिक्षा यांसारख्या वाहनांच्या चाके अडकतात.- नितीन वंदुरे-पाटील, वाहनचालक, शिरोली