शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
6
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
7
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
8
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
9
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
10
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
11
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
12
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

तोतापुरी, लालबाग आंब्याची आवक,डाळी कडाडल्या : मेथी, कोथिंबीर २० रुपये पेंढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 14:28 IST

तोतापुरी आंब्यांची आवक सुरू झाली असून, किरकोळ बाजारात नगाचा दर १५ ते २० रुपये राहिला आहे. हापूसबरोबरच लालबाग आंब्याची आवक चांगली आहे. डाळींसह कडधान्यांच्या दरांत वाढ झाली असून, पाणीटंचाईमुळे भाजीपाल्याचे दर काहीसे वधारले आहेत. मेथी व कोथिंबीर २० रुपये पेंढी दर राहिला आहे.

ठळक मुद्देतोतापुरी, लालबाग आंब्याची आवकडाळी कडाडल्या : मेथी, कोथिंबीर २० रुपये पेंढी

कोल्हापूर : तोतापुरी आंब्यांची आवक सुरू झाली असून, किरकोळ बाजारात नगाचा दर १५ ते २० रुपये राहिला आहे. हापूसबरोबरच लालबाग आंब्याची आवक चांगली आहे. डाळींसह कडधान्यांच्या दरांत वाढ झाली असून, पाणीटंचाईमुळे भाजीपाल्याचे दर काहीसे वधारले आहेत. मेथी व कोथिंबीर २० रुपये पेंढी दर राहिला आहे.सध्या बाजारात हापूस आंब्यांची रेलचेल सुरू आहे. त्यात कोकणातील हापूसची आवक काहीशी मंदावली असून, मद्रास हापूस मात्र जोेरात आहे. दोन्ही आंबे दिसायला सारखेच असले तरी चवीत थोडा फरक जाणवतो. कोकण हापूसची पेटी सरासरी १२५० रुपये, तर २२५ रुपये बॉक्सचा दर आहे. त्या तुलनेत मद्रास हापूसची पेटी ९०० रुपये, तर २०० रुपये बॉक्सचा दर राहिला आहे. त्याशिवाय मद्रास पायरीचीही आवक सुरू झाली असून, त्याचा दर हापूसच्या तुलनेत पेटीमागे २०० रुपयांनी कमी आहे.

हापूसचा दर अद्यापही थोडा तेजीत असला तरी सामान्य ग्राहकांना लालबाग आंब्याने दिलासा दिला आहे. (छाया- आदित्य वेल्हाळ)

यंदा हापूस बाजारात असतानाच तोतापुरी आंब्याची आवक सुरू झाली आहे. तोतापुरीची आवक कमी असली तरी दर मात्र आवाक्यात आहे. किरकोळ बाजारात १५ ते २० रुपये नगाचा दर आहे. लालबागचा आंबाही आवाक्यात असून ६० रुपये किलोपर्यंत दर राहिला आहे.कडक उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाला आहे. विशेष करून पालेभाज्यांची आवक मंदावल्याने दर चांगलेच भडकले आहेत. किरकोळ बाजारात मेथी २० रुपये, तर कोथिंबिरीचे दरही त्याच्या जवळपासच आहेत. वांग्यांच्या दरात थोडी वाढ झाली असून, टोमॅटोही २० रुपये किलोपर्यंत आहे. ढबू, कारली, दोडक्याच्या दरांत थोडी वाढ झाली आहे. ओला वाटाणा पुन्हा बाजारात दिसत असून दर मात्र ८० रुपये किलो आहे.वर्षभर स्थिर असणाऱ्या कडधान्यांच्या दरांत वाढ होऊ लागली आहे. तूरडाळ ९० रुपये, हरभराडाळ ७०, मूगडाळ १००, मटकी १२० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. ऐन चटणीच्या हंगामात मिरचीसह खोबरे व मसाल्याच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. ब्याडगी १६०, गुंटूर १४० रुपये किलो आहे. शाबूने तर शंभरी गाठली असून, साखर व सरकी तेल मात्र स्थिर आहे.मक्याला दोन वर्षांतील उच्चांकी दरमक्याचे उत्पादन घटल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात गेल्या वर्षी १० ते १२ रुपये किलोचा दर होता. या वर्षी १८ ते २० रुपयांपर्यंत वाढ झाली असून, आगामी महिन्याभरात २२ रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.

कांदा-बटाटा स्थिरकांद्याची आवक थोडी वाढली आहे. घाऊक बाजारात कांदा ११ रुपये, तर बटाटा १६ रुपये किलोपर्यंत आहे. लसणाने मात्र थोडी उसळी घेतली आहे. 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर