शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

झेंडूचे दर घसरले, फूल उत्पादक शेतकरी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 12:30 IST

गणेशोत्सवात ५० ते ८० रुपये पावशेर या दराने विकला गेलेला झेंडू आता याच दरात किलोवर विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. अवघ्या १५-२० दिवसांच्या कालावधीतच दरात कमालीची घसरण झाल्याने फूल उत्पादक शेतकरी नाराज आहे. दसऱ्यानिमित्त शहरात झेंडूचे ढीग लागले होते. ३० रुपयांना अर्धा किलो याप्रमाणे दर होता.

ठळक मुद्दे फूल उत्पादक शेतकरी नाराज खाद्यतेल, डाळींचे दर स्थिर : नारळ स्वस्त

कोल्हापूर :  गणेशोत्सवात ५० ते ८० रुपये पावशेर या दराने विकला गेलेला झेंडू आता याच दरात किलोवर विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. अवघ्या १५-२० दिवसांच्या कालावधीतच दरात कमालीची घसरण झाल्याने फूल उत्पादक शेतकरी नाराज आहे. दसऱ्यानिमित्त शहरात झेंडूचे ढीग लागले होते. ३० रुपयांना अर्धा किलो याप्रमाणे दर होता.

बाजार समितीत सौद्याला दरात घसरण झाली असतानाही किरकोळ बाजारात कांदा आणि टोमॅटो मात्र चढ्या दरानेच विकले जात आहेत. उच्च प्रतीचा कांदा व टोमॅटो ५० रुपये किलो दराने विकला जात आहे. खाद्यतेल, डाळींसह भाजीपाल्याचेही दर गत आठवड्याइतकेच स्थिर आहेत. नारळही बऱ्यापैकी स्वस्त झाले आहेत. ओली भुईमूग शेंग बाजारात आली असून १०० रुपये किलोला दर निघाला आहे.लक्ष्मीपुरीतील आठवडा बाजारात फेरफटका मारला असता, भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसले. दरही आवाक्यात आले आहेत. गवार अजूनही ८० रुपये किलो आहे. फ्लॉवर ३० ते ६० रुपये गड्डा असा दर आहे. याव्यतिरिक्त उर्वरित सर्वच फळभाज्यांचे दर ३० ते ५० रुपये किलो या पटीतच आहेत. मेथी, पालक, शेपू, कांदापात, पोकळा या भाज्या १० रुपये पेंढी आहेत. कोथिंबीर पेंढीचा दर पाच ते १० रुपये आहे.बाजारात कांदे, टोमॅटोची आवक जास्त आहे. निर्यातबंदीमुळे कांद्यांचे घाऊक बाजारातील दर १० किलोंना ३०० रुपये आहेत; पण प्रत्यक्षात किरकोळ बाजारात मात्र अजूनही ४० ते ५० रुपये किलो असाच कांदा विकला जात आहे. टोमॅटोचेही तसेच आहे. घाऊक बाजारात २०० रुपयांना १० किलो दर असताना बाजारात मात्र तो ४० ते ५० रुपयांनाच विकला जात आहे.दसरा, दिवाळीमुळे खाद्यतेल आणि डाळींना मागणी गृहीत धरून दुकाने फुल्ल झाली आहेत. दर मात्र स्थिरच आहेत. हरभराडाळ ७० रुपये आहे. उडीद, मसूर, मूगडाळ ८० रुपये आहे. तूरडाळ ९० रुपयांवर स्थिर आहे. मैदा ३६ रुपये आहे. शेंगदाण्याचे दर १३० वरच्या गेले आहेत. गहू व ज्वारी ३२ ते ३६ रुपयांवर आहे. साखर ३८ वर पोहोचली आहे. खाद्यतेलामध्ये सरकी ९०, सोयाबीन व सूर्यफूल १००, शेंगतेल १३० रुपये किलो आहे. सणासुदीला नारळाची मागणी वाढत असली तरी दर मात्र कमीच आहे. १२ ते २५ रुपये नग असा दर आहे. 

 

 

टॅग्स :Navratriनवरात्रीkolhapurकोल्हापूर