शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

झेंडूचे दर घसरले, फूल उत्पादक शेतकरी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 12:30 IST

गणेशोत्सवात ५० ते ८० रुपये पावशेर या दराने विकला गेलेला झेंडू आता याच दरात किलोवर विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. अवघ्या १५-२० दिवसांच्या कालावधीतच दरात कमालीची घसरण झाल्याने फूल उत्पादक शेतकरी नाराज आहे. दसऱ्यानिमित्त शहरात झेंडूचे ढीग लागले होते. ३० रुपयांना अर्धा किलो याप्रमाणे दर होता.

ठळक मुद्दे फूल उत्पादक शेतकरी नाराज खाद्यतेल, डाळींचे दर स्थिर : नारळ स्वस्त

कोल्हापूर :  गणेशोत्सवात ५० ते ८० रुपये पावशेर या दराने विकला गेलेला झेंडू आता याच दरात किलोवर विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. अवघ्या १५-२० दिवसांच्या कालावधीतच दरात कमालीची घसरण झाल्याने फूल उत्पादक शेतकरी नाराज आहे. दसऱ्यानिमित्त शहरात झेंडूचे ढीग लागले होते. ३० रुपयांना अर्धा किलो याप्रमाणे दर होता.

बाजार समितीत सौद्याला दरात घसरण झाली असतानाही किरकोळ बाजारात कांदा आणि टोमॅटो मात्र चढ्या दरानेच विकले जात आहेत. उच्च प्रतीचा कांदा व टोमॅटो ५० रुपये किलो दराने विकला जात आहे. खाद्यतेल, डाळींसह भाजीपाल्याचेही दर गत आठवड्याइतकेच स्थिर आहेत. नारळही बऱ्यापैकी स्वस्त झाले आहेत. ओली भुईमूग शेंग बाजारात आली असून १०० रुपये किलोला दर निघाला आहे.लक्ष्मीपुरीतील आठवडा बाजारात फेरफटका मारला असता, भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसले. दरही आवाक्यात आले आहेत. गवार अजूनही ८० रुपये किलो आहे. फ्लॉवर ३० ते ६० रुपये गड्डा असा दर आहे. याव्यतिरिक्त उर्वरित सर्वच फळभाज्यांचे दर ३० ते ५० रुपये किलो या पटीतच आहेत. मेथी, पालक, शेपू, कांदापात, पोकळा या भाज्या १० रुपये पेंढी आहेत. कोथिंबीर पेंढीचा दर पाच ते १० रुपये आहे.बाजारात कांदे, टोमॅटोची आवक जास्त आहे. निर्यातबंदीमुळे कांद्यांचे घाऊक बाजारातील दर १० किलोंना ३०० रुपये आहेत; पण प्रत्यक्षात किरकोळ बाजारात मात्र अजूनही ४० ते ५० रुपये किलो असाच कांदा विकला जात आहे. टोमॅटोचेही तसेच आहे. घाऊक बाजारात २०० रुपयांना १० किलो दर असताना बाजारात मात्र तो ४० ते ५० रुपयांनाच विकला जात आहे.दसरा, दिवाळीमुळे खाद्यतेल आणि डाळींना मागणी गृहीत धरून दुकाने फुल्ल झाली आहेत. दर मात्र स्थिरच आहेत. हरभराडाळ ७० रुपये आहे. उडीद, मसूर, मूगडाळ ८० रुपये आहे. तूरडाळ ९० रुपयांवर स्थिर आहे. मैदा ३६ रुपये आहे. शेंगदाण्याचे दर १३० वरच्या गेले आहेत. गहू व ज्वारी ३२ ते ३६ रुपयांवर आहे. साखर ३८ वर पोहोचली आहे. खाद्यतेलामध्ये सरकी ९०, सोयाबीन व सूर्यफूल १००, शेंगतेल १३० रुपये किलो आहे. सणासुदीला नारळाची मागणी वाढत असली तरी दर मात्र कमीच आहे. १२ ते २५ रुपये नग असा दर आहे. 

 

 

टॅग्स :Navratriनवरात्रीkolhapurकोल्हापूर