शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

झेंडूचे दर घसरले, फूल उत्पादक शेतकरी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 12:30 IST

गणेशोत्सवात ५० ते ८० रुपये पावशेर या दराने विकला गेलेला झेंडू आता याच दरात किलोवर विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. अवघ्या १५-२० दिवसांच्या कालावधीतच दरात कमालीची घसरण झाल्याने फूल उत्पादक शेतकरी नाराज आहे. दसऱ्यानिमित्त शहरात झेंडूचे ढीग लागले होते. ३० रुपयांना अर्धा किलो याप्रमाणे दर होता.

ठळक मुद्दे फूल उत्पादक शेतकरी नाराज खाद्यतेल, डाळींचे दर स्थिर : नारळ स्वस्त

कोल्हापूर :  गणेशोत्सवात ५० ते ८० रुपये पावशेर या दराने विकला गेलेला झेंडू आता याच दरात किलोवर विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. अवघ्या १५-२० दिवसांच्या कालावधीतच दरात कमालीची घसरण झाल्याने फूल उत्पादक शेतकरी नाराज आहे. दसऱ्यानिमित्त शहरात झेंडूचे ढीग लागले होते. ३० रुपयांना अर्धा किलो याप्रमाणे दर होता.

बाजार समितीत सौद्याला दरात घसरण झाली असतानाही किरकोळ बाजारात कांदा आणि टोमॅटो मात्र चढ्या दरानेच विकले जात आहेत. उच्च प्रतीचा कांदा व टोमॅटो ५० रुपये किलो दराने विकला जात आहे. खाद्यतेल, डाळींसह भाजीपाल्याचेही दर गत आठवड्याइतकेच स्थिर आहेत. नारळही बऱ्यापैकी स्वस्त झाले आहेत. ओली भुईमूग शेंग बाजारात आली असून १०० रुपये किलोला दर निघाला आहे.लक्ष्मीपुरीतील आठवडा बाजारात फेरफटका मारला असता, भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसले. दरही आवाक्यात आले आहेत. गवार अजूनही ८० रुपये किलो आहे. फ्लॉवर ३० ते ६० रुपये गड्डा असा दर आहे. याव्यतिरिक्त उर्वरित सर्वच फळभाज्यांचे दर ३० ते ५० रुपये किलो या पटीतच आहेत. मेथी, पालक, शेपू, कांदापात, पोकळा या भाज्या १० रुपये पेंढी आहेत. कोथिंबीर पेंढीचा दर पाच ते १० रुपये आहे.बाजारात कांदे, टोमॅटोची आवक जास्त आहे. निर्यातबंदीमुळे कांद्यांचे घाऊक बाजारातील दर १० किलोंना ३०० रुपये आहेत; पण प्रत्यक्षात किरकोळ बाजारात मात्र अजूनही ४० ते ५० रुपये किलो असाच कांदा विकला जात आहे. टोमॅटोचेही तसेच आहे. घाऊक बाजारात २०० रुपयांना १० किलो दर असताना बाजारात मात्र तो ४० ते ५० रुपयांनाच विकला जात आहे.दसरा, दिवाळीमुळे खाद्यतेल आणि डाळींना मागणी गृहीत धरून दुकाने फुल्ल झाली आहेत. दर मात्र स्थिरच आहेत. हरभराडाळ ७० रुपये आहे. उडीद, मसूर, मूगडाळ ८० रुपये आहे. तूरडाळ ९० रुपयांवर स्थिर आहे. मैदा ३६ रुपये आहे. शेंगदाण्याचे दर १३० वरच्या गेले आहेत. गहू व ज्वारी ३२ ते ३६ रुपयांवर आहे. साखर ३८ वर पोहोचली आहे. खाद्यतेलामध्ये सरकी ९०, सोयाबीन व सूर्यफूल १००, शेंगतेल १३० रुपये किलो आहे. सणासुदीला नारळाची मागणी वाढत असली तरी दर मात्र कमीच आहे. १२ ते २५ रुपये नग असा दर आहे. 

 

 

टॅग्स :Navratriनवरात्रीkolhapurकोल्हापूर