शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटो उत्पादक शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:23 IST

संदीप बावचे शिरोळ : नैसर्गिक आपत्तीच्या ओझ्याने शेतकरी हतबल झाला असताना दर गडगडल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...

संदीप बावचे

शिरोळ : नैसर्गिक आपत्तीच्या ओझ्याने शेतकरी हतबल झाला असताना दर गडगडल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या टोमॅटोला दोन ते तीन रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडले आहेत.

मुंबई, अहमदाबाद बाजारपेठांतदेखील टोमॅटोला दर कमी मिळत आहे. त्यामुळे मालाचा उठाव होत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यास मार्केट कमिट्यांना शासनाने आदेश देऊन शेतकरीहिताचे धोरण राबविण्याची गरज आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात दहाहून अधिक तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात भाजीपाला घेतला जातो. गेल्या २५ वर्षांपासून भाजीपाला क्षेत्रात शिरोळ, हातकणंगले तालुक्यांनी आपले नाव राज्यभरात कमाविले आहे. नांदणी, दानोळी, मजरेवाडी, अब्दुललाट, अकिवाट यांसह परिसरातून अनेक शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेतात. एकेकाळी टोमॅटोचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरोळ तालुक्यात टोमॅटोचे क्षेत्र कमी झाले असले तरी कमी-जास्त प्रमाणात शेतकरी उत्पादन घेत आहेत. भाजीपाल्याला अनिश्चित दर, रोगांचा वाढलेला प्रादुर्भाव, नैसर्गिक आपत्ती यातून मार्गाक्रमण करीत शेतकरी उभारत असताना मुंबई, अहमदाबाद बाजारपेठेत मागणी नसल्यामुळे वीस किलोच्या क्रेटला शंभर रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

टोमॅटोच्या एका एकरासाठी दीड लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च येतो. मात्र, दर पाहता विक्रीतून साधा उत्पादन खर्चही निघत नाही. आठवडी बाजार बंद असल्याने शिवाय मालाची आवक वाढल्याने उठाव होत नसल्याचे व्यापारी सांगतात. मुंबई बाजारपेठेत पाच ते सात, तर अहमदाबादमध्ये आठ ते दहा रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून माल पाठविण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

कोट -

१६६ कॅरेट टोमॅटो लिलाव बाजारात पाठविले होते. काढणी व वाहतूक असा चार हजार रुपये खर्च आला; परंतु हातात ८८८ रुपयेच मिळाले. त्यामुळे मार्केटला टोमॅटो पाठविला नसल्याने जवळपास चार हजार कॅरेट मालाचे नुकसान झाले आहे.

- रवी खुरपे, शेतकरी मजरेवाडी

कोट -

दर पडल्याने टोमॅटो काढणी व वाहतुकीचा खर्च देखील सोसावा लागत आहे. गतवर्षी श्रावणामध्ये चांगला दर होता. यंदा परिस्थिती उलट झाली आहे. त्यामुळे केंद्राने शेतकऱ्यांसाठी ठोस धोरण राबविण्याची गरज आहे.

- बाळासाहेब पाटील, शेतकरी, नांदणी.

फोटो - २८०८२०२१-जेएवाय-०१-टोमॅटो