शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

टोमॅटो शेतातच लागले कुजू, दर नसल्यामुळे शेतकरी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 17:54 IST

रोहित तवंदकर दानोळी : दानोळी (ता. शिरोळ) येथील शेतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून, वेगवेगळ्या फळभाज्यांची पिके प्रामुख्याने घेतली जातात. ...

रोहित तवंदकरदानोळी : दानोळी (ता. शिरोळ) येथील शेतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून, वेगवेगळ्या फळभाज्यांची पिके प्रामुख्याने घेतली जातात. कोबी, ढबू, फ्लॉवर, टोमॅटो या प्रकारची पिके मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत पाठविली जातात. सध्या टोमॅटो पिकाला भाव नसल्यामुळे टोमॅटोचे पीक शेतातच राहून कुजत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उभ्या पिकावर नांगर फिरविण्याची वेळ आली आहे.दानोळी परिसरातील कोथळी, उमळवाड, निमशिरगाव, कवठेसार, तमदलगे गावांमधून टोमॅटो पिकाचे मोठे उत्पादन घेतले जाते. टोमॅटोला दर मिळत नसल्याने काढणीचाही दर परवडेनासा झाला आहे. मालाला भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. खर्चापेक्षा तीन ते चार पट फायदा मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. या वर्षी सुरुवातीला टोमॅटोला शंभर रुपये किलोचा भाव मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पीक घेतले; परंतु पीक आल्यानंतर दर ढासळल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. परिणामी काढणीचाही खर्च निघत नसल्यामुळे टोमॅटोचे पीक शेतातच राहिल्यामुळे ते कुजत आहे. दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक वेळा शेतातील उभ्या पिकावर शेतकऱ्याला नांगर फिरवावा लागला आहे. यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे मालाला योग्य हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

मोठ्या मेहनतीने शेतकरी शेतात फळभाज्या करत असतो; पण त्या मालाला दर मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. देश वाचविण्यासाठी बळीराजा जगला पाहिजे यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. - पोपट शिंदे, शेतकरी, दानोळी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी