शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

टोमॅटो शेतातच लागले कुजू, दर नसल्यामुळे शेतकरी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 17:54 IST

रोहित तवंदकर दानोळी : दानोळी (ता. शिरोळ) येथील शेतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून, वेगवेगळ्या फळभाज्यांची पिके प्रामुख्याने घेतली जातात. ...

रोहित तवंदकरदानोळी : दानोळी (ता. शिरोळ) येथील शेतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून, वेगवेगळ्या फळभाज्यांची पिके प्रामुख्याने घेतली जातात. कोबी, ढबू, फ्लॉवर, टोमॅटो या प्रकारची पिके मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत पाठविली जातात. सध्या टोमॅटो पिकाला भाव नसल्यामुळे टोमॅटोचे पीक शेतातच राहून कुजत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उभ्या पिकावर नांगर फिरविण्याची वेळ आली आहे.दानोळी परिसरातील कोथळी, उमळवाड, निमशिरगाव, कवठेसार, तमदलगे गावांमधून टोमॅटो पिकाचे मोठे उत्पादन घेतले जाते. टोमॅटोला दर मिळत नसल्याने काढणीचाही दर परवडेनासा झाला आहे. मालाला भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. खर्चापेक्षा तीन ते चार पट फायदा मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. या वर्षी सुरुवातीला टोमॅटोला शंभर रुपये किलोचा भाव मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पीक घेतले; परंतु पीक आल्यानंतर दर ढासळल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. परिणामी काढणीचाही खर्च निघत नसल्यामुळे टोमॅटोचे पीक शेतातच राहिल्यामुळे ते कुजत आहे. दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक वेळा शेतातील उभ्या पिकावर शेतकऱ्याला नांगर फिरवावा लागला आहे. यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे मालाला योग्य हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

मोठ्या मेहनतीने शेतकरी शेतात फळभाज्या करत असतो; पण त्या मालाला दर मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. देश वाचविण्यासाठी बळीराजा जगला पाहिजे यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. - पोपट शिंदे, शेतकरी, दानोळी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी