शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी कार्यालयासमोर पेटविल्या चुली

By admin | Updated: August 30, 2016 00:49 IST

दाखल्यांसाठी आंदोलन : आलासमध्ये प्रश्न न सुटल्याने रात्रीही कष्टकरी शेतमजूर, शेतकरी आंदोलकांचा ठिय्या

बुबनाळ : आलास (ता. शिरोळ) येथील गावकामगार तलाठी कार्यालयावर शिरोळ तालुका कष्टकरी शेतमजूर संघटनेतर्फे संजय गांधी निराधार योजनेसह विविध शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना २१ हजार रुपयांपर्यंत उत्पन्नाचा दाखला मिळावा, या मागणीसाठी लाभार्थ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू केले. सायंकाळी हा प्रश्न सुटला नसल्यामुळे तलाठी कार्यालयासमोरच चुली मांडून स्वयंपाक करण्यात आला. यावेळी शासनाचा निषेध करण्यात आला. आलास येथील गावकामगार तलाठी कार्यालयावर शिरोळ तालुका कष्टकरी शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सुरेश सासने यांच्या नेतृत्वाखाली संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी, श्रावणबाळ निवृत्तिवेतन योजनेतील लाभार्थ्यांना लाभ मिळावा, त्यांना २१ हजार रुपयांचे उत्पन्न दाखले मिळावेत यासाठी वेळोवेळी तलाठी कार्यालयाकडे मागणी करूनही टाळाटाळ करीत आहेत. जे दाखले दिले आहेत, ते दाखले पूर्ण चौकशी न करता दिले आहेत. त्याचबरोबर दारिद्र्यरेषेमधील लोकांचे उत्पन्न दाखलेही वाढीव उत्पन्न करून दिले आहेत. त्यामुळे या लाभार्थ्यांवर तलाठी कार्यालयाकडून अन्याय झाला आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांची फेरचौकशी करून उत्पन्नाचे दाखले मिळावेत, या मागणीसाठी सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून तलाठी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते. कार्यकर्त्यांनी तलाठी कार्यालयासमोर रात्रीच्या जेवणासाठी दगडाच्या चुली मांडून स्वयंपाक केला. आंदोलनकर्ते सर्व दाखले एका वेळीच मिळावेत यावर ठाम असून, यावेळी शासनाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात सुरेश सासने, जिनपाल कोळी, सिकंदर मुजावर, पद्मावती उपाध्ये, सुशीला उपाध्ये, लीलावती गिताजे, फुलाबाई घुणके, गुणवंती हासुरे, शानाबाई गावडे यांच्यासह लाभार्थी सहभागी झाले होते. दरम्यान, नृसिंहवाडीचे मंडल अधिकारी ए. डी. पुजारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, शिरोळ तालुका कष्टकरी शेतकरी मजूर संघटना यांनी संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ निवृत्तिवेतन योजनेबाबत २१ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न दाखला मिळण्यासाठी आलास तलाठी यांच्याकडे मागणी केली होती. त्या अनुषंगाने पात्र लाभार्थी आहेत, त्यांचे दाखले तयार केले आहेत. मुले नोकरी करतात, कुटुंबाच्या व्यक्तीच्या नावाने शेती आहे, त्यामुळे २१ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न दाखले देता येत नाहीत; परंतु आंदोलनादिवशी ९० अर्ज दाखल केले आहेत. चौकशी करून पात्र असतील त्यांना १० सप्टेंबरपर्यंत दाखले देण्याची कार्यवाही करीत आहे. परंतु , आताच सगळ्यांनी दाखल्यांची मागणी केल्याने स्थानिक चौकशी केल्याशिवाय ते देता येत नाहीत. (प्रतिनिधी)आलास (ता. शिरोळ) येथे शिरोळ तालुका कष्टकरी शेतमजूर संघटनेच्या वतीने शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना २१ हजार रुपयांपर्यंत उत्पन्नाचा दाखला मिळण्यासाठी सोमवारी तलाठी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.