शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

तलाठी कार्यालयासमोर पेटविल्या चुली

By admin | Updated: August 30, 2016 00:49 IST

दाखल्यांसाठी आंदोलन : आलासमध्ये प्रश्न न सुटल्याने रात्रीही कष्टकरी शेतमजूर, शेतकरी आंदोलकांचा ठिय्या

बुबनाळ : आलास (ता. शिरोळ) येथील गावकामगार तलाठी कार्यालयावर शिरोळ तालुका कष्टकरी शेतमजूर संघटनेतर्फे संजय गांधी निराधार योजनेसह विविध शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना २१ हजार रुपयांपर्यंत उत्पन्नाचा दाखला मिळावा, या मागणीसाठी लाभार्थ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू केले. सायंकाळी हा प्रश्न सुटला नसल्यामुळे तलाठी कार्यालयासमोरच चुली मांडून स्वयंपाक करण्यात आला. यावेळी शासनाचा निषेध करण्यात आला. आलास येथील गावकामगार तलाठी कार्यालयावर शिरोळ तालुका कष्टकरी शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सुरेश सासने यांच्या नेतृत्वाखाली संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी, श्रावणबाळ निवृत्तिवेतन योजनेतील लाभार्थ्यांना लाभ मिळावा, त्यांना २१ हजार रुपयांचे उत्पन्न दाखले मिळावेत यासाठी वेळोवेळी तलाठी कार्यालयाकडे मागणी करूनही टाळाटाळ करीत आहेत. जे दाखले दिले आहेत, ते दाखले पूर्ण चौकशी न करता दिले आहेत. त्याचबरोबर दारिद्र्यरेषेमधील लोकांचे उत्पन्न दाखलेही वाढीव उत्पन्न करून दिले आहेत. त्यामुळे या लाभार्थ्यांवर तलाठी कार्यालयाकडून अन्याय झाला आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांची फेरचौकशी करून उत्पन्नाचे दाखले मिळावेत, या मागणीसाठी सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून तलाठी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते. कार्यकर्त्यांनी तलाठी कार्यालयासमोर रात्रीच्या जेवणासाठी दगडाच्या चुली मांडून स्वयंपाक केला. आंदोलनकर्ते सर्व दाखले एका वेळीच मिळावेत यावर ठाम असून, यावेळी शासनाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात सुरेश सासने, जिनपाल कोळी, सिकंदर मुजावर, पद्मावती उपाध्ये, सुशीला उपाध्ये, लीलावती गिताजे, फुलाबाई घुणके, गुणवंती हासुरे, शानाबाई गावडे यांच्यासह लाभार्थी सहभागी झाले होते. दरम्यान, नृसिंहवाडीचे मंडल अधिकारी ए. डी. पुजारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, शिरोळ तालुका कष्टकरी शेतकरी मजूर संघटना यांनी संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ निवृत्तिवेतन योजनेबाबत २१ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न दाखला मिळण्यासाठी आलास तलाठी यांच्याकडे मागणी केली होती. त्या अनुषंगाने पात्र लाभार्थी आहेत, त्यांचे दाखले तयार केले आहेत. मुले नोकरी करतात, कुटुंबाच्या व्यक्तीच्या नावाने शेती आहे, त्यामुळे २१ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न दाखले देता येत नाहीत; परंतु आंदोलनादिवशी ९० अर्ज दाखल केले आहेत. चौकशी करून पात्र असतील त्यांना १० सप्टेंबरपर्यंत दाखले देण्याची कार्यवाही करीत आहे. परंतु , आताच सगळ्यांनी दाखल्यांची मागणी केल्याने स्थानिक चौकशी केल्याशिवाय ते देता येत नाहीत. (प्रतिनिधी)आलास (ता. शिरोळ) येथे शिरोळ तालुका कष्टकरी शेतमजूर संघटनेच्या वतीने शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना २१ हजार रुपयांपर्यंत उत्पन्नाचा दाखला मिळण्यासाठी सोमवारी तलाठी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.