शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

तलाठी कार्यालयासमोर पेटविल्या चुली

By admin | Updated: August 30, 2016 00:49 IST

दाखल्यांसाठी आंदोलन : आलासमध्ये प्रश्न न सुटल्याने रात्रीही कष्टकरी शेतमजूर, शेतकरी आंदोलकांचा ठिय्या

बुबनाळ : आलास (ता. शिरोळ) येथील गावकामगार तलाठी कार्यालयावर शिरोळ तालुका कष्टकरी शेतमजूर संघटनेतर्फे संजय गांधी निराधार योजनेसह विविध शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना २१ हजार रुपयांपर्यंत उत्पन्नाचा दाखला मिळावा, या मागणीसाठी लाभार्थ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू केले. सायंकाळी हा प्रश्न सुटला नसल्यामुळे तलाठी कार्यालयासमोरच चुली मांडून स्वयंपाक करण्यात आला. यावेळी शासनाचा निषेध करण्यात आला. आलास येथील गावकामगार तलाठी कार्यालयावर शिरोळ तालुका कष्टकरी शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सुरेश सासने यांच्या नेतृत्वाखाली संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी, श्रावणबाळ निवृत्तिवेतन योजनेतील लाभार्थ्यांना लाभ मिळावा, त्यांना २१ हजार रुपयांचे उत्पन्न दाखले मिळावेत यासाठी वेळोवेळी तलाठी कार्यालयाकडे मागणी करूनही टाळाटाळ करीत आहेत. जे दाखले दिले आहेत, ते दाखले पूर्ण चौकशी न करता दिले आहेत. त्याचबरोबर दारिद्र्यरेषेमधील लोकांचे उत्पन्न दाखलेही वाढीव उत्पन्न करून दिले आहेत. त्यामुळे या लाभार्थ्यांवर तलाठी कार्यालयाकडून अन्याय झाला आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांची फेरचौकशी करून उत्पन्नाचे दाखले मिळावेत, या मागणीसाठी सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून तलाठी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते. कार्यकर्त्यांनी तलाठी कार्यालयासमोर रात्रीच्या जेवणासाठी दगडाच्या चुली मांडून स्वयंपाक केला. आंदोलनकर्ते सर्व दाखले एका वेळीच मिळावेत यावर ठाम असून, यावेळी शासनाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात सुरेश सासने, जिनपाल कोळी, सिकंदर मुजावर, पद्मावती उपाध्ये, सुशीला उपाध्ये, लीलावती गिताजे, फुलाबाई घुणके, गुणवंती हासुरे, शानाबाई गावडे यांच्यासह लाभार्थी सहभागी झाले होते. दरम्यान, नृसिंहवाडीचे मंडल अधिकारी ए. डी. पुजारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, शिरोळ तालुका कष्टकरी शेतकरी मजूर संघटना यांनी संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ निवृत्तिवेतन योजनेबाबत २१ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न दाखला मिळण्यासाठी आलास तलाठी यांच्याकडे मागणी केली होती. त्या अनुषंगाने पात्र लाभार्थी आहेत, त्यांचे दाखले तयार केले आहेत. मुले नोकरी करतात, कुटुंबाच्या व्यक्तीच्या नावाने शेती आहे, त्यामुळे २१ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न दाखले देता येत नाहीत; परंतु आंदोलनादिवशी ९० अर्ज दाखल केले आहेत. चौकशी करून पात्र असतील त्यांना १० सप्टेंबरपर्यंत दाखले देण्याची कार्यवाही करीत आहे. परंतु , आताच सगळ्यांनी दाखल्यांची मागणी केल्याने स्थानिक चौकशी केल्याशिवाय ते देता येत नाहीत. (प्रतिनिधी)आलास (ता. शिरोळ) येथे शिरोळ तालुका कष्टकरी शेतमजूर संघटनेच्या वतीने शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना २१ हजार रुपयांपर्यंत उत्पन्नाचा दाखला मिळण्यासाठी सोमवारी तलाठी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.