शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

टोलप्रश्नी १५ दिवसांत सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी : नरवणकर

By admin | Updated: February 13, 2015 22:53 IST

कृती समितीतर्फे याचिका दाखल

कोल्हापूर : शहरात सुरू असलेल्या टोलची राज्य शासनाने काढलेली अधिसूचनाच बेकायदेशीर आहे. प्रकल्प अपूर्ण असताना शहरवासीयांवर लादलेला हा जाचक टोल रद्द करावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने नुकतीच सर्वाेच्च न्यायालायत याचिका दाखल केली आहे. याप्रश्नी पंधरा दिवसांत सुनावणी सुरू होईल, असे कृती समितीचे वकील युवराज नरवणकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. कोल्हापुरातील टोलप्रश्नी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या तीन याचिका फेटाळली होती. या याचिका फेटाळताना न्यायालयाने या प्रकरणातील मेरिट तपासले नाही. रस्ते प्रकल्प अपूर्ण असतानाही टोलवसुली सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली. राज्य शासनातर्फे प्रकल्पाच्या मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू आहे. नेमके प्रकल्पाचे किती काम झाले, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे टोल वसुलीची अधिसूचना बेकायदेशीर आहे. ती रद्द करावी, अशी मागणी याचिकेद्वारे सर्वाेच्च न्यायालयात केली असल्याचे अ‍ॅड. नरवणकर यांनी सांगितले.सर्वाेच्च न्यायालयात मागील आठवड्यातच याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्य शासनाने टोल मुक्तीबाबत ठोस निर्णय घेतल्यास याचिका मागे घेण्याचा पर्याय शिल्लक आहे. टोल रद्दच्या प्रक्रियेत ही याचिका आडवी येणार नाही. मात्र, मुदतीत याचिका दाखल न केल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. यासाठीच कृती समितीतर्फे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात मंगळवारपर्यंत (दि. १७) सुनावणीची नेमकी तारीख स्पष्ट होईल. पंधरा दिवसांत सुनावणी सुरू होण्यास हरकत नाही, असे अ‍ॅड. नरवणकर यांनी स्पष्ट केले.