शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

टोल आंदोलक न्यायालयात चकरा मारून बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:02 AM

‘टोलचे आंदोलन हे राजकीय असल्यामुळे सर्व गुन्हे काढून टाकले जातील’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, तरी गुन्हे काढून टाकले नसल्यामुळे सुमारे दीडशे कार्यकर्त्यांच्या वाट्याला न्यायालयात चकरा मारण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देटोल आंदोलक न्यायालयात चकरा मारून बेजारमुख्यमंत्र्यांना आश्वासनाचा विसर : खटले काढून घेण्याची घोषणा हवेतच

कोल्हापूर : टोल माफ झाला, ‘आयआरबी’ कंपनीला हद्दपार केले, कृतज्ञता म्हणून मुख्यमंत्र्यांचा जाहीर नागरी सत्कार झाला. त्यावेळी ‘टोलचे आंदोलन हे राजकीय असल्यामुळे आंदोलनात कार्यकर्त्यांवर दाखल झालेले सर्व गुन्हे काढून टाकले जातील’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या गोष्टीला तीन वर्षे उलटली तरी कार्यकर्त्यांवरील गुन्हे काढून टाकले नसल्यामुळे सुमारे दीडशे कार्यकर्त्यांच्या वाट्याला कामधंदे सोडून न्यायालयात चकरा मारण्याची वेळ आली आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांना त्यांनीच दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला की, त्याकडे दुर्लक्ष करून फसवणूक केली याबाबत कार्यकर्त्यांच्या मनात शंका आहेत. गेल्या तीन वर्षांपासून रोजगार बुडवून अनेक कार्यकर्ते न्यायालयात सुनावणीच्या निमित्ताने येरझाऱ्या मारून वैतागले आहेत.

आज, गुरुवारी कोल्हापुरातील कार्यक्रमास येत असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटण्याचा कार्यकर्ते प्रयत्न करणार आहेत. मात्र, त्यांना शासकीय यंत्रणेकडून अद्याप वेळ व ठिकाण कळविण्यात आलेले नाही. भाजप-शिवसेना सरकारने ठेकेदाराचे पैसे भागवून टोल माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पडली. म्हणून ७ जानेवारी २०१६ ला कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर जाहीर सत्कार केला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यकर्त्यांवरील गुन्हे काढून टाकण्याची ग्वाही दिली होती.मुख्यमंत्री कार्यालयाकडून कार्यवाहीसंदर्भात पुढील सूचना दिल्या नाहीत, तसेच जिल्हा प्रशासनाकडूनही तशी कोणतीच प्रक्रिया अद्यापपर्यंत राबविलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही कार्यवाही ठप्प आहे. न्यायालयातील तारखांना हजर राहून सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र हैराण झाले आहेत.

या खटल्याच्या सुनावणीला गैरहजर राहिलेल्या काही कार्यकर्त्यांना पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत दंडही झाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची अवस्था ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’अशी झाली आहे. राजकीय आंदोलनातील कार्यकर्त्यांना इतर गुन्हेगारांसारखे न्यायालयात उभे करून त्यांचा एकप्रकारे सरकारने अपमानच केल्याची भावना निर्माण झाली आहे.

 

  1.  टोल आंदोलनात विविध पोलीस ठाण्यांत एकूण ३२ गुन्हे .
  2.  सुमारे दीडशेहून अधिक कार्यकर्ते न्यायालयात मारतात फेऱ्या.
  3. आंदोलनात एकेका कार्यकर्त्यांवर चारपासून बारापर्यंत गुन्हे.
  4. यातील १६ गुन्हे काढून टाकण्यात यश.
  5.  सार्वजनिक नुकसान झालेले घटनांतील गुन्हे काढलेले नाहीत.

नुकसानभरपाई कळीचा मुद्दा..सार्वजनिक आंदोलन करीत असताना जर सार्वजनिक अथवा खासगी मालमत्तेचे नुकसान झाले तर त्याची जबाबदारी आंदोलन करणाऱ्या व्यक्तींवर टाकली जाते. टोल आंदोलनातही तसेच होणार आहे. टोल आंदोलनात नाके, तसेच कार्यालये फोडण्याच्या, जाळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जर या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या कार्यकर्त्यांना सोडले तर त्याची नुकसानभरपाई कोणाकडून वसूल करायची असा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळेच गुन्हे काढून घेण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात येते. 

टॅग्स :Courtन्यायालयtollplazaटोलनाकाkolhapurकोल्हापूर