शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय जलदिवस विशेष: कोल्हापूर जिल्ह्यातील जलसमृद्ध जलसंपत्ती वाचवण्याची आली वेळ

By संदीप आडनाईक | Updated: March 22, 2025 15:37 IST

पाण्याचा अपव्यय, प्रदूषण वेळीच न थांबवल्यास अन्यथा भीषण परिस्थिती 

संदीप आडनाईककोल्हापूर : गरज भागवण्याइतपत पुरेसे पाणी दरवर्षी पावसाच्या रूपाने मिळत असूनही जलसमृद्ध असलेल्या जिल्ह्यातील काही शहरे आणि गावांना दुर्दैवाने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. पाण्याचा अपव्यय, प्रदूषण वेळीच थांबवून त्याच्या जलव्यवस्थापनाची आदर्श साेय वेळीच न लावल्यास भविष्यात भीषण परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा जलतज्ज्ञांनी दिला आहे.पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा जिल्हा असलेला कोल्हापूर सह्याद्री पर्वतरांगेचाच म्हणजेच पश्चिम घाटाचा एक भाग आहे. हा असा जिल्हा आहे की, यातील एकूण एक तालुक्यातून एक किंवा दाेन नद्या वाहतात. त्यामुळे हा जिल्हा जलसमृद्ध आहे. या जिल्ह्यात दुष्काळ अभावानेच पडताे; परंतु तरीही जेथे मुबलक पाणी आहे आणि जेथे दुर्भिक्ष आहे, अशा गावांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते; पण शास्त्रीय उपाय योजले तर ही जलसंपत्ती वाचू शकते, असे मत भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिलराज जगदाळे व्यक्त केले आहे.पाण्याची वस्तुस्थिती

  • ७,७४९ चाैरस किलोमीटर : जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ
  • १९७१.१२ मिलिमीटर : जिल्ह्यात पडणारा सरासरी पाऊस
  • ५५० टीएमसी : दरवर्षी पावसापासून मिळणारे पाणी
  • ४५-५० टक्के पाणी जीवबाष्पीभवनाने पुन्हा माघारी वातावरणात फेकले जाते.
  • ४-१० टक्के पाणी जमिनीत मुरते, भूजल पुनर्भरणासाठी उपयाेगी
  • ४०-४५ टक्के पावसाचे एकूण पाणी भूपृष्ठावरून, नदी-नाल्यातून वाहून जाते.
  • २२० टीएमसी पाणी खर्चासाठी, पिण्यासाठी, उद्याेगासाठी आणि शेतीसाठी उपलब्ध
  • १२५ टीएमसी पाणी लहान-माेठी धरणे, तलाव, शेततळी, नदीतील डाेह यांतून साठवले जाते.

वर्ष सरासरी पाऊस२०२० - १४०५२०२१ - १४७७२०२२ - १३४२२०२३ - ९८७२०२४ - १४८३

यामुळे पडतोय जलसंपत्तीवर घालाजमिनीवरचा झाड-झाडाेरा घटत चालल्याने मृदेतील आर्द्रताही कमी हाेत आहे.जमीन पडीक बनत आहे, उत्पादन क्षमता खूपच घटत आहे.पाण्याचे साठे माेठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याने, ते वापरास निरुपयाेगी बनत आहेत.अनेक गावे आणि शहरातील भागाना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

हे आहेत उपाय

  • शास्त्रीय पद्धतीने जलवितरण हवे
  • जलव्यवस्थापन यंत्रणांनी जलसाठे संरक्षित ठेवावेत
  • हे जलसाठी प्रदूषित होऊ नयेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
  • जलसाठ्यांवर जनावरे, वाहने, कपडे धुण्यासाठी बंदी घालणे
  • कारखान्याचे पाणी जलसाठ्यात मिसळू न देणे
  • अपुऱ्या आणि कुचकामी जलशुद्धीकरण यंत्रणा दुरुस्त करणे
टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी