शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय जलदिवस विशेष: कोल्हापूर जिल्ह्यातील जलसमृद्ध जलसंपत्ती वाचवण्याची आली वेळ

By संदीप आडनाईक | Updated: March 22, 2025 15:37 IST

पाण्याचा अपव्यय, प्रदूषण वेळीच न थांबवल्यास अन्यथा भीषण परिस्थिती 

संदीप आडनाईककोल्हापूर : गरज भागवण्याइतपत पुरेसे पाणी दरवर्षी पावसाच्या रूपाने मिळत असूनही जलसमृद्ध असलेल्या जिल्ह्यातील काही शहरे आणि गावांना दुर्दैवाने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. पाण्याचा अपव्यय, प्रदूषण वेळीच थांबवून त्याच्या जलव्यवस्थापनाची आदर्श साेय वेळीच न लावल्यास भविष्यात भीषण परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा जलतज्ज्ञांनी दिला आहे.पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा जिल्हा असलेला कोल्हापूर सह्याद्री पर्वतरांगेचाच म्हणजेच पश्चिम घाटाचा एक भाग आहे. हा असा जिल्हा आहे की, यातील एकूण एक तालुक्यातून एक किंवा दाेन नद्या वाहतात. त्यामुळे हा जिल्हा जलसमृद्ध आहे. या जिल्ह्यात दुष्काळ अभावानेच पडताे; परंतु तरीही जेथे मुबलक पाणी आहे आणि जेथे दुर्भिक्ष आहे, अशा गावांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते; पण शास्त्रीय उपाय योजले तर ही जलसंपत्ती वाचू शकते, असे मत भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिलराज जगदाळे व्यक्त केले आहे.पाण्याची वस्तुस्थिती

  • ७,७४९ चाैरस किलोमीटर : जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ
  • १९७१.१२ मिलिमीटर : जिल्ह्यात पडणारा सरासरी पाऊस
  • ५५० टीएमसी : दरवर्षी पावसापासून मिळणारे पाणी
  • ४५-५० टक्के पाणी जीवबाष्पीभवनाने पुन्हा माघारी वातावरणात फेकले जाते.
  • ४-१० टक्के पाणी जमिनीत मुरते, भूजल पुनर्भरणासाठी उपयाेगी
  • ४०-४५ टक्के पावसाचे एकूण पाणी भूपृष्ठावरून, नदी-नाल्यातून वाहून जाते.
  • २२० टीएमसी पाणी खर्चासाठी, पिण्यासाठी, उद्याेगासाठी आणि शेतीसाठी उपलब्ध
  • १२५ टीएमसी पाणी लहान-माेठी धरणे, तलाव, शेततळी, नदीतील डाेह यांतून साठवले जाते.

वर्ष सरासरी पाऊस२०२० - १४०५२०२१ - १४७७२०२२ - १३४२२०२३ - ९८७२०२४ - १४८३

यामुळे पडतोय जलसंपत्तीवर घालाजमिनीवरचा झाड-झाडाेरा घटत चालल्याने मृदेतील आर्द्रताही कमी हाेत आहे.जमीन पडीक बनत आहे, उत्पादन क्षमता खूपच घटत आहे.पाण्याचे साठे माेठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याने, ते वापरास निरुपयाेगी बनत आहेत.अनेक गावे आणि शहरातील भागाना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

हे आहेत उपाय

  • शास्त्रीय पद्धतीने जलवितरण हवे
  • जलव्यवस्थापन यंत्रणांनी जलसाठे संरक्षित ठेवावेत
  • हे जलसाठी प्रदूषित होऊ नयेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
  • जलसाठ्यांवर जनावरे, वाहने, कपडे धुण्यासाठी बंदी घालणे
  • कारखान्याचे पाणी जलसाठ्यात मिसळू न देणे
  • अपुऱ्या आणि कुचकामी जलशुद्धीकरण यंत्रणा दुरुस्त करणे
टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी