शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

आंतरराष्ट्रीय जलदिवस विशेष: कोल्हापूर जिल्ह्यातील जलसमृद्ध जलसंपत्ती वाचवण्याची आली वेळ

By संदीप आडनाईक | Updated: March 22, 2025 15:37 IST

पाण्याचा अपव्यय, प्रदूषण वेळीच न थांबवल्यास अन्यथा भीषण परिस्थिती 

संदीप आडनाईककोल्हापूर : गरज भागवण्याइतपत पुरेसे पाणी दरवर्षी पावसाच्या रूपाने मिळत असूनही जलसमृद्ध असलेल्या जिल्ह्यातील काही शहरे आणि गावांना दुर्दैवाने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. पाण्याचा अपव्यय, प्रदूषण वेळीच थांबवून त्याच्या जलव्यवस्थापनाची आदर्श साेय वेळीच न लावल्यास भविष्यात भीषण परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा जलतज्ज्ञांनी दिला आहे.पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा जिल्हा असलेला कोल्हापूर सह्याद्री पर्वतरांगेचाच म्हणजेच पश्चिम घाटाचा एक भाग आहे. हा असा जिल्हा आहे की, यातील एकूण एक तालुक्यातून एक किंवा दाेन नद्या वाहतात. त्यामुळे हा जिल्हा जलसमृद्ध आहे. या जिल्ह्यात दुष्काळ अभावानेच पडताे; परंतु तरीही जेथे मुबलक पाणी आहे आणि जेथे दुर्भिक्ष आहे, अशा गावांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते; पण शास्त्रीय उपाय योजले तर ही जलसंपत्ती वाचू शकते, असे मत भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिलराज जगदाळे व्यक्त केले आहे.पाण्याची वस्तुस्थिती

  • ७,७४९ चाैरस किलोमीटर : जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ
  • १९७१.१२ मिलिमीटर : जिल्ह्यात पडणारा सरासरी पाऊस
  • ५५० टीएमसी : दरवर्षी पावसापासून मिळणारे पाणी
  • ४५-५० टक्के पाणी जीवबाष्पीभवनाने पुन्हा माघारी वातावरणात फेकले जाते.
  • ४-१० टक्के पाणी जमिनीत मुरते, भूजल पुनर्भरणासाठी उपयाेगी
  • ४०-४५ टक्के पावसाचे एकूण पाणी भूपृष्ठावरून, नदी-नाल्यातून वाहून जाते.
  • २२० टीएमसी पाणी खर्चासाठी, पिण्यासाठी, उद्याेगासाठी आणि शेतीसाठी उपलब्ध
  • १२५ टीएमसी पाणी लहान-माेठी धरणे, तलाव, शेततळी, नदीतील डाेह यांतून साठवले जाते.

वर्ष सरासरी पाऊस२०२० - १४०५२०२१ - १४७७२०२२ - १३४२२०२३ - ९८७२०२४ - १४८३

यामुळे पडतोय जलसंपत्तीवर घालाजमिनीवरचा झाड-झाडाेरा घटत चालल्याने मृदेतील आर्द्रताही कमी हाेत आहे.जमीन पडीक बनत आहे, उत्पादन क्षमता खूपच घटत आहे.पाण्याचे साठे माेठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याने, ते वापरास निरुपयाेगी बनत आहेत.अनेक गावे आणि शहरातील भागाना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

हे आहेत उपाय

  • शास्त्रीय पद्धतीने जलवितरण हवे
  • जलव्यवस्थापन यंत्रणांनी जलसाठे संरक्षित ठेवावेत
  • हे जलसाठी प्रदूषित होऊ नयेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
  • जलसाठ्यांवर जनावरे, वाहने, कपडे धुण्यासाठी बंदी घालणे
  • कारखान्याचे पाणी जलसाठ्यात मिसळू न देणे
  • अपुऱ्या आणि कुचकामी जलशुद्धीकरण यंत्रणा दुरुस्त करणे
टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी