यंदा मिरवणूक नाही, पूजादेखील मर्यादित व्यक्तीच करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:31 IST2021-09-09T04:31:22+5:302021-09-09T04:31:22+5:30

कोल्हापूर : कोविडमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शासनाच्या ...

This time there is no procession, only a limited number of people will perform pooja | यंदा मिरवणूक नाही, पूजादेखील मर्यादित व्यक्तीच करणार

यंदा मिरवणूक नाही, पूजादेखील मर्यादित व्यक्तीच करणार

कोल्हापूर : कोविडमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्व नागरिकांनी पालन करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलवकडे यांनी बुधवारी केले. यंदा मिरवणूक निघणार नाही, सार्वजिनक मंडळातील गणेशपूजादेखील मर्यादित लोक करतील, असेही त्यांनी सांगितले.

बुधवारी प्रशासक बलकवडे यांनी संबंधीत खातेप्रमुखांची बैठक आयोजित केली होती. यामध्ये शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गणेशोत्सव साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरीता चार फूट व घरगुती गणपतीकरिता दोन फूट उंचीची मूर्ती बसविण्यात यावी. सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रतिष्ठापनेकरीता दहा बाय दहा फुट आकाराचे मंडप उभारल्यास त्यांना परवानगी देण्यात येईल. गणेश उत्सव मंडळांनी शक्यतो त्यांचे मंडळाचे इमारत, तालीममध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. गणेश मूर्तीची दैनंदिन पूजा मर्यादित म्हणजेच ४ ते ५ आणि शक्यतो दोन्ही लस घेतलेल्या व्यक्तींच्या उपस्थितीत करावी. मंडपामध्ये पाचपेक्षा अधिक लोक असणार नाहीत तसेच मंडपासमोर दर्शनासाठी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

आगमणावेळी तसेच विसर्जन मिरवणूक, देखावे, विसर्जन मार्गावर कोणालाही स्वागत मंडप उभारण्यास मनाई करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Web Title: This time there is no procession, only a limited number of people will perform pooja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.