शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शहरात साकारणार तीन हजार परवडणारी घरे-: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सहा प्रकल्पांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 01:03 IST

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) जिल्ह्यात परवडणारी घरे साकारण्यासाठी सहा प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून शहर आणि परिसरात तीन हजार घरे साकारण्यात

ठळक मुद्दे नोंदणी होणार सुरू

कोल्हापूर : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) जिल्ह्यात परवडणारी घरे साकारण्यासाठी सहा प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून शहर आणि परिसरात तीन हजार घरे साकारण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘दालन’ प्रदर्शनाचे अध्यक्ष सचिन ओसवाल आणि ‘क्रिडाई कोल्हापूर’चे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

ओसवाल म्हणाले, केंद्र सरकारने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार कोल्हापूरमध्ये ४५ हजार नवीन घरांची गरज आहे. ते लक्षात घेऊन सरकारने परवडणारी घरे साकारण्यासाठी कोल्हापूरमधील सहा प्रकल्पांना ‘पीएमएवाय’ अंतर्गत मंजुरी दिली आहे. त्यापैकी दोन प्रकल्पांना ‘म्हाडा’कडून बांधकाम परवानगी मिळाली आहे. या प्रकल्पांतील घरांसाठी नोंदणीची प्रक्रिया आणि प्रत्यक्षात काम लवकरच सुरू होणार आहे. ‘पीएमएवाय’ अंतर्गत घर साकारण्यासाठी सर्वांत पहिली अट म्हणजे त्या ग्राहकाचे ते पहिलेच घर असले पाहिजे. तो कमविता असला पाहिजे. या तीन हजार घरे वन बीएचके आणि टू बीएचकेमध्ये उपलब्ध असणार आहेत. बेडेकर म्हणाले, नागाळा पार्क, कसबा बावडा, फुलेवाडी, रमणमळा, जाधववाडी आणि तपोवन परिसरात हे प्रकल्प सुरू होणार आहेत; त्यामुळे सर्वसामान्यांचे कोल्हापूर शहरात स्वत:चे घर असण्याचे स्वप्न साकारण्यास मदत होणार आहे. ‘दालन’मध्येदेखील ग्राहकांना नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.ग्राहकांच्या अपेक्षा जाणून घेणार‘दालन’मध्ये कोल्हापूर आणि परिसरातील ग्राहकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये घर कोणत्या ठिकाणी आणि किती रुपयांपर्यंत हवे आहे, आदी स्वरूपातील माहिती संकलित करणारे अर्ज आम्ही भरून घेणार आहोत. त्यातून रोज लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्यातील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार असल्याचे बेडेकर यांनी सांगितले.अनुदान, सवलती मिळणार‘पीएमएवाय’ अंतर्गत ग्राहकाला दोन लाख ४० हजारांचे अनुदान आणि स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत मिळणार आहे. कर्जासाठी व्याजदर कमी असणार आहे. ‘जीएसटी’ लागणार नाही. या योजनेमध्ये प्रकल्प मंजूर झालेल्या बांधकाम व्यावसायिकांना अडीच एफएसआय, सरकारी मोजणीमध्ये ५० टक्के सवलत दिली आहे. प्राप्तीकर घेतला जात नाही; त्यामुळे व्यावसायिक आणि ग्राहकांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाल्याचे ओसवाल म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPMRDAपीएमआरडीए