शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातून तीनच यात्रेकरू

By admin | Updated: July 8, 2015 00:02 IST

कैलास-मानस सरोवर यात्रा : पावणेदोन लाख रुपये खर्च

कोल्हापूर : कैलास मानस सरोवर या १९ हजार ५०० फुुटांवरील चीनव्याप्त तिबेटमधील यात्रेस जाणाऱ्यांची संख्या घटत चालली आहे. गेल्या वर्षी सहा यात्रेकरू कोल्हापुरातून गेले होते; तर यंदा केवळी तीनच यात्रेकरूंनी या यात्रेसाठी केंद्र शासनाकडे नोंद केली आहे. या उलट अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. यंदा कोल्हापुरातून या यात्रेसाठी सातशेंहून अधिक लोक जात आहेत. कैलास मानस सरोवर यात्रेचे नियोजन भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत केले जाते. याची जाहिरात दरवर्षी फेबु्रवारीमध्ये प्रसिद्ध होते. या यात्रेकरिता सुमारे दोन लाख रुपये इतका खर्च येतो. चीनव्याप्त तिबेटमध्ये याचे स्थान असल्याने यात्रेकरूंकडील पासपोर्ट यासाठी महत्त्वाचा आहे. यंदापासून ही यात्रा उत्तराखंडातील लिपुलेख पासवरून व सिक्कीममधील नथुला पास येथून आयोजित केली जाणार आहे. ८ जून ते ९ सप्टेंबरअखेर ही यात्रा २३ बॅचेसमधून भारतातून सोडली जाणार आहे. यात ६०जणांची एक तुकडी अशा १८ तुकड्या उत्तराखंडातील लिपुमार्गे, तर पाच तुकड्या सिक्कीम नथुलामार्गे सोडण्यात येणार आहेत. यात्रेकरिता सुमारे पावणेदोन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. याशिवाय दिल्ली येथे चार दिवस वैद्यकीय तपासणी व व्हिसा याकरिता लागणार आहेत. आपण कोणत्या मार्गाने जाणार हे यात्रेकरूंनी अर्जामध्ये नमूद करणे गरजेचे आहे. तीस दिवसांचा यात्रेचा कालावधी व पासपोर्ट, तपासण्या या किचकट बाबींमुळे यात्रेकरूंमध्ये घट होऊ लागली आहे.या उलट भारतातील अमरनाथ या श्री शंकर भोलेनाथांच्या पवित्र गुंफेचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापुरातून जाणाऱ्या यात्रेकरूंमध्ये वाढ होऊ लागली आहे. यंदा कोल्हापुरातून ७०० हून अधिक यात्रेकरू जात आहेत. त्यांतील पहिला जथ्था गुरुवारी रात्री महालक्ष्मी एक्स्प्रेसने रवानाही झाला. राज्य शासनाच्या मदतीची गरजगुजरात सरकार कैलास-मानस सरोवर यात्रेसाठी जाणाऱ्या नागरिकांना मदत करते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनानेही मदत करावी. या यात्रेत केवळ धार्मिक यात्रा म्हणून न पाहता ट्रेकिंग एक्सपिडिशन अर्थात गिर्यारोहण मोहीम म्हणून पाहणे गरजेचे आहे; कारण यात्रेकरूंना मोठ्या प्रमाणात चालतच जावे लागते. याशिवाय यात्रेकरूंनाही ३० दिवस प्रवास आणि चालण्यासाठी शरीर तंदुरुस्त ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे दिवसेंदिवस यात्रेकरूंमध्ये घट होऊ लागली आहे. - सूर्यकांत गायकवाड, मार्गदर्शक, कैलास-मानस सरोवर यात्रा, कोल्हापूर.