शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: तीन किलो सोने, अडीच कोटींची रोकड लुटली; ७ आरोपींना १० वर्षे सक्तमजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 14:15 IST

अपहरण, दरोडा गुन्ह्यातील आरोपी हातकणंगले आणि आटपाडीचे

कोल्हापूर : लक्ष्मी गोल्ड बुलियनच्या कर्मचाऱ्यांचे अपहरण करून त्यांच्याकडील तीन किलो सोने आणि दोन कोटी ५२ लाख एक हजार २०० रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या सात जणांच्या टोळीला जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांनी मंगळवारी (दि. २९) दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी ४० हजार ५०० रुपयांचा दंड सुनावला. राजेंद्रनगर येथे अपहरण आणि दरोड्याचा गुन्हा जून २०१९ मध्ये घडला होता.लक्ष्मण अंकुश पवार (वय २९, रा. खटके वस्ती, लिंगिवरे, ता. आटपाडी, जि. सांगली), गुंडाजी तानाजी नंदीवाले (वय २९, रा. तमदलगे, ता. शिरोळ), अविनाश बजरंग मोटे (वय २९), अक्षय लक्ष्मण मोहिते (वय २९), इंद्रजीत बापू देसाई (वय २५, तिघे रा. हातकणंगले), राजीव ऊर्फ झुमऱ्या बळीराम कदम (वय २८) आणि संतोष ऊर्फ भावड्या ज्ञानोबा मोरे (वय ३१, दोघे रा. दिघंची, ता. आटपाडी) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील आठवा आरोपी सोमनाथ यल्लाप्पा माने (रा. दिघंची) हा फरार आहे.सरकारी वकील अमित महाडेश्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी १४ जून २०१९ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास राजेंद्रनगर रिंगरोड येथे लक्ष्मी बुलियनच्या कर्मचाऱ्यांची कार अडवली. कारवर दगडफेक करून कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने कार बांबवडेच्या दिशेने नेऊन कारमधील रोकड आणि सोने काढून घेतले. राजारामपुरी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता.तत्कालीन पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी गुन्ह्याचा तपास करून सात संशयितांना अटक केली. न्यायालयात १८ साक्षीदार तपासण्यात आहे. उपलब्ध पुरावे, साक्षी आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश तांबे यांनी सात आरोपींना शिक्षा सुनावली. ॲड. गजानन कोरे, पैरवी अंमलदार अशोक शिंगे, नजराना देसाई, विशाल तळेकर, सागर माने यांची खटल्याच्या कामकाजात मदत झाली.दरोड्याची दहशत अन् शिताफीने तपासलक्ष्मी बुलियनच्या कारवर धाडसी दरोडा पडल्यानंतर सराफ बाजारात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. अपहरण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. मात्र, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत आणि त्यांच्या पथकाने शिताफीने तपास करून दरोडेखोरांना पकडले. त्यांच्या विरोधातील ठोस पुरावे गोळा केल्यामुळे आरोपींना सक्तमजुरीची शिक्षा झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय