शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

कंटेनर-स्कूलबस अपघातात तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 6:16 AM

भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनरचा ताबा सुटल्याने तो दुभाजक तोडून स्कूल बसवर आदळून झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले; तर संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या २२ विद्यार्थ्यांसह २४ जण जखमी झाले

कोल्हापूर : भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनरचा ताबा सुटल्याने तो दुभाजक तोडून स्कूल बसवर आदळून झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले; तर संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या २२ विद्यार्थ्यांसह २४ जण जखमी झाले. कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर चोकाक येथे मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला.मृतांमध्ये बसचालक जयसिंग गणपती चौगुले (वय ४८, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर), कंटेनरचालक सुरेश गणपती खोत (४४, रा. लोणारवाडी, जि. सांगली ) व वाहक सचिन खिलारी (३०, रा. शेणवडी, ता. आटपाडी जि. सांगली) यांचा समावेश आहे.कंटेनर सांगलीहून कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. याचवेळी अतिग्रे येथील संजय घोडावत स्कूलची बस मुलांना घेऊन अतिग्रेच्या दिशेने निघाली होती. चोकाक येथे अचानक कंटेनर रस्ता दुभाजक फोडून विरुद्ध दिशेला घुसला. त्यामुळे स्कूलबस आणि कंटेनरची जोरदार धडक झाली. स्कूलबसमधील २२ विद्यार्थी व २ सहाय्यक जखमी झाले असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.स्वत:चा जीव धोक्यात घालून बसचालकाने विद्यार्थ्यांना वाचविलेकंटेनरची धडक बसते असे वाटताच बसचालक जयसिंग चौगुले यांनी प्रसंगावधान राखून, स्वत:चा जीव धोक्यात घालत बस डाव्या बाजूच्या शेतवडीत घुुसवली. तरीही कटेंनर चालकाच्या बाजूने थोडासा घासलाच. यात चौगुले मृत्युमुखी पडले. हीच धडक समोरासमोर झाली असती तर मोठा अनर्थ घडला असता. चौगुले यांनी स्वत:चे प्राण गमावले मात्र विद्यार्थ्यांना वाचविले. चौगुले यांच्यामागे पत्नी आणि दोन मुले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना अडीच लाख रुपये व मुलास भविष्यात संस्थेत नोकरी देण्याचे आश्वासन घोडावत समुहाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी दिले आहे.