शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

तीन आसनी रिक्षा व्यावसायिकांनी कोल्हापूरामध्ये मोर्चा काढून दिली धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 18:30 IST

ग्रामीण परवानाधारक रिक्षा चालकांना शहर वगळून जिल्हा परवाना द्यावा, यासह अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर सात दिवसांत कारवाई करावी. अन्यथा आम्ही ‘सविनय कायदेभंग’ अर्थात मध्यवर्ती बसस्थानकापासून पाच प्रवाशांना घेऊन प्रवासी वाहतूक सुरू करू, असा इशारा कोल्हापूर शहर समस्त तीन आसनी रिक्षा व्यावसायिकांनी गुरुवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांना मोर्चाद्वारे दिला.

ठळक मुद्देतीन आसनी रिक्षा व्यावसायिकांनी कोल्हापूरामध्ये मोर्चा काढून दिली धडकअवैध प्रवासी वाहतूक रोखा, प्रादेशिक परिवहनला इशारा

 

कोल्हापूर : ग्रामीण परवानाधारक रिक्षा चालकांना शहर वगळून जिल्हा परवाना द्यावा, यासह अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर सात दिवसांत कारवाई करावी. अन्यथा आम्ही ‘सविनय कायदेभंग’ अर्थात मध्यवर्ती बसस्थानकापासून पाच प्रवाशांना घेऊन प्रवासी वाहतूक सुरू करू, असा इशारा कोल्हापूर शहर समस्त तीन आसनी रिक्षा व्यावसायिकांनी गुरुवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांना मोर्चाद्वारे दिला.गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ कोल्हापूर शहरामध्ये तीन आसनी रिक्षा व्यावसायिक हे सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा एक प्रमुख घटक म्हणून प्रवासी वर्गाला सेवा देत आहेत. त्यात शासनाचे सर्व नियम व कर भरून आणि वेळोवेळी भरमसाट वाढविलेला विमा ही ते भरत आहेत. तरीही प्रामाणिक रिक्षाचालकांचा व्यवसाय कोलमडला आहे; त्यामुळे अनेक रिक्षाचालक, मालक कर्जबाजारी झाले आहेत.

त्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या सहा आसनी व टाटा मॅजिक सारख्या गाड्यांमध्ये परवान्यापेक्षा जास्त प्रवासी बसवले जातात. त्याचा फटका प्रामाणिक रिक्षाचालकांना बसत आहे. याशिवाय प्रवाशांच्या जीवितालाही धोका पोहोचत आहे. यावर कारवाई करा म्हणून वारंवार निवेदन देऊनही ना प्रादेशिक परिवहन व पोलीस खाते दखल घेत नाही; त्यामुळे येत्या सात दिवसांत अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करावी.

तीन आसनी रिक्षामध्ये ४ प्रवासी वाहतुकीची रितसर परवानगी द्यावी. विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने बैठक घेऊन विमा हफ्ता कमी करावा, असे न झाल्यास प्रामाणिक तीन आसनी रिक्षाचालकही ‘सविनय कायदेभंग’ अर्थात मध्यवर्ती बसस्थानकापासून पाच प्रवाशांना घेऊन आपला व्यवसाय करतील, असा इशारा आंदोलकांतर्फे देण्यात आला.या मोर्चात कॉमन मॅन तीन आसनी रिक्षा संघटना, भारतीय जनता पार्टी तीन आसनी रिक्षा संघटना, करवीर आॅटो रिक्षा संघटना, महाराष्ट्र रिक्षाचालक सेना, आदर्श रिक्षा युनियन, शेअर-ए-रिक्षा संघटना, हिंदुस्थान आॅटो रिक्षा संघटना, स्वाभिमान रिक्षा संघटना, विद्यार्थी वाहतूक संघटना, आदी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व अ‍ॅड. बाबा इंदुलकर यांनी केले. यावेळी सुभाष शेटे, ईश्वर चणी, विजय गायकवाड, जाफर शेख, सरफरुद्दीन शेख, रमेश पोवार, अविनाश दिंडे, श्रीकांत पाटील, संजय भोरे, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसkolhapurकोल्हापूर