शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

स्त्री शक्तीच्या सन्मानासाठी हजारो हात हातात गुंफले

By admin | Updated: August 6, 2016 15:00 IST

स्त्रीत्वाचा जागर करण्यासाठी ‘लोकमत’ तर्फे काढण्यात आलेल्या मानवी साखळीत कोल्हापूरकर मोठय़ा संख्येने सहभागी झाले

‘लोकमत’च्या मानवी साखळी उस्फूर्त प्रतिसाद 
साद मानवतेची, जागर स्त्रीत्वाचा..
 
कोल्हापूर, दि. 6 -  स्त्रीशक्तीचा सन्मान करण्यासाठी शनिवारी कोल्हापुरात हजारो हात हातात गुंफले. स्त्रीत्वाचा जागर करण्यासाठी ‘लोकमत’ तर्फे काढण्यात आलेल्या मानवी साखळीत कोल्हापूरकर मोठय़ा संख्येने सहभागी झाले. येथील भवानी मंडपात झालेल्या या उपक्रमात स्त्री-पुरुष, शाळकरी मुलांमुलींसह, महाविद्यालयीन तरुण-तरुणीही उस्फूर्तपणो सहभागी झाले.
कोपर्डी व राज्यात अन्य ठिकाणी झालेल्या महिलांवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी ‘लोकमत’ने ही मानवतेची साद घातली होती. त्यास समाजातून तितक्याच उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. 
 
निसर्गानेही त्यास मोलाची साथ दिली. गेली चार दिवस सुपाने ओतणारा पाऊस नेमका सकाळी सात वाजल्यापासून खडा मारल्यासारखा बंद झाला. उन्हाची कोवळी किरणे पसरली होती. त्यामुळे वातावरणात चैतन्य पसरले होते. तिथे सगळ्य़ांनी एकत्रित येवून स्त्रीचा सन्मान करण्याची शपथ घेतली. यानिमित्त आंतरराष्ट्रीय नेमबाज राधिका बराले हिच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली.
 
या साखळीचे उदघाटन महापौर अश्विनी रामाणे, खासदार संभाजीराजे, मधुरिमाराजे, कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्र्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, पोलिस अधीक्षक प्रदिप देशपांडे, कमांडिंग ऑफिसर कर्नल डी. के. दास यांच्या हस्ते झाले. ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले व वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी या मानवी साखळीमागील भूमिका विशद केली. स्त्रियांवरील अत्याचाराचा आम्ही निषेध करतो व तिच्या सन्मानासाठी एक पाऊल पुढे टाकूया हे सांगण्यासाठीच हा उपक्रम घेतला असल्याचे भोसले यांनी सांगितले.